Headlines

जरंडी परिसरामध्ये ढगफुटीसदृश पाऊस‎:सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सोयगाव-बनोटी-चाळीसगाव राज्य मार्गावरील वाहतुकीवर परिणाम‎

तालुक्यातील जरंडीसह परिसरात बुधवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला. दोन तासांत कोसळलेल्या पावसामुळे गावालगत असलेल्या खडकी नदीला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पहिलाच मोठा पूर आला. पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गावरील पूल वाहून गेला. परिणामी, या मार्गावरील वाहतूक ५ तास ठप्प झाली होती. सोयगाव-चाळीसगावचा संपर्क पूर्णपणे तुटला…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाच केतनच्या जवळ उभी हाेती, मी तर दूर उभा होतो- चेतन चौधरी, चेतनने केतन अग्रवालच्या खुनाचा तपशील सांगितला

पुण्यातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतनचा त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून खून केल्याचे पोलिस तपासात दिसून आले. या दोघांना न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेनंतर सियाचा प्रियकर चेतनने रडत रडत स्वत:चे वडील बाबूलाल चौधरी यांना सांगितले की, घटना घडली…

Read More

फर्स्टक्राय इंटेलिटोट्सच्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल:संभाजीनगरात ‘प्री-स्कूल’च्या बालकाला अडीच वर्षांच्या मुलाने 25 चावे घेतले

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील फर्स्टक्राय इंटेलिटोट्स प्री-स्कूलमध्ये २२ जून रोजी शाळेतील मदतनिसाने लहान मुलांना एका खोलीत बाहेरून कडी लावून कोंडून ठेवल्यानंतर एका अडीच वर्षांच्या मुलाने २३ महिन्यांच्या चिमुकल्याला तब्बल १५ मिनिटे बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर २५ ठिकाणी चावे घेतले. शाळा प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मुख्याध्यापिकेसह व्यवस्थापनावर…

Read More

अचलपूरच्या दोनोडा शाळेत सहावी, सातवीचे वर्ग सुरु:सीईओंच्या स्पष्टोक्तीने विद्यार्थी-पालकांच्या आंदोलनाला यश

अचलपूर तालुक्यातील दोनोडा येथील जिल्हा परिषद शाळेत यावर्षीपासून सहावी आणि सातवीचे वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या आंदोलनानंतर ही घोषणा केली. यामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेल्या वर्गांमुळे होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. यापूर्वी दोनोडा शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग होते. मात्र, शाळेची इमारत जीर्ण झाल्याने…

Read More

जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय महाराजस्व अभियान:शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून देणार; पालकमंत्र्यांची घोषणा

अमरावती जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’ राबवले जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मोजून दिल्या जातील. हे अभियान पुढील महिन्यात २१ ते २३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शेतजमिनीच्या रस्त्यांवरून, वहिवाटीवरून आणि पाणंद रस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये अनेकदा वाद होतात. या समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाकडे मागणी केली जाते,…

Read More

'स्क्वेअर कॅफे'वर पोलिसांची धाड:अश्लील चाळे करणाऱ्या 3 प्रेमीयुगुलांना घेतले ताब्यात

अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलातील मार्केटमधील स्क्वेअर कॅफेवर भरोसा सेल आणि दामिनी पथकाने धाड टाकली. या कारवाईत तीन प्रेमीयुगुलांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज, बुधवार, २४ जून रोजी दुपारी २ वाजता करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कॅफेमध्ये प्रेमीयुगुलांना तासाप्रमाणे पैसे आकारून अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत होती. दरम्यान गस्तीवर असलेल्या…

Read More

'टोमॅटो देतो' असे सांगून घरात बोलावले अन्…:7 वर्षांच्या चिमुरडीवर 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, नागरिकांनी रंगेहाथ पकडून दिला चोप

कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणमध्ये एका 50 वर्षीय नराधमाने अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग दोन दिवसांत घडलेल्या या दुसऱ्या अत्याचाराच्या घटनेमुळे कल्याण परिसर हादरून…

Read More

विदर्भात 54 टक्के पावसाची तूट:जून संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही, पेरण्या खोळंबल्या

चालू मान्सून हंगामात विदर्भात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. हवामान विभागाने १ ते २४ जून २०२६ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भ उपविभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५४ टक्के पावसाची तूट आहे. या कालावधीत विदर्भात सामान्यतः १२०.४ मिमी पावसाची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात केवळ ५५.५ मिमी…

Read More

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही:वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणारं नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने…

Read More

अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट:शिवसेना ठाकरे गटाच्या फुटलेल्या 6 खासदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या 6 खासदारांनी जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली….

Read More