Headlines

चित्ररथ, प्रभात फेरीतून महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक:लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळातर्फे मिरवणूक‎

लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित तिन्ही विद्याशाखांतर्फे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. जिजामाता प्राथमिक शाळेने “पर्यावरण रक्षण काळाची गरज’ दाखवणारा चित्ररथ तर लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाने “मानव आणि वन्यजीव संघर्ष’, जिजामाता कन्या विद्यालयाच्या वतीने “महाराष्ट्र ही संतांची भूमी व छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम भेट’ यांचा देखावा असलेला चित्ररथ सादर…

Read More

हरिनाम स्मरणातूनच जीवनाचे सार्थक:ठाणगावातील श्री स्वामी चरित्र संगीतमय चरित्रकथेत संतोष जाधव यांचे निरुपण‎

एकच धर्म मानव धर्म आणि एकच जात मानव जात आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले, तर अधर्माला स्थानच उरणार नाही. आदर्श जीवन जगल्यास दु:ख कुणाच्याही वाट्याला येत नाही, असे प्रतिपादन संतोष जाधव यांनी केले. ठाणगाव (ता. सिन्नर) येथील श्री स्व . मराठी अस्मिता आणि हिंदू संस्कृती जपणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबव्यवस्थेतील…

Read More

गंगापूर येथे शिक्षक सेनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी कापसेंचा सत्कार

गंगापूर तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अरविंद कापसे यांची पंचायत समिती गंगापूर येथे गटशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती झाल्याबद्दल शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेच्या वतीने सत्कार पार पडला. कापसे हे मागील ५ वर्षांपासून गंगापूर तालुक्यात कार्यरत असून, गेल्या एक वर्षापासून त्यांनी गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार यशस्वीपणे सांभाळला होता. महाराष्ट्र शासनातर्फे तांत्रिक सेवेतील ५१ विस्तार अधिकाऱ्यांना उपशिक्षणाधिकारी…

Read More

बोरगाव अर्ज येथे अंगारकीनिमित्त बारा हजार भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ:पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी‎

फुलंब्री तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बोरगाव अर्ज येथील गिरजा नदीच्या मध्यभागी असलेल्या श्री गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त १२ हजार भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाले होते. यावेळी आलेल्या भाविकांसाठी २५१ किलोची साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. सकाळी ४ वाजता काकडा भजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ७ वाजता गणपतीची भव्य…

Read More

माळशेज घाटात एसटी-स्कॉर्पिओ अपघातात 4 ठार:वाहनांचा चुराडा; सर्व मृत नेवासा तालुक्यातील

मुरबाड-माळशेज घाट महामार्गावरील मृत्यूचा सापळा बनलेल्या वैशाखरे ‘ब्लॅक स्पॉट’वर (तीव्र वळण) मंगळवारी (५ मे) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एसटी बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात नेवासे तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील मामा-भाचे आणि भेंडा येथील दोन महिला अशा एकूण चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांत एका अंगणवाडी सेविकेचा समावेश आहे. कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर वैशाखरे…

Read More

नाशिक काॅर्पोरेट जिहाद:चारही संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात कारागृहात असलेली संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल बलात्कार, विनयभंग, धर्मांतर गुन्ह्यात…

Read More

'ते 50 दिवस' कादंबरी अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय रद्द:उच्च न्यायालयाने अमरावती विद्यापीठाचा निर्णय नाकारला, विद्यार्थ्यांना दोन्ही पर्याय

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी अभ्यासक्रमातून वगळण्याचा घेतलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता ‘ते पन्नास दिवस’ आणि ‘धग’ या दोन्ही कादंबऱ्यांच्या आधारे परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. जून…

Read More

सीईओ सत्यम गांधींचा मेळघाटात पहिला दौरा:पाणीपुरवठा, मनरेगा कामांची पाहणी; अधिकाऱ्यांना कठोर सूचना

अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपला पहिला दौरा मेळघाट परिसरात केला. या दौऱ्यात त्यांनी पाणीपुरवठा आणि मनरेगाच्या कामांबाबत कठोर भूमिका घेत, कामचुकार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सीईओ गांधी यांनी मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमधील काही गावांना भेटी दिल्या. त्यांनी ग्रामस्थ तसेच स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जलजीवन मिशन, पाणीटंचाई निवारण,…

Read More

विद्यार्थिनींनी पदवीसोबतच कौशल्य आत्मसात करावे:कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांचे प्रतिपादन

अमरावती येथील नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या महिला महाविद्यालयाचा पदवी वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यार्थिनींना पदवीसोबतच कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. सध्याच्या धकाधकीच्या काळात केवळ शिक्षणाच्या आधारे नोकरी मिळवणे कठीण झाल्याचे त्यांनी नमूद केले. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. असनारे उपस्थित होते. नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष…

Read More

अखेर SRPF गट 5 अंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा स्थगित:अपर पोलिस महासंचालकांकडून कारवाई; 100 पैकी 85 प्रश्न जसेच्या तसे आले होते छापून

महाराष्ट्र पोलिस भरती अंतर्गत राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) गट 5, दौंड येथील लेखी परीक्षेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खाजगी प्रकाशनाच्या सराव पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न या परीक्षेत जसेच्या तसे विचारण्यात आले होते. विरोधी पक्षांनी यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर, पोलिस भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या…

Read More