निसर्गरम्य सह्याद्रीत अपघातांचे धोके वाढल्याने नियमावली जाहीर:रिल्स-सेल्फीसाठी जीव धोक्यात घालू नका, गिर्यारोहण महासंघाचे सुरक्षिततेचे आवाहन
मान्सूनच्या आगमनामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या असून, ओढे, नाले आणि धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. हे विलोभनीय निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक आणि ट्रेकर्स सह्याद्रीकडे आकर्षित होतात. मात्र, पावसाळ्यात अपघातांचे धोकेही मोठ्या प्रमाणावर वाढतात. या पार्श्वभूमीवर, ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’ने पर्यटकांसाठी सुरक्षिततेचे आवाहन करत महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी…