Headlines

माऊलींच्या मानाच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना:मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करत विश्वस्त, कार्यकर्त्यांनी केले पूजन

पुणे, प्रतिनिधी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करत गणपती बाप्पाला अनोखी मानवंदना दिली. यावेळी गणेशभक्तांनी ‘माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ आणि ‘जय गणेश… गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष केला. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि…

Read More

आखाडा बाळापूर जवळ जुगार अड्डयावर छापा:19 जण ताब्यात, 13 मोबाईलसह 1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिस अन् स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

आखाडा बाळापूर शिवारातील सिंचन वसाहत मार्गावर एका हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या जुगार अड्डयावर स्थानिक गु्न्हे शाखा व आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने सोमवारी ता. ६ छापा टाकला. यामध्ये १३ मोबाईलसह १.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २० जणांवर सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर शिवारात काही जण झन्नामन्ना जुगार…

Read More

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी, दरडी कोसळल्याने जनजीवन विस्कळीत:'पीएमआरडीए'ने युद्धपातळीवर शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले

पुणे महानगर प्रदेशात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पूर व दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. या गंभीर आपत्कालीन परिस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दलाने (पीडीआरएफ) तातडीने मदत व बचावकार्य राबवले. जवानांनी शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांचे प्राण वाचवले. मुसळधार पावसामुळे मावळ आणि लोणावळा…

Read More

मुंबई एटीसी कोंडीमुळे नागपूर विमानतळाला फटका:मुंबई-नागपूर विमान रद्द, इतर विमानांना मोठा विलंब

मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कोंडीमुळे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईहून नागपूरला येणारी आणि जाणारी अनेक विमाने विलंबाने धावत आहेत, तर काही रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कोंडीमुळे इंडिगोचे मुंबई-नागपूर-मुंबई दरम्यान धावणारे ‘६इ-६८०२/५१७५’ हे विमान तांत्रिक आणि ऑपरेशनल कारणांमुळे रद्द…

Read More

औंढा पंचायत समिती अपहार प्रकरण:सीईओंच्या पत्राला बीडीओकडून केराची टोपली, अंतिमपत्र देऊनही कारवाई होईना

औंढा नागनाथ पंचायत समितीमधील ५७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला गटविकास अधिकाऱ्याने केराची टोपली दाखवली आहे. विशेष म्हणजे अंंतिम संधी देण्याचे पत्र देऊनही कारवाई होत नसल्याने आता जिल्हा परिषदेकडून काय भुमीका घेतली जाणार याकडे औंढा तालुक्याचे लक्ष लागले आहे. औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये कपातीच्या रकमेमध्ये तब्बल ५७ लाख…

Read More

ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 237 मि.मी. पाऊस:कसारा घाटातील रेल्वे पूर्ववत, नदीपातळीवर सातत्याने लक्ष; एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात

ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी तातडीने मदत व बचावकार्य करण्यात येत आहे. रेल्वे व रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असून, एनडीआरएफच्या…

Read More

भाजपचा ओबीसी डीएनए हा निव्वळ बनाव:सरकारकडून ओबीसींचे पद्धतशीर खच्चीकरण; प्रा. यशपाल भिंगे यांची घणाघाती टीका

“भाजप सरकार आमचा डीएनए ओबीसींचा आहे असे म्हणते, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या सरकारकडून ओबीसींचे पद्धतशीर खच्चीकरण केले जात आहे,” असा आरोप काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे यांनी सोमवारी ता. ६ येथे केला आहे. हिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते, शेतकरी नेते डॉ.रमेश शिंदे, माजी…

Read More

सवनात संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलुप ठोकले:9 पदे असतांना तीनच शिक्षक कार्यरत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप

सेनगाव तालुक्यातील सवना येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची ९ पदे मंजूर असतांना प्रत्यक्षात तीनच शिक्षक कार्यरत असून या ठिकाणी तातडीने शिक्षकांची नियु्क्ती करण्याच्या मागणीसाठी संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी ता. ६ सकाळी शाळेला कुलुप ठोकले. तर दुपारपर्यंत शिक्षण विभागाचा एकही अधिकारी शाळेकडे आला नाही. या ्प्रकारामुळे गावकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त होत आहे. सेनगाव तालु्क्यातील सवना येथे जिल्हा…

Read More

बैठका लावल्या तरी जाणारे थांबणार नाहीत:खासदारांचीही बैठक बोलावली होती, काय झाले‌? ठाकरेंच्या डॅमेज कंट्रोलवर उदय सामंतांचा टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा आटोपून तातडीने आमदारांची बैठक बोलावली असली, तरी या बैठकीवरून सत्ताधारी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “यापूर्वी ९ खासदारांची बैठक घेऊनही ६ खासदार फुटलेच ना? त्यामुळे आता कितीही बैठका लावल्या तरी जाणारे थांबणार…

Read More

एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला!:सुप्रिया सुळे यांची कडाडून टीका, मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यात इमर्जन्सी जाहीर करण्याची मागणी

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात ‘इमर्जन्सी’ जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘महाराष्ट्रात नेमकं…

Read More