Headlines

खरीप हंगामात 35 हजार 560 हेक्टर जमिनीवर सोयाबीनचा पेरा:84 हजार 768 पैकी 83 हजार895 हेक्टरवर नियोजन‎

यंदाच्या खरीप हंगाम २०२६-२७ साठी येथील कृषी विभागातर्फे तालुक्यातील वही ती खालील ८४ हजार ७८७ हेक्टर जमिनीपैकी ८३,८९५ हेक्टर जमिनीवर विविध खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले होते त्यापैकी ६३ हजार ८४८ हेक्टर जमिनीवर सहा जुलै पर्यंत प्रत्यक्षात पेरणी झाली आहे पेरणीची टक्केवारी ही ७६ टक्के आहे.३५ हजार ५६० हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी झाली असल्याने यंदाही…

Read More

विवाह संस्कारातून निसर्ग अन् ज्ञानाची पेरणी, महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन वधू-वराची मंगल प्रवेशिका‎

आजकालच्या विवाह सोहळ्यांवर पाश्चात्य संस्कृतीसह बडेजावाचा मोठा प्रभाव दिसून येतो. लाखो रुपयांची उधळपट्टी, डीजेचा दणदणाट आणि दिखाऊपणा यामध्येच लग्नाची इतिकर्तव्यता मानली जात असताना, अमरावतीत एका विवाह सोहळ्याने समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. नांदगाव पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तुळे आणि यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी कलगा येथील प्रियंका तुपटकर यांच्या विवाह सोहळ्यात भारतीय संस्कृती, समाजप्रबोधन आणि पर्यावरण…

Read More

मान्सूनचे रौद्ररूप:मुंबई, पुण्यात पावसाचे थैमान; 90 किमीच्या वाऱ्याने उडवली दाणादाण; 8 जुलैपर्यंत घराबाहेर पडू नका- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

१६ दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन केलेल्या मान्सूनने मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत थैमान घातले. त्यामुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. ९० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने २९१ झाडे उन्मळली. ८ जुलैपर्यंत नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवारी मुंबईतील मानखुर्द येथे चाळ कोसळून सहा जणांचा…

Read More

प्रवासी सीटखाली दुचाकींची छुप्या पद्धतीने वाहतूक:डॅझलिंग लायटिंगचा थाटही नडला, श्रीरामपूर आरटीओची 27 स्लीपर बसेसना 1.45 लाखांचा ऑन द स्पॉट दंड‎

प्रवासी वाहतुकीचा परवाना घ्यायचा आणि बसमधून चक्क व्यावसायिक माल अन् दुचाकींची छुप्या पद्धतीने वाहतूक करायची, या ‘धंद्या’चा श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पर्दाफाश केला आहे. नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डोळे . प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने ही विशेष मोहीम राबवली. यामध्ये…

Read More

महाराष्ट्रातील केवळ तीन संतांच्या पालखी रथांना ‘जू’ देण्याचा मान:संत शेख महंमद महाराज पालखी रथासाठी ‘जू’ अर्पण करून जपली पवित्र परंपरा

सद्गुरु श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील रथाच्या बैलांसाठी गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील बाबासाहेब डुबे, प्रसाद नवथर, पंडित चव्हाण, विश्वास महाडिक आणि विवेक महाडिक यांनी पारंपरिक ‘जू’ अर्पण करून भक्तीभावाची अनोखी परंपरा जपली आ . महाराष्ट्रात केवळ तीन संतांच्या पालखी रथांना अशा प्रकारे ‘जू’ अर्पण करण्याचा मान असून, त्यामध्ये श्री संत शेख महंमद…

Read More

धरण उशाला अन् कोरड घशाला; भर पावसात टाकेद तहानलेले:12 दिवसांनी गावात येते पाणी; कोट्यवधींच्या योजनांनंतरही नागरिकांचे हाल‎

प्रभू श्रीरामाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि ‘सर्वतीर्थ टाकेद’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाकेद गावासह बांबळेवाडी, शिरेवाडी, घोडेवाडी व परिसरात भर पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागांत १० ते १२ दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने . शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजना, हर घर नल से जल आणि जलजीवन मिशनसारख्या योजनांवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घरोघरी…

Read More

संत एकनाथ महाराज पालखीचे आज प्रस्थान:471 व्या आषाढी वारीसाठी हजारो वारकरी सज्ज‎

येथून संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराज यांच्या ४७१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे मंगळवारी (७ जुलै) सायंकाळी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याचे पालखी प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आल्याचे नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले. नाथ…

Read More

जिल्हा बँकेच्या निकालानंतर दानवे-काळे यांच्यात कलगीतुरा‎:दानवेंची वरिष्ठांकडे तक्रार- काळे‎, ते महायुतीतूनच लढणार होते- दानवे‎

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा ‎‎निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत ‎‎आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात ‎‎आहेत. महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक ‎‎लढवणारे अंबादास दानवे यांनी ‎‎खळबळजनक आरोप केला आहे. कल्याण ‎‎काळे, जगन्नाथ काळे, किरण पाटील ‎‎डोणगावकर यांनाच महायुतीच्या पॅनलमधून ‎‎उभे राहायचे होते. मात्र तसे झाले नाही.‎म्हणून काळेंनी स्वतंत्र पॅनल उभा केला,‎असा आरोप दानवेंनी केला. महाविकास ‎‎आघाडीशी गद्दारी करणाऱ्या दानवेंची तक्रार…

Read More

चंद्रपूर जिल्ह्यातील बरंडघाट परिसरात वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू:जिल्ह्यात 23 वा बळी, वन विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बरंडघाट परिसरात सोमवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेंद्र तिमाजी भोयर (५०, रा. बरंडघाट) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा २३ वा बळी ठरल्याने वन विभागाच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र भोयर हे विश्वनाथ भोयर यांच्यासोबत…

Read More

Mumbai Rajbhavan SRPF Jawan Suicide on Duty; Police Probe

मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि ‘व्हीआयपी’ समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आह . प्राथमिक माहितीनुसार, या जवानाने ड्युटीवर असताना स्वतःच्याच ‘सर्व्हिस रायफल’मधून गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. अत्यंत कडेकोट सुरक्षा…

Read More