Headlines

चिखली शिवारात दुचाकीस्वाराकडून गावठी पिस्टलसह 2 जिवंत काडतूस जप्त:परभणीच्या तरुणाला वसमतमध्ये अटक

वसमत तालुक्यातील चिखली शिवारात दुचाकीस्वाराच्या तपासणीमध्ये एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस सापडले असून या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 19 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हयातील मानवत येथील सुरजितसिंह टाक (26) हा नांदेड येथून दुचाकी वाहनावर परभणीकडे जात असून त्याच्या कपड्याच्या पिशवीमध्ये गावठी…

Read More

चांभुर्डी अवैध मुरूम उपसा प्रकरणात तिसऱ्यांदा पंचनामा:तहसीलदार डोंगरे यांच्या आदेशामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले‎

तालुक्यातील चांभुर्डी येथील शासकीय जमिनीतून झालेल्या मोठ्या प्रमाणावरील अवैध मुरूम उपसा प्रकरणात महसूल प्रशासनाने अखेर पुन्हा एकदा कारवाईचे पावले उचलली आहेत. तक्रारदार श्रीरंग साळवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या आदेशानुसार १५ मे २०२६ रोजी संबंधित जागेचा तब्बल तिसऱ्यांदा पंचनामा करण्यात आला. यापूर्वी झालेल्या दोन पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आक्षेप घेत साळवे यांनी सखोल चौकशीची…

Read More

माता सीतेच्या गोष्टीमध्ये रमले अहिल्यानगरचे रसिक:अनुभव संपन्न, कसदार वाचिक अभिनयातून उलगडले सीतेच्या जगण्याचे भावविश्व‎

रामायणातील सीतेच्या जगण्याचे भावविश्व आणि तिच्या वाट्याला आलेला संघर्ष, सुप्रसिद्ध लेखिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या कसदार वाचिक अभिनयातून उलगडत गेला आणि नगरकर रसिक त्यात पूर्णपणे रमून गेले. निमित्त होते, अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आय . वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांनी सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे लिखित “सीतेची गोष्ट’ या…

Read More

टेंभुर्णी- पंढरपूर महामार्ग आता होणार चार पदरी:खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश‎

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर टेंभुर्णी- पंढरपूर हा चार पदरी महामार्ग होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. फलटण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या पाहणी दौऱ्यावर असताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी ही घोषणा केली. टेंभुर्णी ते पंढरपूर या महामार्गावरील वाढती वाहतूक, वारकऱ्यांची…

Read More

भंडाऱ्यांसाठी 1 हजार 100 ताट, ग्लास उपलब्ध:" माय वसुधा विकास'' ची चौथी शाखा; पर्यावरण संवर्धनाचा ध्यास‎

शहरात प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर कमी होऊन पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी कार्य करणाऱ्या माय वसुधा विकास संस्थेतर्फे १ वर्षांपासून “प्लॅस्टिक डिस्पोजेबलमुक्त अकोला अभियान’ राबवण्यात येत आहे. या संस्थेने आता चौथी शाखा कार्यासाठी सुरू केली असून, या अंतर्गत संस्थेने ११०० ताटे, ग्लास, चमचे, वाट्या, चहाचे पेले, मठ्ठाचे पेले, नाष्टा प्लेट निःशुल्क उपलब्ध झाले आहेत. फक्त न्या, वापरा…

Read More

गायीचे शेण आणि गोमुत्र शेतीसाठी आहे शुद्ध सोनं:शेतीचे अर्थकारण बदलण्यासाठी हवा योग्य वापर

“शेतकरी जोपर्यंत गाईला समजून घेत नाही, तसेच गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा योग्य वापर करत नाही, तोपर्यंत शेतीचे खरे अर्थकारण फायद्याचे होणार नाही. गोमूत्र हे लाखो रुपयांची धनदौलत आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत ते शुद्ध सोन्यासारखे आहे. गाईचे महत्त्व शेतकऱ्यांना समजले, तर शेती आणि शेतकऱ्यांचे भविष्य निश्चित बदलू शकते, असे प्रतिपादन गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी व्यक्त केले….

Read More

अमरावतीकरांना पुरी, कामाख्या यात्रा विशेष ट्रेन:पुरी-कामाख्या-वैद्यनाथ धाम यात्रा 25 जूनपासून; पुण्याहून निघणार भारत गौरव पर्यटन ट्रेन‎

. आयआरसीटीसीद्वारा भारत गौरव पर्यटन ट्रेनच्या माध्यमातून आयोजित पुरी-कामाख्या-बैद्यन ाथ धाम यात्रेच्या अनुषंगाने प्रवाशांना पवित्र व अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभवाची प्रचिती येणार आहे. ११ रात्री व १२ दिवसांची ही तीर्थयात्रा विशेष ट्रेनद्वारे २५ जून रोजी पुण्याहून सुरू होईल. अमरावतीकर प्रवाशांनाही या पर्यटन ट्रेनमधून जगन्नाथ पुरी, कामाख्या देवी यासारख्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. कारण, ही…

Read More

पिंपळवाडी शिवारात अपघात, बार्शी – येरमाळा मार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको:दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार; गेल्या 15 दिवसातील तिसरा बळी

बार्शी-येरमाळा राज्यमार्गावरील तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात आविदा शिवराज चौधरी (वय ५५, रा. पिंपळवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. मागील १५ दिवसांतील हा तिसरा अपघात आहे. अपघातग्रस्त मार्गावर तातडीने गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बार्शी येरमाळा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अखेर लेखी आश्वासनानंतर…

Read More

टँकरमुक्तीसाठी 836 गावांत 15 हजार 348 उपाययोजना:विहिर जलस्त्रोत असलेल्या गावातील योजनांचे होणार बळकटीकरण, उपाययोजना सुचवल्या‎

एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण घटणार असून, जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ज्या पाणी योजनांना विहिर जलस्त्रोत आहे, त्या विहिरी कोरड्या पडल्याने तेथील पाणी योजना बंद होऊन, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हे चित्र बदलवून, टँकरमुक्तीसाठी ८३६ गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाद्वारे १५ हजार ३४८ उपाय योजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखडा तयार…

Read More

कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहून तत्काळ प्रश्न सोडवावे:नवी बेज येथे गाव भेट शिबिरात तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या सूचना‎

शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असून, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शासनाच्या विविध योजना सर्वांसाठी असून, ज्या योजनेसाठी आपण पात्र आहोत त्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. महसूल विभागातील कर्मचार . तालुक्यातील नवी बेज येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज गाव भेट समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी विविध योजनांतील १००…

Read More