Headlines

बैठका लावल्या तरी जाणारे थांबणार नाहीत:खासदारांचीही बैठक बोलावली होती, काय झाले‌? ठाकरेंच्या डॅमेज कंट्रोलवर उदय सामंतांचा टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा आटोपून तातडीने आमदारांची बैठक बोलावली असली, तरी या बैठकीवरून सत्ताधारी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “यापूर्वी ९ खासदारांची बैठक घेऊनही ६ खासदार फुटलेच ना? त्यामुळे आता कितीही बैठका लावल्या तरी जाणारे थांबणार…

Read More

एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला!:सुप्रिया सुळे यांची कडाडून टीका, मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यात इमर्जन्सी जाहीर करण्याची मागणी

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात ‘इमर्जन्सी’ जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘महाराष्ट्रात नेमकं…

Read More

मुंबईसह राज्यात अतिवृष्टीचा कहर:रेड अलर्टनंतर 'वर्क फ्रॉम होम', सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, 5 जिल्ह्यांत शाळा-बंद, एसटी सेवा स्थगित

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, नाशिकसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते, पूल आणि महामार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासह काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने…

Read More

Devendra Fadnavis Speech in Assembly Over Pune Mumbai Rain Incidents

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील वि . याचबरोबर “आज दुपारनंतर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी…

Read More

'आवाज दाबण्यासाठी जॅमर लावले, पण सरकारला कानठळ्या बसणारच!':पेपरफुटीविरोधात रोहित पवार अन् अभिजित दिपकेंचा संभाजीनगरात एल्गार

राज्यात आणि देशात उघडकीस आलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणांवरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याच अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती’च्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांनी थेट मैदानात…

Read More

आळंदीत इंद्रायणीचा रौद्रावतार!:नदीवरील चारही पूल पाण्याखाली; अडीचशे वारकऱ्यांची सुटका, पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासन अलर्ट

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यालाही बसत असून आळंदीत इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तसेच धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने ते वाहतुकीसाठी बंद केले…

Read More

नगर शहरात लवकरच होणार अद्ययावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स:पदक विजेत्या खेळाडूंचा आ. जगताप यांच्याकडून सत्कार‎

नगरचे खेळाडू विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक पटकावून अहिल्यानगरचे नावलौकिक उंचावत आहे. अशा यशस्वी खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहोत. शहराच्या विकासाच्या बरोबरीने क्रीडा क्षेत्रही समृद्ध होणे आवशयक आहे. यासाठी सतत पाठपुरावा केल्याने राज्य सरकारकडून नगरमधील वाडिया पार्क स्टेडीयम व मैदानाच्या नूतनीकरणासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी…

Read More

लुडो जिंकला अन् तरुणाचा खून:हल्लेखोराने केले चाकूने वार

लुडोचा खेळ जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या तरुणाचा किरकोळ वादातून चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी ४ जुलैला रात्री सुमारे अकरा वाजता गर्ल्स हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने तीनही आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींत गोलू ऊर्फ शेख इम्रान शेख महमूद (२८, रा. यास्मिननगर, ह. मु. यवतमाळ), शेख अमीन शेख…

Read More

अकलूजमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावणात स्वागत:अभिषेक, पाद्यपूजनासह विविध कार्यक्रम उत्साहात

श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेअंतर्गत महाराजांच्या पावन पादुकांचे अकलूज येथे शनिवारी सायंकाळी भक्तिमय वातावरणात आणि वाद्यांच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत विठ्ठल मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. संपूर्ण महाराष्ट्राची परिक्रमा करून अखेरीस अक्कलकोट येथे पोहोचणारा हा पालखी सोहळा तब्बल नऊ महिन्यांचा असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही अकलूज येथे दाखल झाला. लवंग (पंचवीस चार) येथील…

Read More

Karjat-Lonavala Ghat Landslide Halts Trains; 16 Services Cancelled

मुंबई, पुण्यासह संपूर्ण घाटमाथ्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून याचा थेट फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कर्जत-लोणावळा दरम्यान असलेल्या घाट सेक्शनमधील ठाकूरवाडी आणि मंकी हिल दरम्यान आज अचानक मोठी दरड कोसळली. रेल्वे ट्रॅकवर प्रचंड प्रमाणात माती . रेल्वे ट्रॅकवरील दरड आणि मातीचा ढिगारा हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तात्काळ कामगारांची टीम आणि यंत्रसामग्री घटनास्थळी रवाना केली आहे….

Read More