Headlines

तीन वेळा महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीमध्ये हरलेला मंगळवेढ्याचा महेंद्र हिंदकेसरी:साताऱ्यातील हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत अखेर मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला विजेता‎

सातारा येथे पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये हिंदी केसरीची गदा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचा सुपुत्र ट्रिपल उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांनी उचलून तालुक्याचे नाव जगपातळीवर झळकावले आहे. सोलापूर जिल्ह्यातील व . पृथ्वीराजवर मात करत पटकावली गदा अन् थार कार कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला होता. महेंद्र गायकवाडने एकेरी पट…

Read More

संभाजीनगर-जालना जागेवर शिवसेनेचा दावा;‎ पालकमंत्री म्हणतात, येथे आम्हीच जिंकणार:शिंदेसेनेकडून माजी महापौर नंदकुमार घोडेले, विद्यमान उपमहापौर राजेंद्र जंजाळ इच्छुक

छत्रपती संभाजीनगर-जालना आणि ‎परभणी-हिंगोली या दोन स्थानिक स्वराज्य संस्था ‎‎मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. ‎‎छत्रपती संभाजीनगर-जालना ही जागा महायुतीत ‎‎शिवसेनाच लढवणार असल्याचा दावा पालकमंत्री ‎‎संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेकडून ‎‎सध्याचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि माजी ‎‎महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक ‎‎पदाधिकारी इच्छुक आहेत. विधान परिषदेचे‎ आमदार अंबादास दानवे हे यापूर्वी आमदार होते. ‎त्यानंतर आता…

Read More

भोंदू अशोक खरात आता ईडीच्या ताब्यात:52 कोटींच्या व्यवहारांमागे परदेशात पळून जाण्याचा कट उघड; 65 बनावट खात्यांतून उलाढाल

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात आणि नामकर्ण आवारे प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. लैंगिक अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरात तसेच पतसंस्थेतील संशयित व्यवहारांप्रकरणी अटकेत असलेल्या नामकर्ण आवारे यांना सिन्नर सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांनाही एकाच वाहनातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आवारे यांच्या वकिलांनी पुढील पोलिस…

Read More

नीट पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी:जळगाव जामोदमध्ये काँग्रेसची मागणी; तहसीलदारांना निवेदन‎

नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी आज, दि. १८ मे रोजी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यामध्ये नमूद केले की, देशात शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर प्रकारे खेळ केला जात आहे. नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणामुळे सुमारे २२…

Read More

मशागतीच्या ऐन हंगामात डिझेलची ‘आग':ट्रॅक्टरचे भाडे 20% वधारले, पारंपरिक शेती कालबाह्य; यांत्रिकीकरणावर भर‎

खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या बोरगाव मंजूसह ग्रामीण भागात पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत डिझेल आणि इंधनाच्या दरात झालेली सातत्यपूर्ण वाढ झाल्याने ट्रॅक्टरचे भाडे २० टक्के वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेती कसण्याचा खर्च आता शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला असून, ऐन हंगामात इंधन दरवाढीचा मोठा फटका मशागतीच्या कामांना बसत आहे….

Read More

गोवंश वाहतुकीवरून 2 गटांत दगडफेक; तीन गुन्ह्यांची नोंद:तिसरी कारवाई: दगडफेक,‎शासकीय कामात अडथळा‎

दर्यापूर,अमरावती दर्यापूर जवळील बाभळी येथे रविवारी (दि. १७) रात्री गोवंश वाहतूक करणारे वाहन अडवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन दगडफेक झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी दर्यापूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारींवरून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या परिस्थिती शांततापूर्ण…

Read More

मंत्र्यांना आदिवासी नागरिकांनी दाखवल्या मेळघाटातील समस्या:डाॅ. उईके यांनी दिले तत्काळ समस्या सोडवण्याचे आश्वासन‎

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मेळघाट दौऱ्याच्या अनुषंगाने चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा गावास सोमवारी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या आशेने मंत्र्यांपुढे गावातील गंभीर पाणीटंचाई तसेच खराब झालेल्या रस्त्यांची समस्या मांडत निवेदन सादर केले. तारुबांदा गावात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून, येथील प्रसिद्ध कांदरी बाबा देवस्थानास (क) दर्जा मिळालेला असून, या…

Read More

लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले? सरकारने दिली आणखी एक मुदत:आता ई-केवायसी नाही केलं तर यादीतून नाव वगळणार

राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून पात्र महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. मात्र, काही महिलांना पात्र असूनही अद्याप पैसे मिळालेले नाहीत. यामागे ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे मुख्य कारण समोर आले आहे. त्यामुळे आता…

Read More

ग्राम सुरक्षा दल अन् पोलिस मित्रांनी शांतता-सुरक्षिततेसाठी सक्रिय राहण्याची आवश्यकता:बार्शीत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस मित्र व नागरिकांना दिल्या सूचना‎

ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र यांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. गावातील शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी सक्रिय सहभाग घेत पोलिस व नागरिक यांच्यात समन्वय वाढवून गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात . यावेळी पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील, ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी उत्सव, सण,…

Read More

चांदवडला ‘कुस्ती आपल्या‎दारी’ अभियानाला प्रतिसाद‎:कुस्ती विकास मार्गदर्शन मेळाव्यात तालुक्यातील पहिलवानांचा सन्मान

चांदवड जिल्हा तालीम संघाने राबविलेल्या ‘कुस्ती आपल्या दारी’ या अभियानात चांदवड येथे कुस्ती विकास मार्गदर्शन मेळावा झाला. कुस्ती परंपरेचा वारसा जपत ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत पैलवान घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष ॲड. गोरखनाथ बलकवडे, उत्तर महाराष्ट्र तालीम संघाचे अध्यक्ष, सुवर्णपदक विजेते उत्तमराव दळवी, माजी प्राचार्य रवींद्र…

Read More