नदी ही जीवन, संस्कृती, सभ्यतेचा आधार: डॉ. राजेंद्र सिंह:कार्यक्रम एमआयटी विद्यापीठातर्फे पुनर्जीवित नदी ‘बद्दह’ अनुवादित मराठी आवृत्तीचे प्रकाशन
“नदी म्हणजे केवळ पाणी वाहणारा कालवा नव्हे, तर ती संस्कृती आणि निसर्ग यांना जोडणारा प्रवाह असून जीवन, संस्कृती आणि सभ्यतेचा आधार आहे. नद्या कोरड्या पडल्या, तर त्यासोबत संस्कृती आणि सभ्यतेचाही ऱ्हास होतो.” असे प्रतिपादन जलतज्ज्ञ ज्येष्ठ जलसंवर्धन तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) प्रेक्षागृह…