पालघरच्या बापूगावावर शोककळा:12 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, स्त्रियांचा आक्रोश पाहून काळीज हेलावले; काल झाला होता अपघात
ज्या घरात मंगलकार्याची लगबग सुरू होती, जिथे साखरपुड्याच्या गाण्यांचे सूर उमटणार होते, त्याच घरावर आणि संपूर्ण गावावर नियतीने भीषण घाला घातला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी झालेल्या ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ जणांपैकी १२ जणांवर आज बापूगाव येथील लाखनपाडा येथे एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच रांगेत रचलेल्या १२ सरणांमुळे संपूर्ण परिसराचे काळीज हेलावले…