Headlines

पालघरच्या बापूगावावर शोककळा:12 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, स्त्रियांचा आक्रोश पाहून काळीज हेलावले; काल झाला होता अपघात

ज्या घरात मंगलकार्याची लगबग सुरू होती, जिथे साखरपुड्याच्या गाण्यांचे सूर उमटणार होते, त्याच घरावर आणि संपूर्ण गावावर नियतीने भीषण घाला घातला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी झालेल्या ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ जणांपैकी १२ जणांवर आज बापूगाव येथील लाखनपाडा येथे एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच रांगेत रचलेल्या १२ सरणांमुळे संपूर्ण परिसराचे काळीज हेलावले…

Read More

नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये:उपमुख्यमंत्र्यांची चमचमती कार ठरली चर्चेचा विषय

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता त्याचे परिणाम राजकीय वर्तुळातही दिसू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या दैनंदिन वापरातील वाहनांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही महत्त्वाचा निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे. त्यांच्या नव्या ईव्ही कारची…

Read More

नीट पेपरफुटीचे जाळे नागपूरपर्यंत:नांदेड कनेक्शनमध्ये असलेला ‘आलोक’ सीबीआयच्या रडारवर, तपास यंत्रणेचा मोठा खुलासा

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG) पेपरफुटी घोटाळ्यात आता नागपूर कनेक्शन समोर आहे. या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या रडारवर आता नागपूर येथील ‘आलोक’ नावाचा संशयित मास्टरमाइंड आला आहे. या आलोकनेच किमान एक हजार विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे. दुसरीकडे, याच प्रकरणात रविवारी रात्री उशिरा लातूरच्या नामांकित ‘आरसीसी…

Read More

पुण्यात कचऱ्यावरून राजकारण तापले:कचरा साठलेला नाही, तो साठवला गेलाय, पुणे काँग्रेसचा गंभीर आरोप

पुण्यात 500 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) ठराविक कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी कचरा व्यवस्थापनात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी याबाबत आरोप केले. ‘भूमी ग्रीन’ या कंपनीलाच निविदा मिळावी यासाठी शहरात कचऱ्याची समस्या कृत्रिमरीत्या निर्माण केली…

Read More

खरातची नाशिक रोड तुरुंगात रवानगी:कोठडीतून आज ईडी ताब्यात घेणार, जगदंबा पतसंस्था गैरव्यवहार, संस्थापक आवारेलाही न्यायालयीन कोठडी

सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेतील लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले मुख्य संशयित अशोक खरात आणि पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोमवारी (दि. १८) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने कडक बंदोबस्तात त्यांना सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी न्यायमूर्ती एल. सी. वाडीकर यांनी फेटाळून…

Read More

कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक:50 म्हशी अन्‌ रेड्यांची सुटका, गुदमरून 2 जनावरांचा मृत्यू; वैजापूर-नाशिक महामार्गावर कारवाई

वैजापूर-नाशिक महामार्गावर रविवारी गोवंश आणि जनावरांची अत्यंत क्रूरपणे अवैध वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून पकडला. या कारवाईत कंटेनरमधून ५० म्हशी व रेड्यांची सुटका करून त्यांना जीवनदान देण्यात आले असून, वाहनासह २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, कंटेनरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे कोंबल्यामुळे गुदमरून दोन रेड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला….

Read More

“रिल्स’मध्ये अडकलेला मेंदू पुन्हा डोक्यात नेण्याचे आव्हान:जिल्हा वाचनालयातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत आयोजित कार्यक्रमात तांदळे यांचे वक्तव्य‎

“मानवी संवेदना कुंठित होत चाललेल्या आजच्या काळात, मोबाईलवर दीड मिनिटांच्या रिल्स पाहणाऱ्या तरुण पिढीचा मेंदू केवळ अंगठ्यात येऊन अडकला आहे. वाचन, संवाद आणि पुस्तकांच्या माध्यमातून हा मेंदू पुन्हा डोक्यात नेऊन ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. समृद . “जगातील सर्व क्रांत्या पुस्तकांच्या विचारांतूनच झाल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्यासमोर ब्रिटिशांचे आव्हान होते, तर आता पाश्चात्त्य मानसिकतेचे गुलाम…

Read More

ऑटोचालकावर कोयत्याने भयंकर हल्ला:राजमाता भुयारी मार्ग पुलावरील घटना; पुलावरून खाली पडला म्हणून वाचला, VIDEO

पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज मार्गावरील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर एका ऑटो चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हल्लेखोर रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार करत असल्याचे दिसून येत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात भीतीची लाट पसरली आहे. यासंबंधीच्या…

Read More

भगवान शिव हेच सर्व सृष्टीचे मूळ, परमात्म्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे:अधिक मासानिमित्त संत गजानन महाराज मंदिरात भक्तिला उधाण‎

भगवान शिव हे सृष्टीचे मूळ आहेत. भगवान परमात्म्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. अंत:काळी भगवानाचे नामस्मरण झाले तरी कुकर्म नष्ट होतात.आयुष्यभर संसारात अडकलेल्या माणसाला अंत:काळी देव आठवणार कसा? असा मार्मिक प्रश्न विचारत स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांनी भक्ता . नामस्मरणात मोठी ताकद आहे. मुखामध्ये देवाचे नाव घेण्यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य लागते. ज्यांनी जन्मोजन्मी भजन केले त्यांनाही शेवटच्या क्षणी देव…

Read More

तीन वेळा महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीमध्ये हरलेला मंगळवेढ्याचा महेंद्र हिंदकेसरी:साताऱ्यातील हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत अखेर मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला विजेता‎

सातारा येथे पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये हिंदी केसरीची गदा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचा सुपुत्र ट्रिपल उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांनी उचलून तालुक्याचे नाव जगपातळीवर झळकावले आहे. सोलापूर जिल्ह्यातील व . पृथ्वीराजवर मात करत पटकावली गदा अन् थार कार कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला होता. महेंद्र गायकवाडने एकेरी पट…

Read More