Headlines

नदी ही जीवन, संस्कृती, सभ्यतेचा आधार: डॉ. राजेंद्र सिंह:कार्यक्रम एमआयटी विद्यापीठातर्फे पुनर्जीवित नदी ‘बद्दह’ अनुवादित मराठी आवृत्तीचे प्रकाशन

“नदी म्हणजे केवळ पाणी वाहणारा कालवा नव्हे, तर ती संस्कृती आणि निसर्ग यांना जोडणारा प्रवाह असून जीवन, संस्कृती आणि सभ्यतेचा आधार आहे. नद्या कोरड्या पडल्या, तर त्यासोबत संस्कृती आणि सभ्यतेचाही ऱ्हास होतो.” असे प्रतिपादन जलतज्ज्ञ ज्येष्ठ जलसंवर्धन तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) प्रेक्षागृह…

Read More

निसर्गावरील अत्याचार थांबवण्यासाठी तरुणांनी गतिमान व्हावे:प्रा. संदेश कासार यांचे आवाहन, अकोल्यात ‘द क्राईंग अर्थ’ नियतकालिकाचे प्रकाशन‎

मागील वर्षीची अतिवृष्टी आणि यावर्षी जूनमध्ये पावसाने दिलेली ओढ, हे सर्व हवामान बदलांचेच गंभीर परिणाम आहेत. पृथ्वी आयोगाच्या अहवालानुसार आपण निसर्गावर केलेल्या अत्याचारांमुळे पुढील पिढ्यांचे जीवन अत्यंत कठीण होणार आहे. हे लक्षात घेऊन तरुण पिढीने स्वतःपासूनच पर्यावरण जागृती सुरू करणे गरजेचे आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण लेखांनी सजवलेले ‘द क्राईंग अर्थ’ हे नियतकालिक पर्यावरणपूरक कामात…

Read More

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षक-पालक संवाद गरजेचा:रामराव चव्हाण विद्यालयात पालक मेळावा उत्साहात‎

नागापूर एमआयडीसी येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विद्यार्थ्यांसह पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान येणाऱ्या विविध अडचणी, परीक्षा तयारी, अभ्यासाचे नियोजन तसेच नियमित उपस्थिती याबाबत शिक्षकांनी पालकांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या शंकांचे…

Read More

एआयसीटीईचा निर्णय; यंदा पहिल्या वर्षाचे प्रवेश बंद:गैरप्रकार, शिक्षकांचा अभाव; राज्यातील 12 अभियांत्रिकी महाविद्यालयांना टाळे

वारंवार सांगूनही भौतिक सुविधांचा अभाव, मान्यताप्राप्त आणि तज्ज्ञ शिक्षक नाहीत. गैरप्रकार या सर्व त्रुटींमुळे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) २०२५-२६ शैक्षणिक वर्षात देशातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालय टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ९५० अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. ही महाविद्यालये पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांतील आहेत. एआयसीटीईच्या…

Read More

मालेगावात रखडलेल्या गटार कामांमुळे रस्त्यांवर चिखल आणि पाण्याचे डबके:रखडलेली विकासकामे पूर्ण करून पाण्याचा निचरा करण्याची नागरिकांची मागणी‎‎‎

महिनाभर प्रतीक्षा लावलेल्या पावसाने शहरात हजेरी लावताच मालेगावातील अनेक नागरी वसाहतींमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भुयारी गटारांची रखडलेली कामे, खोदून ठेवलेले रस्ते आणि अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे अनेक भागांत चिखल व साचलेल्या पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक ३…

Read More

रुंदीकरणाच्या कामाने सिन्नर-ठाणगाव मार्गावर अपघाताची भीती:वृक्ष धोक्यात, तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी

सिन्नर-ठाणगाव मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अनेक जुन्या वृक्षांची मुळे उघडी पडली असून ही झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघाताची भीती व्यक्त होत आहे. विकासकामांदरम्यान अनेक वृक्षांच्या बुंध्याभोवतीची माती काढून टाकण्यात आल्याने त्यांची मुळे पूर्णपणे उघडी पडली आहेत. काही ठिकाणी वृक्ष केवळ मुळांच्या आधारावर उभे…

Read More

राज्यात पावसाचा धुमाकूळ; धरणसाठे 26 टक्क्यांवर:नदी-नाले अन् ओढ्यांना पूर, जनजीवन विस्कळीत, मुंबईत ढगफुटीसारखी स्थिती

राज्यभर पावसाचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील नदी, नाले, ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. काही धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. यामुळे सखल भागात पाणी साठल्याने शहरी तसेच ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर अनेक घाट भागात अतिवृष्टी झाल्याने धबधबे ओसंडून वाहत आहेत. यामुळे राज्याच्या पाणीसाठ्यात…

Read More

कन्नड येथील सागर सोनवणे यांना युवा शेतकरी पुरस्कार:कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित

तालुक्यातील ताडपिंपळगाव येथील युवा शेतकरी सागर राजेंद्र सोनवणे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत आयोजित सोहळ्यात राज्यपाल जिष्णूदेव वर्मा आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सागर यांनी प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा, पीएसबी, मेटारायझियम यांसारख्या उच्च दर्जाच्या जैविक खते व कीटकनाशकांची निर्मिती करून सेंद्रिय शेतीला नवी…

Read More

आषाढी वारी:मुर्डेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचे खामगावात उत्साहात स्वागत

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुर्डेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे खामगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. कन्हैया ड्रेसेसचे कृष्णा सोनवणे यांच्या निवासस्थानी दिंडी प्रमुख बालयोगी विद्यानंद महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुर्डेश्वर येथून निघणाऱ्या या मानाच्या पायी दिंडीचे हे चौदावे वर्ष आहे. या दिंडीबाबत माहिती देताना मुर्डेश्वर संस्थानाचे पीठाधीश बालयोगी…

Read More

श्रीराम मंदिर ट्रस्टची आज बैठक:चंपत राययांच्यासह 3 विश्वस्तांच्या सुरक्षा वाढीवर विचार, देणगी चोरीप्रकरणी राजीनामे, चौकशी व नवीन व्यवस्थेवर निर्णय शक्य

राम मंदिराच्या कथित देणगी चोरी प्रकरणातील खुलाशांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक होणार आहे. तत्पूर्वी, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, विश्वस्त अनिल मिश्र आणि मंदिर निर्मितीच्या कामाशी संबंधित गोपाल राव य . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांचीही सुरक्षा वाढवण्यासोबतच काही काळासाठी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्यावर खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घातली जाऊ शकते. चंपत राय…

Read More