Headlines

1000 वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ; पर्यावरणपूरक हरित चांदवडचा संकल्प:8 ते 10 दिवसांत शहरात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार‎

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के नाम” या प्रेरणादायी संकल्पनेला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र संकल्पनेला पुढे नेत ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त येथे १००० वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून चांदवड शहर . उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. १७) येथे या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून, पुढील आठ…

Read More

शेतमालाचे भाव ‘जैसे थे’,पाच वर्षांत रासायनिक खते 40 टक्के महागली:खरिपाला 3,95,449 मे. टन मागणी, 2,92,700 मे. टनांस मंजुरी‎

खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांचे नियोजन सुरू आहे. मात्र, मागील पाच वर्षांत काही रासायनिक खतांच्या दरात ४० टक्के वाढ झालेली असून, शेतमालास मिळणारा भाव ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे . गेल्या पाच वर्षांत डीएपी, युरिया, एनपीके, पोटॅश यांसारख्या खतांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. शेतीमालाचे भाव मर्यादित…

Read More

एसटीला डिझेल दरवाढीमुळे वर्षाकाठी 124 कोटी अतिरिक्त भार; भाडेवाढ नाही:प्रवाशांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी इंधन बचत, ई-बसचाही पर्याय

राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपये १० पैशांची वाढ झाल्यामुळे महामंडळावर वार्षिक तब्बल १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. परिवहन मंत्री तथा . सध्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी प्रवाशांवर तातडीने भाडेवाढ लादली जाणार नाही, अशी ग्वाही मंत्री सरनाईक यांनी…

Read More

विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, आचारसंहिता लागू:स्थानिक यंत्रणेत लगबग; 25 मे रोजी अधिसूचना, 18 जूनला मतदान, 22 ला निकाल

अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना आता कोणत्याही नव्या विकासकामांची घोषणा करता येणार नाही. तसेच, त्यांना सरकारी वाहनांचा…

Read More

अपर आयुक्त राजेश खवले यांचा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना कानमंत्र:यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियोजनाचे महत्त्व सांगितले

नागपूरचे अपर आयुक्त राजेश खवले यांनी अमरावती येथे सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खचून न जाता सातत्याने परिश्रमपूर्वक नियोजनबद्ध रीतीने योग्य अभ्यास केल्यास जीवनात यशस्वी होता येते, असा कानमंत्र त्यांनी दिला. खवले यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव कथन केला. ग्रामीण भागातून येऊन कापडाच्या दुकानात काम करत असताना, माहुली जहागीर ते अमरावती असे दररोज…

Read More

इर्विनमधील परिचारिकांचा संप तासाभरात स्थगित:पीडित परिचारिकेला न्याय मिळवण्याच्या मागणीसाठी आंदोलन

अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयातील (इर्विन) परिचारिकांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. जीएमसीमधील एका पीडित परिचारिकेला न्याय मिळवून देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, तासाभरातच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रशासनाने मागण्या मान्य करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला. या आश्वासनानंतर परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाला इर्विन रुग्णालयासह डफरीन…

Read More

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडीया व्यवस्थापनाला दणका:कर्मचाऱ्यांचे विमानतळ परिसरात जोरदार आंदोलन

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व दडपशाही विरोधात अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघाचे सरचिटणीस सुहास माटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विमानतळाजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे अखेर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड…

Read More

Modern College Professor Suspended Over NEET Paper Leak

नीट २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात पुणे येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना अखेर संस्थेकडून निलंबित करण्यात आले आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने सोमवारी एका आपत्कालीन बैठकीत हा म . प्राध्यापिका मांढरे या गेल्या २४ वर्षांपासून मॉडर्न महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात जीवशास्त्र विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे नॅशनल…

Read More

विरोधकांनी प्रश्न विचारले की ती बदनामी?:मग जनतेने काय मरायचे का? ड्रग्जच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील वाढत्या ड्रग्जच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले आहे. “छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर आणि संतांच्या संस्कारांचा थोर वारसा असलेला महाराष्ट्र कोणाच्या एका वक्तव्याने बदनाम होऊच शकत नाही. पण जेव्हा आम्ही ‘बदनामी’ शब्द वापरतो, तेव्हा ती राज्याच्या गौरवाबद्दल नसते, तर गल्लीबोळात पसरलेल्या ड्रग्जच्या भीषण…

Read More

पालघरमध्ये वऱ्हाडींचा ट्रक अन् कंटेनरची धडक:12 जणांचा मृत्यू, 20 ते 25 गंभीर जखमी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात १२ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर २० ते २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त…

Read More