'राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले':विनायक राऊत यांची सडकून टीका, मुंबईतील परिस्थितीवरून सरकारला धरले धारेवर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकार, भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून त्यांनी मुंबई महानगरपालिका आणि भाजपच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्ग, कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प, रामरक्षा आंदोलन आणि पक्षांतराच्या राजकारणावरही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली….