Headlines

कन्नड शहरामध्ये ७० सीसीटीव्ही:पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्ष सुरू

प्रतिनिधी | कन्नड महाभारतात संजयने युद्धस्थळावरून जसे वार्तांकन केले, तसेच काम आता अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे करतील, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी १६ रोजी सांगितले. कन्नड शहर पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्षाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. सहा कोटी जिल्हा नियोजन विकास निधीतून आमदार संजना जाधव यांच्या मागणीची पूर्तता झाली. शहरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ७० सीसीटीव्ही कॅमेरे…

Read More

बालानगर परिसरात पाणीटंचाई:पाने पिवळी पडून पिके करपू लागली

प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील ववा, वडाळा, कासार पाडळीसह बालानगर परिसरातील शेतकऱ्यांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. शेतीपंपासाठी वीजपुरवठा अनियमित आहे. वाढत्या उन्हामुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेक शेतातील पिकांची पाने पिवळी पडली आहेत. ती करपू लागली आहेत. शेतकरी संकटात सापडला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली…

Read More

राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनी घेतले श्री घृष्णेश्वराचे दर्शन:खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात जाऊन दर्शन

वेरूळ | राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग व खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमीर जेतपूरवाला, शिवालय प्रतिष्ठान वेरूळचे सुनील लोखंडे, सतीश फुलारे, गोविंद काकडे, निखिल आव्हाड, सनी शिंदे व सचिन सुदाम उपस्थित होते. श्री…

Read More

आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आमठणा-खातखेडा रस्त्याचे भूमिपूजन:प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर

बोरगाव बाजार | आमठणा-बोरगाव-खातखेडा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला असून, या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दीर्घकाळापासून या रस्त्याची अवस्था खराब झाल्याने ग्रामस्थ, शेतकरी व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंच सय्यद सत्तार, केशवराव तायडे, अर्जून…

Read More

टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने दहावीतील गुणवंतांचा सत्कार:सिध्दी सोलाटे हिने शाळेतून ९४. २० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला

प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या वतीने येथील विठ्ठल- रखुमाई मंदिरात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्यांना नवप्रेरणा मिळावी यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यामध्ये विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या सिध्दी सोलाटे हिने शाळेतून ९४. २० टक्के गुण घेऊन प्रथम…

Read More

गैरवर्तन करताना तरुणीचा विरोध म्हणून भोंदूने दोघांनाही संपवले:साक्रीतील दुहेरी हत्याकांड; भोंदूबाबा योगेश खैरनारने दिली कबुली

नोकरीत स्थिरता आणि आणि कुटुंबाच्या सुखासाठी मित्र-मैत्रिणीने अमावास्येला पूजा केली. त्यानंतर त्या तरुणीला सोडण्यासाठी जात असताना भोंदूबाबाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने गळा आवळून खून केला. तर दुसरीकडे, अक्षय या तरुणाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून त्यालाही संपवले, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. साक्री तालुक्यातील कासारे गावातील रहिवासी असलेल्या…

Read More

कॅफेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी;भुसावळमध्ये तरुणीचे धर्मांतर अन् निकाह:आरोपीस अटक, मूळची मध्य प्रदेशातील पीडिता आजी-आजोबांकडे राहायची

कॅफेमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची व कुटुंबाला मारण्याची धमकी देऊन तरुणीचे बळजबरीने धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य संशयित नबिल कासम शेख (रा. भुसावळ) याला रविवारी पहाटे अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मूळची मध्य प्रदेशातील असलेली पीडिता भुसावळमध्ये आजी-आजोबांकडे राहून शिक्षण घेत होती. इयत्ता दहावीत असताना…

Read More

30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची पुण्यात घोषणा:नियमात बसणाऱ्या मराठा समाजाच्या सर्वांना कुणबी जात प्रमाणपत्रे

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या समारोप समारंभानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी कर्जमाफीबाबत कॅबिनेट उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. आम्ही प्रशासनाकडून काही अतिरिक्त आणि सविस्तर माहिती मागवली आहे. ती माहिती हाती येताच…

Read More

नागपुरात नितीन गडकरींच्या कार्यक्रमात घोषणाबाजी:पाण्यावर चर्चा करता, मग आमचे प्रश्न कधी सोडवणार? गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा सवाल

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरमध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला आहे. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘जलसंवाद परिषदे’त नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असतानाच, प्रकल्पग्रस्तांनी अचानक जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ प्रचंड गोंधळ उडाला. अखेर सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी तातडीने धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले आणि कार्यक्रमस्थळावरून…

Read More

वीज बिल वसुली करूनही कर्मचाऱ्यांना बोनस मिळेना:तिवस्यात 'कृती समिती' आक्रमक, काळ्या फिती लावून निषेध

तिवसा येथे महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करूनही बोनस न मिळाल्याने तीव्र आंदोलन केले. ‘महाराष्ट्र राज्य कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समिती’च्या वतीने तिवसा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आणि जोरदार घोषणाबाजी करत हा निषेध नोंदवण्यात आला. महावितरण प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिवाळी ते मार्च अखेरपर्यंतची वीज बिल थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास बोनस देण्याचे…

Read More