Headlines

धार्मिक तेढ, तणाव निर्माण‎झाल्यास प्रशासन जबाबदार‎:"वंचित''चा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

प्रतिनिधी | अकोला द्वेषपूर्ण धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार टी राजा सिंह यांच्या सभेनंतर धार्मिक तेढ आणि तणाव निर्माण झाला तर याला जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक जबाबदार राहतील असा इशारा वंचित बहुजन आघाडीने रविवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले. तसेच वंचितने पोलिसाांनाही पत्र दिले. पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने वंचितने नियोजन आंदोलन स्थगित…

Read More

आदर्श महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी:स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राममध्ये द्वितीय क्रमांक‎

प्रतिनिधी । दर्यापूर शिक्षणासोबतच सामाजिक जाणीवा व जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणाऱ्या स्टुडंट पोलिस कॅडेट (एसपीसी) प्रोग्राम अंतर्गत आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. या शैक्षणिक वर्षात प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल शाळेला अमरावती ग्रामीण पोलीस विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या हस्ते आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य…

Read More

मोबाइल चॅटिंगवरून वाद:पत्नीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न, मुलालाही मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा

पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथे मोबाइल चॅटिंगवरून झालेल्या वादातून एका पतीने पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मारहाणीत पत्नीसह मुलगाही जखमी झाला आहे. विजय फुलचंद कारंडे (वय ४०, रा. क्वीन्स गार्डन, पुणे स्टेशनजवळ) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने आपली पत्नी रुपाली (वय ३०)…

Read More

मी कुठेही असलो तरीही माझी नाळ अमरावतीशी जोडलेली असते !‎:न्यायालय इमारत कोनशिला समारंभप्रसंगी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केल्या भावना

प्रतिनिधी । चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ रविवारी ३ मे रोजी झाला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई प्रामुख्याने उपस्थित होते. ​या वेळी बोलताना माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जिल्ह्यासोबत असलेल्या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘मी नागपूर, मुंबई, छत्रपती…

Read More

वादळी वाऱ्यामुळे केळी, पपई‎जमीनदोस्त; संत्र्याचेही नुकसान‎:चांदूर बाजार तालुक्यात घाटलाडकी, रतनपूर सायखेडा येथे नुकसान‎

प्रतिनिधी । अमरावती/ घाटलाडकी शनिवारी २ मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. ढग दाटून आले, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि जोरदार वारा सुटला. जिल्ह्यातील काही भागात वादळाचा जोर जास्तच होता. वादळाचा सर्वाधिक फटका चांदूर बाजार तालुक्यातील फळ पिकांना बसला आहे. रतनपूर सायखेडा येथील शेतातील दीड वर्ष झालेल्या केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात…

Read More

सात्रळमध्ये विजेच्या तारांचा झाडात प्रवाह:शेतकरी थोडक्यात बचावला

प्रतिनिधी | सात्रळ महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभालीच्या दाव्यांमधील फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सात्रळ-रामपूर शिवरस्त्यावरील गट क्रमांक ३०४ मध्ये वीजवाहिन्यांच्या तारा प्रचंड लोंबकळत असल्याने आंब्याच्या झाडात विद्युत प्रवाह उतरला. यात शेतकरी रणजित डुकरे यांना विजेचा धक्का बसला, सुदैवाने त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते या जीवघेण्या संकटातून थोडक्यात बचावले. साई सात्रळ डेअरीचे चंद्रकांत डुकरे यांची या…

Read More

पाचोडला बुद्ध जयंतीनिमित्त मिरवणूक:भगवान बुद्धांच्या मूर्तीची रथातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

प्रतिनिधी | पाचोड तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पैठण चौकात भगवान बुद्धांच्या मूर्तीला भिक्खू ग्यानरिक्षित थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन केले. सभापती राजू नाना भुमरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, मनोज नरवडे यांच्या हस्ते पूजन झाले. यानंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची रथातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. भिक्खू ग्यानरिक्षित थेरो यांच्या…

Read More

विरमगावच्या सरपंच पदी मंगल करपे यांची निवड:एकूण ६०२ मतदानापैकी ३१३ मते मिळाली

प्रतिनिधी |फुलंब्री नुकत्याच पार पडलेल्या विरमगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत श्री भैरवनाथ शेतकरी ग्राम विकास पॅनलच्या उमेदवार मंगल विश्वनाथ करपे यांनी २६ मतांनी विजय मिळवत सरपंच पदावर ताबा मिळविला. एकूण ६०२ मतदानापैकी त्यांना ३१३ मते मिळाली. विजयानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख सोमनाथ करपे, उपसरपंच कारभारी करपे, सुनंदा करपे, वैष्णवी करपे, सविता गायकवाड,…

Read More

कन्नडमध्ये १२७०० क्विंटल मका खरेदी:२ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना पैसे हस्तांतर

प्रतिनिधी |कन्नड शासकीय हमी भावाने कन्नड तालुक्यात खरेदी करण्यात येत असलेल्या मका खरेदीची मुदत ३० एप्रिलला संपुष्टात आली. आजपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर १२७०० क्विंटल मका खरेदी करण्यात आली, अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नीलेश राठोड यांनी दिली. तहसील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राठोड यांनी सांगितले की, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शासकीय हमी भावाने कन्नड…

Read More

सारोळ्यात लोकसहभागाने शेतरस्ता; शेतात जाण्यासाठीची गैरसोय थांबणार:तीन लाखांचा निधी जमा करून केले रस्त्याचे काम, उपक्रमाचे कौतुक‎

प्रतिनिधी | सारोळा सिल्लोड तालुक्यातील सारोळा शिवारात शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात खड्डे आणि असमतल रस्ता यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा संबंधित प्रशासनाकडे मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. मात्र, अडचणींसमोर हार न मानता सारोळा गावातील…

Read More