Headlines

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सरकारला इशारा:शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू

शेतकऱ्यांसह नागरिकांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास शासन का करीत आहे असा सवाल करीत सदर महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शुक्रवारी ता एक सरकारला दिला आहे. पत्रादेवी ते पवनार हा शक्तीपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून जात आहे. मात्र या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना…

Read More

मंत्री झिरवाळांनी हिंगोलीकरांच्या भावना दुखावल्या:कयाधूचे पाणी इसापूर मार्गे नांदेडला वळवण्याच्या विधानावर वाद होण्याची शक्यता

कयाधूच्या पाण्यावरून पालकमंत्री झिरवळांच्या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची चिन्हे, हिंगोलीत मुबलक पाणी असेल तर त्यांनी पाणी न्यावे ः पालकमंत्री झिरवाळ हिंगोली जिल्ह्यातील कयाधूच्या पाणी प्रश्‍नावरर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. “हिंगोली जिल्ह्यातील सिंचनासाठी तसेच पाण्याची तहान भागत असेल तर इतर पाणी त्यांनी पाणी न्यावे,” असे विधान करत त्यांनी शेतकऱ्यांच्या…

Read More

मिसिंग लिंक नाही, तर कनेक्टिंग लिंक म्हणा:मुख्यमंत्र्यांचे आवाहन; तत्कालीन ठाकरे सरकारची 13 कारणे फेटाळली, सुप्रिया सुळेंनाही प्रत्युत्तर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित 13 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या मार्गाला आतापर्यंत मिसिंग लिंक, म्हणून ओळखले जात होते. मात्र उद्घाटनावेळी फडणवीस यांनी याला कनेक्टिंग लिंक, म्हणावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू…

Read More

दगडूशेठ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य:पुष्टिपती विनायक अवतार जयंतीनिमित्त ट्रस्टतर्फे शहाळे महोत्सव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे पुष्टिपती विनायक अवतार जयंतीनिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात दगडूशेठ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. उन्हाच्या काहिलीपासून भक्तांचे रक्षण व्हावे, दुष्काळ व पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे आणि शेतकऱ्यांच्या समस्या सुटाव्यात, यासाठी गणरायाकडे प्रार्थना करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण…

Read More

ज्या राज्यात राहतो ती भाषा आलीच पाहिजे:मंत्री छगन भुजबळ यांची मराठी सक्तीवर भूमिका; सुप्रिया सुळेंच्या पवार Vs पवार भूमिकेवरही भाष्य

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. या प्रकरणी पूर्वीपासूनच लक्ष दिले असते तर ही वेळ आलीच नसती, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या पवार विरुद्ध पवार असा…

Read More

सिंहगड किल्ल्यावरून तरुणीची उडी मारत आत्महत्या:चिंचवड येथील 28 वर्षीय तरुणीचा मृतदेह दरीत आढळला

सिंहगड किल्ल्याच्या तूपखाना परिसरातील बुरुजावरून उडी मारून एका 28 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी चिंचवड परिसरातील बिजलीनगर येथे राहत होती आणि मूळची नांदेडची रहिवासी होती. ती 28 एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी याबाबत…

Read More

पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा:राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण, संचलन ठरले मुख्य आकर्षण

पुणे येथे महाराष्ट्र राज्याचा 67 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजीनगर येथील पोलिस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात राज्याच्या नगरविकास, परिवहन आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलिस दलासह विविध विभागांच्या पथकांनी सादर केलेले संचलन आकर्षणाचे केंद्र ठरले. सकाळी ८ वाजता राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे मैदानावर आगमन…

Read More

अशोक खरातला 4 दिवसांची पोलिस कोठडी:खरातने साप दाखवून कशी घातली भीती? वकिलाने कोर्टाला दिली धक्कादायक माहिती

भोंदू अशोक खरातला आज 5 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी फिर्यादीच्या वकिलांनी अशोक खरातने आपल्या अशिलाला साप दाखवून मृत्यूची भीती दाखवल्याची बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. भोंदू अशोक खरातच्या अडचणींत दिवसागणिक वाढ होत आहे. विशेष तपास पथकाने खरातचा ताबा घेतल्यानंतर आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले….

Read More

परळी नगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा ठरली वादळी:एकतर्फी ठरावांना नगरसेवकांचा विरोध, माईक बंद करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

परळी नगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा न.प. सभागृहात पार पडली. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली नगरसेवकांना अंधारात ठेवुन अनेक ठराव पारित करण्याच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या कार्यपध्दतीस आम्ही विरोध केला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. शहराच्या विकासासाठी घातक ठरणा निर्णयाला विरोध केल्यामुळे नगराध्यक्षांचे मनसुबे धुळीस मिळाल्याचा दावाही विरोधकांनी केला आहे. त्यामुळे ही सर्वसाधारण वादळी ठरली. निवडणुकीनंतर परळी नगरपालिकेची…

Read More

देवेंद्र फडणवीसांनी एकदा तरी सीमा बांधवांचा उल्लेख केला का?:बेळगाव प्रश्नावरून संजय राऊतांचा सवाल, हुतात्मा स्मारकाला तडे गेलेत, सत्ताधाऱ्यांनी तिथे लक्ष द्यावं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा तरी सीमा बांधवांचास एकदा तरी उल्लेख केला आहे का? किंवा भाजपच्या मंत्र्यांनी इतक्या वर्षांमध्ये बेळगाव शिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे, याचा उल्लेख तरी केला आहे का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बेळगावमध्ये मराठी माणसांवर होणारे अत्याचार आणि मराठी दडपण्याचे जे प्रयत्न होत आहेत त्या संदर्भात भाजपचे लोकं…

Read More