वैशाख वणव्याने पशू-पक्षी व्याकूळ, तहानलेल्या जिवांसाठी पुढाकार घ्या:वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटले, घराघरांत कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज
. वैशाख वणव्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. दैनंदिन तापमानाचा पारा सरासरी ४० अंशांच्या पुढे गेल्याने मानवासोबतच आता भटक्या प्राण्यांसह पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी सामाजिक संस्था, संघटना आणि पक्षीप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरी…