Headlines

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर:राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता; भाजप नेत्यांचीही भेट घेण्याचा अंदाज

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर गेल्यात. त्या तिथे राज्यसभेच्या सभापतींची भेट घेऊन आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय त्या भाजप पक्षश्रेष्ठींचीही भेट घेतील असा अंदाज आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उल्लेखनीय विजय मिळवला. त्यानंतर दोन दिवसांतच त्या दिल्ली दौऱ्यावर गेल्या…

Read More

भाजपला सर्वसामान्य जनता नोकर वाटते:मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी केली भाजपवर खरमरीत टीका‎

“मी सत्तेसाठी खासदार झाले नाही, तर जनतेच्या सेवेसाठी खासदार झाले आहे. भाजपला जनता ही आपल्या नोकरासारखी वाटते. दमदाटी, भीती, ईडीचा दबाव आणि जाती-पातीचे गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. पण, तुमच्या आशीर्वादाने मी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत राहणार, कारण जनताच जनार्दन आहे, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला. मंगळवेढा तालुक्यातील खूपसंगी,…

Read More

उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल:शिंदेंनी खासदार संजय पाटलांची भेट घेताच, 'मातोश्री'नेही आपले विश्वासू पाठवले

मुंबईतील एका राजकीय भेटीने राज्याच्या राजकीय वर्तुळात एक नवा चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तातडीने हालचाल करत आपले विश्वासू संजय पाटील यांच्या भेटीला पाठवले. तसेच स्वतःही त्यांच्याशी संवाद साधला. परिणामी,…

Read More

Mandhardev Kalubai & Dhom Devsthan to Get B Class Status

सातारा जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळूबाई देवस्थान आणि धोम येथील श्री नरसिंह सिद्धेश्वर देवस्थानच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या दोन्ही देवस्थानांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रा . वाई-खंडाळा-महाबळेश्वर परिसरातील युवा नेते विराज शिंदे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांनी या दोन्ही देवस्थानांच्या विकासासाठी…

Read More

नवले पूल परिसरात आंदोलनावर बंदी:पुणे पोलिस आयुक्तांचे आदेश, कायदा आणि सुव्यवस्थेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय

मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलने करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी (२ मे) सायंकाळी नवले पूल परिसरात रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे मुंबई…

Read More

Raju Shetti Demands White Paper on Kaloo Dam Project Land Deals

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील काळू धरणावरील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीने साडे चारशे कोटी रुपये पाटबंधारे विभागाकडे वर्ग केल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 मे रोजी घोषित केले आहे. शेतकरी या प्रकल्पासाठी जमीनी द्यायला तयार आहेत. वा . राजू शेट्टी म्हणाले की, शहरातील लोकांना पाणी देण्यास आम्ही तयार आहोत, पण 14 टीएमसीचे मोठे धरण बांधण्याऐवजी छोटे,…

Read More

आता टोल नाक्यावर मिळणार ताजी भाजी:राज्यभरात उभारले जाणार 'कृषी मॉल'; सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने एक अभिनव योजना आखली आहे. राज्यातील सर्व प्रमुख रस्ते आणि महामार्गांवरील टोल नाक्यांच्या परिसरात आता सुसज्ज ‘कृषी मॉल’ उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी लांबच्या बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागणार नाही, तर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना…

Read More

खतांच्या किमती कमी न केल्यास तीव्र आंदोलन:एनएसयूआयचा इशारा; रखरखत्या उन्हातच दिले धरणे‎

खत, बियाणे, कीटकनाशकांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण प्रचंड वाढला आहे. हे दर कमी करण्याची मागणी करीत युवकांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले. काँग्रेसच्या एनएसयूआयतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रखरखत्या उन्हातच आंदोलन करत सरकारला इशारा देण्यात आला. गत वर्षी उन्हाळ्यात मे महिन्याच्या अखेरीस तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर खरीप हंगामात कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टीमुळे…

Read More

पर्यावरण रक्षणाचा ध्यास:निर्माल्यातून सेंद्रिय खत, वृक्षलागवड, संवर्धन करणार, ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम

निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करून ते वृक्षलागवड, संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षणासाठीचा हा उपक्रम ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पातर्फे राबवण्यात येणार असून, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी १० मेपासून सुरू होणार आहे. सध्या पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून वृक्षांची कत्तल दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमींकडून वृक्षारोपण, संगोपनासाठी वर्षभर…

Read More

लेबल प्रसिद्ध ब्रँडचे, आत ‘कास्टिक'चा खेळ:नया अकोल्यात तयार केले नकली साबण, डिटर्जंट पावडर, 72 लाखांचा माल जप्त, चौघांना अटक

आपल्या घरात वापरला जाणारा कपडे धुण्याचा साबण किंवा डिटर्जंट पावडर नामांकित कंपनीच्या पॅकींगमध्ये आहे म्हणून खरोखरच ओरिजनल आहे का, हा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने नया अकोला परिसरात टाकलेल्या धाडीत नामांकित कंपन्यांच्या पॅकेजिंगमध्ये बनावट डिटर्जंट पावडर आणि साबण तयार करून विक्री करणारा मोठा गोरखधंदा उघडकीस आणला आहे. या कारवाईत…

Read More