मे महिन्याच्या ग्रामसभेत जनगणना, पाणीटंचाईवर होणार चर्चा:सीईओ गांधींनी परिपत्रक काढले, स्व-गणनेवर विशेष लक्ष
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मे महिन्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या ग्रामसभांमध्ये जनगणना आणि संभाव्य पाणीटंचाई या दोन महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. पंचायत विभागामार्फत हे परिपत्रक सर्वदूर पाठविण्यात आले आहे. भारत सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र दिनापासून सुरुवात झाली…