Headlines

वांगीत विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या:सिल्लोड ग्रामीण ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद‎

तालुक्यातील वांगी येथील एका शेतकऱ्याने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. गणपत भीमराव काकडे (५०, रा. वांगी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (५ मे) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गणपत काकडे हे आपल्या राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना विषारी औषधाची बाधा झाल्याचे लक्षात येताच, गावातील संतोष काकडे…

Read More

जायकवाडीचा 20 टीएमसी गाळ उपसणार:संभाजीनगरला 10 वर्षे पुरणारा साठा होणार, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर सरकारचा निर्णय; शासनाचा खर्च वाचणार

जायकवाडी धरणाची साठवण क्षमता घटवणारा २० टीएमसी गाळ आता आंध्र प्रदेशच्या धर्तीवर उपसला जाणार आहे. राज्य शासनाचे हे महत्त्वाकांक्षी धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर होणार असून, यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा आणि मराठवाड . जायकवाडीची मूळ साठवण क्षमता १०२ टीएमसी आहे. मात्र १९७६ पासून एकदाही गाळ न काढल्याने धरणात आता २० टीएमसी चिखल साचला…

Read More

एसआयआर:राज्यात 50 लाख बोगस मतदारांविरोधात भाजपचा ‘बंगाल पॅटर्न’

प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अनुभवानंतर आता देशातील निवडणूक प्रक्रियेत “मतदार यादी शुद्धीकरण’ हा विषय केंद्रस्थानी आला आहे. बंगालमध्ये भाजपने ज्याप्रमाणे बोगस आणि बांगलादेशी मतदारांचे जाळे उघड केले तोच पॅटर्न आता महाराष्ट्रात राबवण्याची रणनीती आखली आहे. विशेषतः मुंबई महापालिकेतील ८७ हजार बोगस जन्म दाखल्यांच्या घोटाळ्याचे कनेक्शन थेट मतदार यादीतील घुसखोरीशी जोडले जात आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी…

Read More

राज्याचे एआय धोरण, 1.5 लाख नोकऱ्या:महिला उद्योजकांना सव्वा कोटीचे अनुदान, एआय स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्र राज्याला देशाचे “एआय हब’ बनवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बुधवारी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २९ एप्रिल २०२६ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने “महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण-२०२६’ चा शासन निर्णय निर्गमित केला. या धोरणांतर्गत तांत्रिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी १.२५ कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची तरतूद करण्यात आली…

Read More

जिल्हा परिषदेच्या 'वॉल ऑफ फेम'वर तीन अधिकारी-कर्मचारी सन्मानित:उत्कृष्ट कामगिरीसाठी सीईओ गांधींच्या हस्ते सत्कार

अमरावती जिल्हा परिषदेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मे महिन्यात ‘वॉल ऑफ फेम’वर सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, बांधकाम विभागाचे धारणी येथील सहायक अभियंता राहुल शेंडे आणि पदवीधर शिक्षक वीरेंद्र ब्राम्हण यांचा समावेश आहे. राहुल शेंडे यांना यापूर्वी सन २०२६ चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कारही मिळाला आहे….

Read More

प्रगतीसाठी आदर्श निवडा; पीएसआय चटे यांचे मार्गदर्शन:संघर्ष योद्धा संस्थेच्या करिअर मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद

अमरावती येथील महाजनपुरा येथे ‘संघर्ष योद्धा बहुउद्देशीय संस्थे’ने ‘करिअर मार्गदर्शन सत्र २०२६’ चे आयोजन केले. या सत्रात राजापेठचे पोलिस उपनिरीक्षक रोशन चटे यांनी विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी आयुष्यात एक आदर्श निवडण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांची तत्त्वे आत्मसात केल्यास संकटांवर मात करून यश मिळवता येते, असे त्यांनी सांगितले. दहावी आणि बारावीच्या…

Read More

शेंदुरजनाघाटमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई:60 लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा जणांना घेतले ताब्यात

अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू व्यवसायाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. शेंदुरजनाघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक जप्त केले. या कारवाईत सुमारे ६० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश ग्रामीणचे…

Read More

मेळघाटातील कढावमध्ये पाणीटंचाई, सीईओंचे टँकर पुरवठ्याचे आदेश:टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता 9 वर पोहोचली

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील कढाव येथे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मेळघाटातील टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. कढाव गावात पाण्याचा कोणताही स्थानिक स्रोत उपलब्ध नाही. यापूर्वीच चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू…

Read More

दुष्काळी कामांच्या अनियमिततेवर अनिल देसाई यांचा हल्लाबोल:विभागीय आयुक्तांनी दाद न घेतल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

माण–खटाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विकासकामांतील कथित अनियमिततेच्या आरोपावरून राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद प्रशासनावर थेट हल्लाबोल करत गंभीर आरोपांची सरबत्ती केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या प्रशासकीय मानसिकतेवर देसाई यांनी कठोर टीका करत त्यांची तक्रार विभागीय आयुक्त…

Read More

पालघर अत्याचार प्रकरण:न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करू; ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक व शैक्षणिक मदत मिळणार- डॉ. नीलम गोऱ्हे

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीरपणे दखल घेत, त्यांनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची मनःस्थिती जाणून घेतली आणि न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, “या…

Read More