खाद्यतेल अभियानात सोयाबीन, भुईमूगची निवड:कृषी योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ द्यावा- जिल्हाधिकारी
पीक विशिष्ट उत्पादन मोहिम व विविध कृषी योजनांबाबत आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली. शासनाच्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियान- तेलबिया, कापूस उत्पादकता अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, कृषी समृद्धी योजना या योजना शेती क्षेत्राच्या व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यांची माहिती सर्वदूर पोहोचवून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले….