Headlines

अहिल्यानगर जिल्हा आता कबड्डीची पंढरी- कीर्तीकर:अहिल्यानगरच्या खेळाडूंचे कौतुक; राज्यस्तरीय विजेत्यांचा सत्कार, आता "टीम इंडिया''चे वेध‎

गेल्या पाच वर्षांत अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघाने राज्यात अव्वल स्थान पटकावले असून, येथील खेळाडू आता राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवत आहेत. नगर जिल्हा आता खऱ्या अर्थाने ‘कबड्डीची पंढरी’ बनला आहे, असे गौरवद्गार महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष व माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी काढले. अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पुरुष, कुमार व कुमारी गटातील…

Read More

सुनेत्रा पवारांना आयकर अपील न्यायाधिकरणाचा मोठा दिलासा:32 कोटींच्या कथित व्यवहारातून सुटका! डायऱ्यांतील नोंदी निष्फळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आयकर अपील न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांच्या संदर्भात आयकर विभागाने केलेली कारवाई न्यायाधिकरणाने रद्द ठरवली असून, अघोषित उत्पन्न म्हणून जोडलेली 32.14 कोटी रुपयांची रक्कमही बाद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. हे प्रकरण…

Read More

सभापतींवर आठ महिन्यांतच अविश्वास प्रस्ताव‎:जळगाव बाजार समितीचे राजकारण, सुनील महाजनांची खुर्ची धाेक्यात, 18 पैकी 12 संचालक सहलीवर‎

कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ महिन्यांपूर्वी‎ज्या पद्धतीने सुनील महाजन यांनी राजकीय‎ खेळी करून श्यामकांत सोनवणे यांना सभापती‎पदावरून खाली खेचले होते. सोमवारी अगदी‎त्याच पॅटर्नने सभापती महाजन यांच्याविरुद्ध‎ अविश्वासाचे अस्त्र उपसण्यात आले. सोमवारी 18 पैकी 12 संचालकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे‎ यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला.‎ जळगाव बाजार समितीत जशास तसे उत्तर देण्याचे राजकारण पाहायला मिळत आहे.‎गेल्यावर्षी सुनील…

Read More

हिंगोलीत वाळू माफीयांचे धाबे दणाणले!:वाळू तस्करी करणारा हायवा महसूल विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरातील खुशाल नगर भागात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनासह 15.12 लाखांचा मुद्देमाल तहसीलदारांच्या पथकाने पकडला आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात एका तरुणा विरुद्ध सोमवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हाभरात वाळू घाटांवरून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. या सोबतच बाहेर जिल्ह्यातून विशेषतः…

Read More

बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय? शिवसेनेत प्रवेशाची चर्चा:विधानपरिषदेसोबत विदर्भातील पक्षाचे सर्व अधिकार आणि मंत्रिपदाचीही मागणी

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणाला नवा ट्विस्ट मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत बच्चू कडू कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष…

Read More

विधानपरिषदेसाठी दिल्लीतून आदेश येताच भाजपची अर्धी यादी बाद:केवळ 14 नावांची सुधारित यादी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीला

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीत नऊ जागांसाठी मतदान होणार असून, त्यापैकी पाच जागा भाजपच्या वाट्याला येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी पक्षात जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. अनेक इच्छुकांनी आपापली ताकद लावली असून, पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र…

Read More

बागेश्वरबाबाच्या प्रतिमेला मारल्या चपला:शिवरायांच्या अवमानप्रकरणी उद्धवसेनेची पोलिसांत तक्रार; प्रतिमा पायदळी तुडवली‎

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. बेताल वक्तव्य करणाऱ्या, बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या प्रतिमेला चपला मारत प्रतिमा पायदळी तुडवण्यात आली. तसेच याप्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आली. शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

पंचायतराज व्यवस्थेत एआय आणणार कामकाजात सुलभता- आनंद भंडारी

भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने अमलात आलेली ७३ वी घटना दुरुस्ती आणि त्यातून आकाराला आलेली त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी ग्रामव्यवस्थेचा कणा ठरत आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण, लोकसहभाग आणि पारदर्शकता यामुळे ग्रामीण विकासाला नवी गती मिळाली असून, पंचायतराज व्यवस्था सक्षम ग्रामव्यवस्थेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी…

Read More

प्रलंबित मागण्यांसाठी चांदवडमधील‎कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बेमुदत बंद‎:तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनचे तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन‎

कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील गेल्या ४-५ वर्षांपासूनच्या प्रलंबित अडचणी आणि मागण्यांवर शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने, राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांनी सोमवार (दि. २७) पासून बेमुदत बंद पुकारला आहे. या राज्यव्यापी आंदोलनात चांदवड तालुक्य . या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन चांदवड तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार अनिल चव्हाण, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना…

Read More

जलयात्रेच्या स्वागतावरून वैजापूरमध्ये गटबाजी उघड:सेना-भाजप समोरासमोर, एकाच जलसंवर्धन मोहिमेचे दोन स्वागत सोहळे‎

जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन, शाश्वत पाणी व्यवस्थापनाचा संदेश देणारी ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा सोमवारी दुपारी २ वाजता गंगापूर–वैजापूर रोडवरील शिवपार्वती मंगल कार्यालयात दाखल झाली. आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते ढोल-ताशांच्या गजरात यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. या वेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे, आ. प्रशांत बंब, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, सभापती कविताताई चव्हाण उपस्थित होते….

Read More