Headlines

गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा देण्याची मागणी:हिंगोलीत गौ सन्मान दिवसानिमित्त भव्य पदयात्रा

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा मिळावा आणि त्यांच्या संरक्षण व सन्मानासाठी जनजागृती व्हावी, या उदात्त उद्देशाने आज हिंगोली शहरात ‘गौ सन्मान दिवस’ निमित्त भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी एकत्र येत गोवंश रक्षणाचा एल्गार पुकारला. या पदयात्रेची सुरुवात शहरातील ऐतिहासिक बद्रीनारायण मंदिर येथून करण्यात आली. भगवे ध्वज आणि गोमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर…

Read More

गृहनिर्माण संकुलांतील सांडपाणी, कचरा ऑडिट; दोषींवर कारवाई:प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची घोषणा, नियमांचे पालन आवश्यक

राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलांमधील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा (STP) आणि कचरा विलगीकरणाचे ऑडिट केले जाणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. सिद्धेश कदम हे ‘प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया’ आणि ‘भारत रिसायकलिंग शो’ यांच्या वतीने आयोजित ‘रिसायकलिंग व्हिजन सिरीज २०२६’ परिषदेसाठी…

Read More

ओप्पो F33 सिरीज भारतात लाँच; 50MP सेल्फी कॅमेरा:7000mAh बॅटरी, AI फोटोग्राफी टूल्ससह दोन मॉडेल्स बाजारात

ओप्पो इंडियाने भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतिक्षित ‘ओप्पो एफ ३३’ सिरीज अधिकृतपणे लाँच केली आहे. या सिरीजमध्ये ‘ओप्पो एफ ३३ प्रो ५जी’ आणि ‘ओप्पो एफ ३३ ५जी’ या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. ५० एमपी अल्ट्रा-वाइड सेल्फी कॅमेरा आणि ७००० एमएएच क्षमतेची बॅटरी ही या सिरीजची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एफ ३३ सिरीजमध्ये सेगमेंटमधील पहिला ५० एमपी अल्ट्रा-वाइड…

Read More

जातीय जनगणनेशिवाय आरक्षणाचे उपवर्गीकरण नको; आंबेडकरी चळवळीचा एल्गार:पुण्यात ऐतिहासिक गोलमेज परिषदेत प्रमुख मागण्यांचे ठराव संमत

पुणे येथे झालेल्या ऐतिहासिक गोलमेज परिषदेत आंबेडकरी चळवळीने जातीय जनगणनेशिवाय आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. केवळ अंदाजे आकडेवारीवर आधारित उपवर्गीकरण नको, तर अधिकृत लोकसंख्येच्या आधारावरच ते व्हावे, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत देशात जातीय जनगणना होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया स्थगित करावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंबेडकरी चळवळ कोणत्याही आरक्षणाच्या विरोधात नसून,…

Read More

आज काय केलं, फुस्सससस, फुस्सससस!:परिवहन खातं पंक्चर झालं का? गुणरत्न सदवार्तेंचा प्रताप सरनाईकांसह राज ठाकरेंवर निशाणा

मुंबईतील रिक्षाचालकांसाठी 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला असून, रिक्षाचालकांना तयारीसाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक पवित्रा घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज ठाकरे यांना या मुदतवाढीवरून उपरोधिकपणे डिवचले…

Read More

आरोग्य संपन्न गाव' अभियानासाठी जि.प. सीईओंचे निर्देश:अमरावतीत 'माझं गाव-आरोग्य संपन्न गाव' अभियानासाठी कार्यशाळा

राज्य शासनाच्या ‘माझं गाव-आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी या अभियानासाठी वर्षभराचा कृती आराखडा तयार करण्याचे आणि ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात नुकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सीईओ सत्यम गांधी यांनी आवाहन केले की,…

Read More

खत-बियाणे विक्रेत्यांचा संप पेटला:साताऱ्यात 2500 दुकाने ठप्प, खरीप तयारीला फटका

राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी (खत, बियाणे व कीटकनाशक विक्रेते) आजपासून बेमुदत संप पुकारल्याने सातारा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार कृषी सेवा केंद्रे बंद राहण्याची शक्यता असून, खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना खते व बियाणे उपलब्ध होणार नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. या संपामागील प्रमुख कारण म्हणजे कंपन्यांकडून राबवली…

Read More

सातारा गुन्हेगारी वृत्त:कण्हेर येथे देशी दारूवर पोलिसांचा छापा; 44 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त

सातारा तालुक्यातील मौजे कण्हेर गावच्या हद्दीत कण्हेर ते जांभळेवाडी जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत पोलिसांनी छापा टाकून देशी दारूचा साठा जप्त केला. गुरव यांच्या शेतजमिनीलगत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी दारू (संत्रा)च्या ९० मिलीच्या बाटल्यांचा साठा, ज्याची एकूण किंमत ४४ हजार ६०० रुपये आहे, तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी सतीश बजरंग वाघमळे (वय…

Read More

पुण्यात 'बाल पुस्तक जत्रा २०२६' सुरू:३० एप्रिलपासून गणेश कला क्रीडा मंच येथे ज्ञान-मनोरंजनाचा मेळावा

पुण्यात मुलांसाठी ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ही जत्रा भरवली जाईल. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन…

Read More

नवनीत राणा सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन:विजय वडेट्टीवारांची टीका; पगारापेक्षा जास्त बोलू नये म्हणत रवी राणा यांचाही पलटवार

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्ध आता वैयक्तिक चारित्र्यहननापर्यंत पोहोचले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नवनीत राणा यांच्या चित्रपट क्षेत्रातील पार्श्वभूमीवरून केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद पेटला आहे. या टीकेला उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी वडेट्टीवारांना त्यांच्या मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला असून, “वायफळ बोलून स्वतःचा कचरा करू नका,” असा टोला लगावला…

Read More