Headlines

राज्यातील आरोग्य समित्यांचे होणार पुनरुज्जीवन:सर्वसामान्यांना मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा!

राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती, महिला आरोग्य समिती, ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती या समित्यांची जबाबदारी महत्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगली व परिणामकारक आरोग्य सेवा देण्यासाठी या सर्व समित्यांचे पुनरुज्जीवन होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी…

Read More

माढ्यात विवाहितेचा विजेच्या धक्क्याने संशयास्पद मृत्यू:शिक्षक पतीवर गुन्हा दाखल; माहेरच्यांकडून घातपाताचा संशय

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील विवाहित महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मात्र, विवाहितेच्या या मृत्यूवर महिलेच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून हा घातपात असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी माढा पोलिसांत मृत विवाहितेच्या शिक्षक असलेल्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचे पुढील…

Read More

पुण्यात भीषण अपघात:डंपर आणि होंडा सिटी कारची समोरासमोर धडक, नायब तहसीलदारांचा जागीच मृत्यू

पुण्यातील जुन्नर तालुक्यात प्रशासकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी एक भीषण अपघाताची घटना घडली असून, यामध्ये जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (52 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बनकरफाटा–जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील ‘एस कॉर्नर’ परिसरात एका हायवा डंपर आणि होंडा सिटी कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. कर्तव्यावर असलेल्या एका जबाबदार अधिकाऱ्याचा…

Read More

श्याम मानव सध्या केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात:मुख्यमंत्र्यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई – धीरेंद्र शास्त्री भेटीवरील टीका फेटाळली

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव हल्ली प्रसिद्धीसाठीच काहीतरी बोलतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानव यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेली टीका धुडकावून लावली आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः अखिल…

Read More

खामगाव हादरले!:लग्नात डीजेवर नाचताना चुकून धक्का लागल्याच्या वादातून 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात एका लग्न समारंभादरम्यान क्षुल्लक वादातून 23 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शोएब खान अमीन खान असे मृत युवकाचे नाव असून, तो बर्डे प्लॉट परिसरातील रहिवासी होता. स्थानिक स्मशानभूमीजवळ आयोजित एका लग्नात डीजेच्या तालावर युवक नाचत असताना, शोएबचा धक्का दुसऱ्या एका युवकाला लागला. या अत्यंत…

Read More

महागाईचा चटका; 6 हजारांचा मुरघास 8 हजारांवर:जनावरे विकायची की सांभाळायची, हवालदिल पशुपालकांचा उद्विग्न सवाल‎

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे जुन्नर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून याचा थेट फटका पशुपालकांना बसताना दिसत आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न न . पाणी नसल्यामुळे चारा पिकवणे अशक्य झाले आहे. आधी स्वतःच्या शेतातून काहीतरी व्यवस्था होत होती पण आता बाजारावरच अवलंबून राहावे लागते….

Read More

मोकाट जनावरांमुळे पाथर्डी बाजारामध्ये नागरिकांना त्रास:शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा करावा लागतोय सामना‎

शहरातील आठवडे बाजार हा नागरिकांसाठी आहे की मोकाट जनावरांसाठी, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बुधवारी भरलेल्या आठवडे बाजारात मोकाट जनावरांच्या झुंजीत बाजारासाठी आलेल्या महिलेसह तिच्या कडेवर असलेले चिमुकले बाळ गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात माणसांपेक्षा मोकाट जनावरांचीच संख्या अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. भाजीपाला…

Read More

लोडशेडिंग विरोधात 1 मे रोजी बोंबाबोंब:शेतकरी आक्रमक,‎आंदोलनाचा इशारा‎, सकारात्मक मार्ग‎काढण्याचा प्रयत्न‎‎

पंढरपूर उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना लोडशेडिंगमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी आणि संध्याकाळी होणारे हे लोडशेडिंग तात्काळ बंद न झाल्यास, १ मे रोजी भाळवणी वीज वितरण कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र ””बोंबाबोंब आंदोलन”” छेडले जाईल, असा ठाम इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे. भाळवणी व गार्डी सबस्टेशन अंतर्गत…

Read More

महानगरात बुधवारी राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सवाचे आयोजन:प्रबोधन, मंथन, पुरस्कार, सत्कार,पुस्तक वाटप, विविध कार्यक्रमाचे नियोजन‎

लोककल्याणकारी शासनव्यवस्थेचे प्रणेते, समता आणि मानवतेचा संदेश देणारे महान शासक सम्राट अशोक यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही महानगरात राज्यस्तरीय ‘अशोक पर्व महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यात अनेक पुरोगामी संस . सम्राट अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले, प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, प्रा शैलेश इंगळे, अनिल गवई, विद्याधर मोहोड…

Read More

"सर्वोदय'चे आज अधिवेशन:"देशातील आजची परिस्थिती व सर्वोदयाची भूमिका'' यावर चर्चा‎

महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या घटनेतील तरतुदीनुसार लोकसेवकांचे एक दिवसीय अधिवेशन तथा वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २६ एप्रिलला जे.आर.डी.टाटा इंग्लिश स्कूल खडकी अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन लेखक व पत्रकार श्रीमंत माने यांचे हस्ते व महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रमेश अण्णा दाणे यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. अ.भा.सर्व सेवा संघाचे मंत्री…

Read More