Headlines

पंढरपुरात हायव्होल्टेज ड्रामा:रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप आक्रमक; शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांमुळे विठ्ठलनगरी अशुद्ध झाली म्हणत गोमूत्र शिंपडलं

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील आंदोलनस्थळी आज भाजप कार्यकर्त्यांकडून थेट गोमूत्र आणि चंद्रभागेचे तीर्थ शिंपडून ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळवणवार यांनी हा प्रकार केला आहे. सरकारी कारखाने, बँका आणि दूध संघ डबघाईला आणणाऱ्या लोकांच्या आंदोलनामुळे विठ्ठलाची पंढरी अशुद्ध झाली होती,…

Read More

मेहकरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा बुलंद!:काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला पाठिंबा; शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून महाविकास आघाडीने नगरपालिकेत आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे. काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे मेहकर नगरपालिकेतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले असून महाविकास आघाडीचे संख्याबळ 16 वर…

Read More

जलकुंभाची पाइपलाइन फुटली, 6 हजार कुटुंब सापडले अडचणीत:वल्लभनगर,आनंदनगर, गडगडेश्वरचा भाग पाण्याविना‎

शहरातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या पार्वती नगर परिसरातील जलकुंभातून घरोघरी पाणी पोहोचवणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे आज, सोमवारचा पाणी पुरवठा खंडित झाला. या जलवाहिनीशी सुमारे ६ हजार कुटुंब म्हणजेच २५ हजार लोकवस्ती जोडली गेली आहे. या नागरिकांना पाणी केव्हा मिळणार, हे अनिश्चित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या मते मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत दुरुस्ती कार्य पूर्ण होऊ शकते. परंतु…

Read More

पुण्यात सीएनजी अन् पीएनजी पुन्हा महागले:पेट्रोल आणि डिझेल महागणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच हैराण झालेल्या पुणेकरांना आता महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पुण्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (MNGL) कडून मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली असून सीएनजीच्या दरात किलोमागे 1 रुपयाची, तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ झाली आहे. या…

Read More

स्मार्ट मीटरवरून जयंत पाटील आक्रमक:योजना स्थगित करण्याची मागणी, वाढीव वीजबिलांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात महावितरणमार्फत सुरू असलेल्या स्मार्ट मीटर योजनेमुळे सर्वसामान्य नागरिक, घरगुती ग्राहक आणि व्यापारी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या योजनेमुळे ग्राहकांना अवाजवी वाढीव वीजबिले आणि थकीत दंडाचा नाहक सामना करावा लागत आहे. राज्यातील जनतेची होत असलेली ही आर्थिक लूट थांबवण्यासाठी स्मार्ट मीटर योजनेला तातडीने स्थगिती द्यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे…

Read More

1 लाख 5 हजार ग्राहकांकडे स्मार्ट मीटर:शिवसेनेच्या शिंदे गटाचा एल्गार, ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवा‎

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ५ हजार घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. मात्र, स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी महावितरण कंपनीकडून ग्राहकांना पाठवण्यात येत असलेल्या मेसेजचे सोमवारी तीव्र पडसाद उमटले. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्टमीटर . महावितरण कंपनीकडून ग्राहकांना ‘४८ तास’ मुदतीत स्मार्ट मीटर लावून घेण्याबाबत मेसेज येत आहेत. ‘भारत सरकारने १७ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या…

Read More

चार वर्षांपासून दुर्लक्ष, ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण:सांगवा मेळ ते कोलखेड जहागीर रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय‎

तालुक्यातील ग्राम सांगवा मेळ ते कोलखेड जहागीर या महत्त्वाच्या जोडरस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ता पूर्णपणे उखडून निघाला असून सर्वत्र खडी व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे. . या रस्त्यावरुन दररोज शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र, रस्त्याची खराब अवस्था पाहता अपघाताचा धोका…

Read More

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी समाज, कुटुंब, प्रशासनाने एकत्र यावे:सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार सोहळ्यात पापळकर यांचे प्रतिपादन‎

प्रशासनाची शेतकरी सहाय्यक धोरणे, समाजाचा सहभाग आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यात यश मिळवता येईल, असे प्रतिपादन सोशल फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेला निशुल्क बी-बियाणे वाटप कार्यक्रम तसेच क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार सोहळा दरम्यान पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी केले. आयोजित कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

जिरेवाडीकरांनी 300 मीटर नदीपात्राचे केले खोलीकरण:शासकीय मदतीची वाट न पाहता गावाने लोकसहभागातून अडवले पाणी‎

सततच्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी गावाने शासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागाच्या बळावर जलसंधारणाचा एक नवा आणि आदर्श पॅटर्न निर्माण केला आहे. गावातील नदीवरील सिमेंट बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासोबतच तब्बल ३०० मीटर नदीपात्राचे शास्त्रोक्त पद्धतीने खोलीकरण करण्यात आले आहे. या धडक मोहिमेमुळे आगामी पावसाळ्यात गावात मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढण्यास मदत…

Read More

भाक्षीत रांगोळ्या पुष्पवृष्टी व चिमुकल्यांचे औक्षण:रंगीबेरंगी सजावट आणि विविध उपक्रमांतून शैक्षणिक प्रवासाची सुरूवात‎

भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, औक्षण आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारापासूनच विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल घेऊन त्यांना शाळेची आत्मीय ओळख करून देण्यात आली. विद्यार्थिनींसाठी हातावर मेहेंदी आणि नेलपेंटची…

Read More