Headlines

आरटीई प्रवेशासाठी 2 खोल्यांच्या घरात 4 पालकांचा भाडेकरारनामा:नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी अट शाळेपासून 3 किमीची

नामांकित खासगी शाळेत आरटीई (राइट टू एज्युकेशन) अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी 2 खोल्यांच्या घरकुलात बाहेरगावातील 4 कुटुंबे वास्तव्य करत आहेत, असा भाडेकरारनामा काही पालकांनी शासकीय यंत्रणांना हाताशी धरून केला आहे. हा प्रकार मानूर (ता. कळवण) ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेघर घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या व्यक्तीने व काही पालकांनी केला आहे. त्याचे पुरावेही ‘दिव्य मराठी’कडे आहेत. भाडे करारनामा…

Read More

संभाजीनगर‎च्या पुंडलिकनगरात पोलिसाचा शिवसेना‎ पदाधिकाऱ्यावर चाकूहल्ला:3 जखमी‎, कुटुंबीयांनाही मारले, रात्री उशिरापर्यंत शिवसैनिकांचा ठिय्या‎

पुंडलिकनगर भागात पोलिस कर्मचाऱ्याने शुक्रवारी‎ (२४ एप्रिल) रात्री अकराच्या सुमारास सत्ताधारी‎ शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विकास नरवडे व त्यांच्या‎ कुटुंबावर चाकू हल्ला केला. हल्ल्यात नरवडे यांच्या ‎गालापासून ते मानेपर्यंत चाकूचे वार आहेत. त्यांना ‎खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ‎उपचार सुरू होते. यानंतर रात्री जमाव रस्त्यावर‎ जमला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ‎यातील आरोपी व जखमी असलेले…

Read More

काळजाचा थरकाप!:आंबेनळी घाटात दुचाकी 700 फूट खोल दरीत कोसळली; वाईचे दाम्पत्य जागीच ठार

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात गुरूवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दाम्पत्य दरीत पडून जागीच ठार झालं. मोहन चव्हाण (वय ५५) आणि राजश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी, ता. वाई), असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. घाटातील धोकादायक वळणावर मोटरसायकल बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. पाऊस आणि धुक्यामुळे प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सनी खडतर परिस्थितीत रेस्क्यू…

Read More

उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा इशारा:पारा 42 अंशांच्या पार, पुढील 4 दिवस महत्त्वाचे; हवामान विभागाचा इशारा

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचे सावट असे दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेचा कहर सुरू असून अकोला आणि वाशिम जिल्ह्यांत तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 3 ते 4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही…

Read More

खुनातील आरोपीला ओळखताच नातेवाईकांनीच घेतली धाव:नंतर दिले पोलिसांच्या ताब्यात; हिदायत पटेल हत्या प्रकरणात मोठी कारवाई

वरिष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड घडली असून, या प्रकरणातील फरार आरोपी राजू बोचे याला अखेर साडेतीन महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. नागपुरातील रवीभवन परिसरात ही कारवाई झाली. विशेष म्हणजे, पोलिसांपूर्वीच हिदायत पटेल यांच्या नातेवाईकांनी आरोपीला ओळखून पकडले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण…

Read More

संभाजीनगरात बनावट यूपीआय ॲप वापरून व्यापाऱ्यांना गंडवण्याचा फंडा:3 व्यापाऱ्यांकडून लाखोंची खरेदी, चौथ्या वेळी अडकले; तिघे अटकेत

डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना आता त्यातही फसवणुकीचा नवा फंडा चोरट्यांनी शोधला आहे. बनावट यूपीआय ॲपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा व सायबर पोलिसांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यात योगेश विनायक गव्हाणे (35, रा. कमळापूर, वाळूज), नितीन अनिल मुसमाडे (33, रा. कमळापूर) व रवी सुभाष राठोड (34, रा. बजाजनगर) अशी आरोपींची नावे असल्याची…

Read More

संजय गायकवाड यांना काय आक्षेपार्ह वाटले ते विचारणार:मी सुद्धा पुस्तक वाचेल, शिवीगाळ प्रकरणी मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया

बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते व…

Read More

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील रहिवासी आक्रमक:आरएमसी प्लांट बंद करा; कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द, धायरी आणि प्रेयेजा सिटी परिसरातील बेकायदेशीर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट त्वरित बंद करून महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर हलवण्याची मागणी ‘सिंहगड रोड आरएमसी प्लांट विरोधी कृती समिती’ने केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. समितीच्या म्हणण्यानुसार, हे प्लांट प्रथम महापालिकेच्या हद्दीबाहेर हलवावेत आणि त्यानंतर त्यांच्यासाठी नियमावली तयार…

Read More

बिल्डरांच्या खोट्या हमीपत्रांमुळे पुणेकरांची फसवणूक:टँकरचा खर्च बिल्डरांकडून वसूल करण्याची नगरसेवकांची मागणी

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बिल्डरांकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या फसवणुकीचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. नवीन गृहप्रकल्पांमध्ये पाणीपुरवठ्याची लेखी हमी देऊनही बिल्डर ती पाळत नाहीत, त्यामुळे सोसायट्यांना दरमहा लाखो रुपये खर्च करून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. हा खर्च संबंधित बिल्डरांकडूनच वसूल करण्याची जोरदार मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. नगरसेवक सचिन दोडके यांनी यावर प्रकाश टाकत सांगितले की,…

Read More

श्रीराम फायनान्सकडून 300% लाभांश:चौथ्या तिमाहीत जोरदार कामगिरी; EPS आणि नफ्यात मोठी झेप, AUM ₹ 3 लाख कोटींच्या पुढे

श्रीराम फायनान्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत जोरदार कामगिरी करत गुंतवणूकदारांसाठी आकर्षक अशी घोषणा केली आहे. कंपनीने प्रति शेअर ₹२ दर्शनी मूल्यावर ३०० टक्के म्हणजेच ₹६ अंतिम लाभांश जाहीर करण्याची शिफारस केली असून, यापूर्वी दिलेल्या ₹४.८० अंतरिम लाभांशासह एकूण लाभांश ₹१०.८० प्रति शेअरवर पोहोचला आहे. कंपनीच्या नफ्यात आणि प्रति शेअर उत्पन्नातही (EPS) यंदा…

Read More