Headlines

राज्यभरात शाळांना आजपासून सुरुवात:मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषद शाळांचे कौतुक; विदर्भातील शाळा मात्र 30 जूनपासून उघडणार, वाचा काय आहे कारण?

महिनाभराच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचे मनोबल वाढवले. पनवेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिक्षकांचे कौतुक शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलमधील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेला थेट…

Read More

सोलापूर जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी 18 लाख विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप:मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयपीएस अधिकारी शाळांना देणार भेटी‎

राज्यासह जिल्ह्यामध्ये सोमवार दि. १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात होत आहे. सदर शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक मागणी २१ लाख ९९ हजार ५२२ करण्यात आली होती. तर पुस्तक पुरवठा १८ लाख ८ हजार ९०८ इतका करण्यात आला आहे. सदर पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये उत्सवाच्या वातावरणात पुस्तक वाटपासह गणवेश वाटप करून तसेच…

Read More

मोदींना रोखण्यासाठी देशात आता काँग्रेस हाच एकमेव पर्याय:हर्षवर्धन सपकाळांचा दावा, निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप

देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठे विधान केले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. साम-दाम-दंड-भेद’चा वापर: सपकाळांचा घणाघात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद…

Read More

सेपक टकरॉ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अमरावती जिल्ह्याला उपविजेतेपद:ज्युनिअर व सीनियर सेपक टकरॉ स्पर्धेमध्ये खेळाडूंनी मिळवले यश‎

नुकत्याच नागपूर येथे झालेल्या ”सेपक टकरॉ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत” अमरावती जिल्हा मुलींच्या संघातील खेळाडूंनी यंदाची ज्युनिअर व सिनियर स्पर्धा जोरदार खेळाद्वारे गाजवली. प्रचंड गर्मी आणि समोर बलाढ्य संघ असूनही, अमरावतीच्या स्टार सेपक टकरॉ खेळाडूंनी अद्वितीय खेळ सादर करत राज्यात उपविजेतेपद पटकावले. मुलींच्या ज्युनिअर संघाने लीग सामन्यांमध्ये नाशिक, भंडारा आणि यवतमाळ संघांचा धुव्वा उडवला. त्यानंतर उपांत्यपूर्व…

Read More

वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुळेंच्या हस्ते सत्कार:पोतदारांच्या कार्यकाळत मोर्शी व वरुड रुग्णालयाचा कायापालट

मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय, वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार केला. या वेळी खासदार अमर काळे, खासदार बळवंतराव वानखडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी, मोर्शीच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, डॉ. प्रवीण चौधरी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित…

Read More

कुर्डुवाडीत मोकाट श्वानांचा हैदोस:ड्यूटीवर जाणाऱ्या रेल्वेच्या अधिकाऱ्यावर हिंस्त्र हल्ला, रेल्वे जंक्शन बनले श्वानांचे आगार

रात्रपाळीच्या कर्तव्यावर जाणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याला मोकाट श्वानांच्या टोळीने लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना कुर्डुवाडी रेल्वे स्थानक परिसरात घडली. श्वानांच्या अचानक झालेल्या हिंस्र हल्ल्यामुळे दुचाकीवरून कोसळून रेल्वेचे ट्रेन मॅनेजर प्रभाकर पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न कमालीचा ऐरणीवर आला असून, रेल्वे कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे….

Read More

हर हर महादेव!:5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले, भाविकांसाठी 5 नवे नियम लागू

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दरवाजे तब्बल पाच महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आजपासून भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहेत. मंदिर परिसरामध्ये सुरू असलेली विविध विकासकामे आता अंतिम टप्प्यात आली असल्याने प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिल्याच दिवशी भोलेनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, मंदिर परिसरात…

Read More

लग्नसराई संपली; एसटीची तात्पुरती भाडेवाढ रद्द करण्याची मागणी:वाढ कायम ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

वाशिम | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लग्नसराईच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लागू केलेली तात्पुरती भाडेवाढ तसेच ‘स्वच्छता अधिभारा’च्या नावाखाली आकारण्यात येणारे अतिरिक्त दोन रुपये तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांकडून होत आहे. काही महिन्यांपूर्वी लग्नसराईच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे एसटी महामंडळाने तिकिटांच्या दरात वाढ केली होती. तसेच प्रत्येक तिकिटामागे…

Read More

सिंचनासाठी पाणी घेणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांच्या उपशाला आजपासून ब्रेक:ऑगस्ट अखेरपर्यंत सिंचन योजनांची वीज तोडणार

एल निनो इफेक्टमुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर जूनमध्ये धडक देणाऱ्या मान्सूनच्या पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याचे पाणी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुळा धरणातून सुरू असलेले कालव्याद्वारे सिंचनाचे आवर्तन तत्काळ थांबवण्यात आले. आता धरणावरील उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा सोमवारपासून (१५ जून) खंडित करण्यात येणार आहे. धरणावर सुमारे १ हजार शेतकऱ्यांच्या…

Read More

साकोऱ्यात रात्रीत 7 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास‎:पाच वर्षांनंतर पुन्हा‎ घरफोड्यांची मालिका‎

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शनिवारी मध्यरात्री‎अज्ञात चोरट्यांनी एकाच परिसरातील सात घरे फोडून‎रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो‎रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना‎घडली. पाच वर्षांपूर्वी याच भागात झालेल्या‎घरफोड्यांच्या मालिकेची ही पुनरावृत्ती मानली जात‎असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.‎ माहितीनुसार, उन्हाळ्यामुळे अनेक कुटुंबीय घरांना‎कुलूप लावून गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदा‎घेत चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी…

Read More