मोर्शी कॉलनी परिसरात पाणी टंचाई, गढूळ पाण्याचा पुरवठा:नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन, 5 दिवसांत शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
मोर्शी शहरातील कॉलनी परिसरात नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना अनियमित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसह स्थानिकांनी नगराध्यक्षा प्रतीक्षाताई गुल्हाने यांना निवेदन दिले. येत्या पाच दिवसांत शुद्ध व मुबलक पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्शी शहरात जुन्या आणि नवीन…