Headlines

बोरीवली स्थानकाचा पुनर्विकास करा अन् थेट 'बोरीवली-कल्याण' लोकल सुरू करा:आमदार संजय उपाध्याय यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

मुंबईतील बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय उपाध्याय यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, बोरीवली स्थानक हे मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून, येथे दररोज सुमारे 4.5 लाख प्रवासी ये-जा करतात. पंतप्रधान अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाच्या आधुनिकीकरण व पुनर्बांधणीला…

Read More

फलटणच्या सह दुय्यम निबंधकांवर शासनाची मोठी कारवाई:1,545 दस्तांच्या संशयास्पद नोंदणीप्रकरणी दिपक पवार निलंबित

संयुक्त महाराष्ट्रासाठी कोणी छातीवर गोळ्या घेतल्या हे सर्वांना माहिती आहे. राऊत तुम्ही संयुक्त ​सातारा जिल्ह्यातील फलटण येथील क्रमांक 2 चे सह दुय्यम निबंधक वर्ग-2 दिपक सावळा पवार यांच्यावर महाराष्ट्र शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. महसूल व वन विभागाने 11 जून 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, जानेवारी 2026 ते एप्रिल…

Read More

नवलेवाडीत पर्यावरण संवर्धनाचा काव्यमयी पॅटर्न:125 आंब्यांच्या केशर, हापूस रोपांची लागवड, सोबतीला रंगले काव्य संमेलन‎

एकीकडे वाढते तापमान, कमी होत चाललेली वृक्षसंख्या आणि पर्यावरण संवर्धनाची वाढती गरज याबाबत केवळ चिंता व्यक्त होत असताना, जुन्नर तालुक्यातील नवलेवाडीने मात्र कृतीतून एक नवा आदर्श घालून दिला आहे. वृक्षारोपण आणि साहित्याचा अनोखा संगम घडवत नवलेवाडीतील गायरान परिसरात ‘श्रीनाथ फाउंडेशन नवलेवाडी’ आणि ‘पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण सोहळा आणि कवी संमेलनाचे…

Read More

मुंबईत पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसे विरुद्ध जैन मुनी आमनेसामने:आमच्या नादाला लागू नका; संदीप देशपांडेंचा जैन धर्मगुरू निलेशचंद्रांना थेट इशारा

घाटकोपर आणि दादरनंतर आता चर्नी रोड परिसरातही जैन धर्मीयांकडून रस्त्यांवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जैन धर्मगुरूंमध्ये थेट शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. “तुम्ही मासे खाऊ नका म्हणून इतरांना भाग पाडणे आणि सार्वजनिक रस्ते रंगवणे हा ‘सांस्कृतिक दहशतवाद’ आहे,” अशी घणाघाती टीका मनसे…

Read More

रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस:प्रकृती खालावली; सरकारला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम, उद्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर ठिय्या

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, तिसऱ्या दिवशी रोहित…

Read More

पुरवठा न सुधारल्यास महावितरणला टाळे:सांगोल्यात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा‎

यावर्षी भीषण उन्हाळा जाणवला असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विजेचा प्रश्न गंभीर झाला असून भारनियमन वाढले आहे. तालुक्यात भारनियमन वाढल्याने शेतातील पिके, फळबागा जळून जात आहेत. तसेच जनावरांचे दूध काढण्याच्या वेळी वीज नसल्याने जनावरांच्या धारा हाताने काढण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी…

Read More

कोरिजेनच्या विष बाधेतून मृत्यू पण सर्वच निपजत अवस्थेत होती:हात्तीद येथे पत्नी, मुलांच्या हत्येसह शिक्षकाच्या आत्महत्येचे प्रकरण

पत्नी व दोन मुलांना अन्न पदार्थातून विष घालून स्वत गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शिक्षक योगेश पाटील (रा.हात्तीद,ता.बार्शी) याच्या सुसाईड नोटवरुन त्याने हे का केले? याचे ठोस कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. दरम्यान कोरिजेनच्या विष बाधेतून तिघांचा मृत्यू झाला असेल तर निपचित पडलेल्या अवस्थेत पत्नी, दोन्ही मुले कशी ? असा प्रश्न तपासात समोर येत आहे….

Read More

दिव्य मराठी स्टिंग:सायबर ठग वापरतात मुंबईतल्या चाेर बाजारातील माेबाइलचा डेटा, ई-कचऱ्यातून डेटा चाेरीचे रॅकेट

घरातील फुटलेला किंवा पूर्णपणे डेड मोबाइल भंगार समजून गल्लोगल्ली फिरणाऱ्या भंगारवाल्यांकडे विकणे धोक्याची घंटा ठरत आहे. हा डेड फोन सायबर गुन्हेगारांसाठी कोट्यवधींची खाण आहे. असे मोबाइल तोकड्या किमतीत वा प्लास्टिक वस्तूंच्या बदल्यात विकत घेऊन त्यांची रॅम मुंबईतील कामाठीपुरातीलचोर बाजारातून थेट चीन, हाँगकाँगच्या सायबर माफियांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचा प्रवास ‘दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणला आहे….

Read More

शिव रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा लढा:सावळी दातुरा येथील गजानन कौतीककर यांचे शेत झाले पडीक‎

अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या सावळी दातूरा येथील शेतकऱ्यांची मौजे मुरादपूर व सावळी दातुरा येथे शेतजमीन आहे. या शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी सावळी ते हनवतखेडा ही डांबरी सडक आहे. सदर रस्त्याने गेल्यावर डावीकडे वळून दक्षिणेकडील रस्त्यावरील एका शेतकऱ्याने शेतीची मोजणी केल्यामुळे शिवरस्ता (वहिवाट) बंद झाला आहे. त्यामुळे त्या रस्त्याचा वापर करून शेती करणाऱ्या ७ ते ८ शेतकऱ्यांपुढे…

Read More

अकोल्याला ताशी 32.50 लाख लिटर्स पाणीपुरवठा:मुख्य जलकुंभातून ग्रॅव्हिटी द्वारे संपूर्ण अकोला शहराला वितरण, माेठा दिलासा‎

महान अकोला शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महान येथे उभारण्यात आलेल्या दोन जलशुद्धीकरण केंद्रांतून दररोज शहराला लाखो लिटर्स पाणी पुरवले जात आहे. महान धरणातून ग्रॅव्हिटी द्वारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातील फाऊंटनमध्ये आणले जाते. सर्वप्रथम पाण्यात तुरटी टाकली जाते. त्यानंतर हे पाणी क्लॅरिफायरमध्ये सोडून गाळ मुक्त केले जाते. फिल्टर प्लांटमध्ये पाणी शुद्ध झाल्यावर त्यात ब्लिचिंग पावडर व…

Read More