Headlines

संजय राऊत म्हणजे दुर्योधनाच्या दरबारातील 'दुःशासन'!:'उबाठा'ची अवस्था वापरून फेकून देणाऱ्या डब्यासारखी- नवनाथ बन

संजय राऊत जनतेने तुम्हाला कचऱ्याचा डब्बा म्हणून वापरले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, प्रियांका चतुर्वेदी आणि राहुल गांधी हे तुमचा वापर कचऱ्याचा डब्बा म्हणून वापर करतात. तुमची काय अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात उबाठाला कोणीही वापरते आणि फेकून देते, अशी डब्बासारखी अवस्था झाली आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की,…

Read More

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची मध्यरात्री वर्षावर गुप्त भेट?:राज्यात राजकीय भूकंपाची चिन्हं! मोठ्या राजकीय समीकरणांची सुरुवात

राज्यातील राजकारणाला नवा कलाटणी देणारी एक मोठी चर्चा सध्या जोर धरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या अधिकृत निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा समोर आला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे महत्त्व अधिक वाढले आहे. नेमकी ही भेट का झाली, याबाबत…

Read More

तीव्र उन्हामुळे करा पालेभाज्या, फळांचे सेवन:उन्हाळ्यात महिला, लहान मुलांना ऊन लागण्यासह बळावतात इतर आजार‎

उन्हाच्या झळांमुळे उष्माघाताची शक्यता असल्याने आहारतज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ व महिलांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी दहा वाजेपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत उकाडा असह्य होत आहे. यामुळे या काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तीव्र उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमान ४५ अंशांच्या…

Read More

भाजप म्हणजे 'बकासुराचा' पक्ष!:न्याय हवा असेल तर 'बागेश्वर बाबां'कडे जायचे का? राघव चड्डांच्या भाजप प्रवेशावर राऊतांची जहरी टीका

भाजपकडून सर्वच पक्षांना तोडण्याचा प्रयत्न होत आहे. ते लोकांना घाबरवतात. पण आता बकासुराचा अंत झाला आहे. शिवसेनेबद्दन 29 एप्रिलला सुनावणी झाली नाही तर आम्ही आपली भूमिका मांडू, असे उबाठाचे खासदार संजस राऊत यांनी म्हटले आहे. जर कोर्टाकडे ऐकूण घेण्यासाठी वेळ नसेल तर आम्ही काय बागेश्वर बाबाकडे जावे का? त्यांना कोर्टात आणत आमचे वकील केले तरच…

Read More

विधान परिषद निवडणूक – राष्ट्रवादीत कोट्यवधींच्या ऑफरपासून व्हिडिओपर्यंत लॉबिंग:'एमएमडी' फॅक्टर राबवण्याचीही मागणी

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. एकूण 9 नियमित जागा आणि एका पोटनिवडणुकीसह 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समीकरणे वेगाने बदलताना…

Read More

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माती परीक्षण:महात्मा फुले महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचा उपक्रम, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎

महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरुड येथील रसायनशास्त्र विभागाद्वारे दरवर्षी वेगवेगळे समाजाभिमुख उपक्रम राबवले जातात. रसायनशास्त्र व विज्ञान समाजासाठी किती उपयुक्त आहे, या विषयावर विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. यावर्षी विभागातील पदव्युत्तर रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतीमध्ये जाऊन वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा केले. त्यांची प्रयोगशाळेत सविस्तर चाचणी करून अभ्यास…

Read More

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांच्या उतारवयाची सुरक्षितता हिरावली जातेय:सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया, मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा‎

. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य अंध:कारमय होत आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या उतारवयाची सुरक्षितता हिरावली जात आहे. सरकारने आमच्या अस्तित्वाचा अंत पाहू नये. ३०-३० वर्षे सेवा केल्यानंतर जर आम्हाला म्हातारपणी पेन्शन मिळणार नसेल, तर उतारवयात कर्मचाऱ्यांना रस्त्यावर भाजी विक्रीची वेळ येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया अहिल्यानगरमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली….

Read More

दिव्य मराठी- 6 महिन्यांपूर्वी उबाठातून भाजपमध्ये, तरीही अध्यक्ष कसे केले?:अध्यक्ष गलांडे- पक्षात नवा-जुना असे काही नसते, अनुभवामुळे पद दिले

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती बिनविरोध निवडून आणले आहेत. भाजपने 6 महिन्यांपूर्वी उबाठातून आलेल्या अविनाश गलांडे यांना अध्यक्ष केले. शिवसेनेने उबाठा अन् अपक्षांची मोट बांधून अध्यक्ष बसवण्याची तयारी केली होती. मात्र, भाजपने एका रात्रीत ‘गेम’ फिरवत बहुमताची ‘मॅजिक फिगर’ त्यांच्या बाजूने केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश…

Read More

गलवाडा येथे शिवजयंती उत्साहात:ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

तालुक्यातील गलवाडा येथे बुधवारी (दि.२२) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची गावभर मिरवणूक काढण्यात आली होती. शिवाजीनगर (प्लॉट) येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक गलवाडा गावात पोहोचली. गावात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीनंतर सायंकाळी शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्यानाचे…

Read More

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा आजपासून शंखनाद:30 नद्यांच्या कलशातून घुमणार जलसंवर्धनाचा जागर, अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त उपक्रम

राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि जलसंवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आल . विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीच्या आधारे जलव्यवस्थापनाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प असून, अहिल्यादेवींनी दाखवलेला जलसंवर्धनाचा मार्ग आजच्या…

Read More