Headlines

वाद वाढला:शिंदे यांचे नाव नसल्याने शिवसैनिकांनी फाडली महापालिकेची निमंत्रण पत्रिका, महायुतीतील राजकीय संघर्ष थेट पालिका आयुक्तांच्या दालनापर्यंत

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा जाणीवपूर्वक वगळण्यात आल्यामुळे महायुतीतील राजकीय संघर्ष थेट पालिका आयुक्तांच्या दालनापर्यं . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या कॅबिनेटमध्ये या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊनही मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अगदी आदल्या दिवशी हाच…

Read More

एकजूट बैठकीनंतर 24 तासांत उद्धवसेनेवर फुटीचे ढग दाटले:7 खासदार स्वतंत्र गट स्थापण्याच्या तयारीत असल्याची चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर हाती घेतले असून उद्धवसेनेचे लोकसभेतील ७ खासदार त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होताच उद्धव ठाकरेंनी १४ जून रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. त्यास ९ पैकी ४ खासदार प्रत्यक्ष आणि ५ खासदार एकजुट . कारण रविवारी ५ नव्हे, तर एकाच खासदाराने ऑनलाइन उपस्थिती लावली. चौघांनी बैठकीकडे पाठ फिरवली. गैरहजर राहण्याचे…

Read More

उपराजधानीमध्ये सुरू काय?:नागपूरमध्ये साडेपाच महिन्यांत 8.49 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; 247 गुन्ह्यांमध्ये 320 तस्करांना बेड्या

नागपूर शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत नागपूर पोलिसांनी ८.४९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. १ जानेवारी ते १५ जून २०२६ या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत २४७ गुन्हे दाखल करून ३२० आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक कारवाया गांजा आणि मेफेड्रोन (एमडी) या अंमली…

Read More

मुंबईत लवकरच धावणार ‘देवाभाऊ’ आणि ‘छावा’ टॅक्सी:खासगी कंपन्यांच्या कमिशनला राज्य सरकारचा मोठा शह; वाचा काय आहे योजना?

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. ओला आणि उबेर सारख्या खासगी ॲप-आधारित टॅक्सी सेवांना टक्कर देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. प्रवाशांना कमी दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि टॅक्सी चालकांच्या फायद्यासाठी राज्यात लवकरच ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ आणि ‘छावा टॅक्सी’ सेवा सुरू करण्याची जय्यत तयारी सुरू झाली…

Read More

नशामुक्त भारत अभियान:राज्यस्तरीय निबंध, चित्रकला अन् रील्स स्पर्धा; 21 जूनपर्यंत मोफत नावनोंदणीचे आवाहन

अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत या स्पर्धा घेण्यात येणार असून विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात…

Read More

संतवाणी, अन् वीरगीतांनी रंगली मैफल:बार्शीत अवधूत गांधी यांच्या भक्ती-शक्ती संगम मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ, सोलापूर यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बार्शी शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रख्यात लोकगायक अवधूत गांधी यांच्या ‘भक्ती-शक्ती संगम’ या सांगीतिक कार्यक्रमाला बार्शीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. . बार्शीतील लिंगायत बोर्डिंग येथे झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रारंभी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करत त्यांच्या शौर्य, विचार, आदर्श आणि इतिहासाचे स्मरण केले. यावेळी स्मारक…

Read More

कंत्राटदारांच्या आरोपांनी खळबळ:'आमदारांना 10%, अधिकाऱ्यांना 15%, मंत्रालयात वेगळा हिस्सा'; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटांमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या पहिल्याच अधिवेशनात ठेकेदारांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शासकीय कामांच्या ठेक्यांसाठी आमदार, अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयातील विविध स्तरांवर तब्बल 56 टक्के रक्कम कमिशन व इतर खर्चात जाते, असा गंभीर आरोप ठेकेदारांनी जाहीरपणे केला….

Read More

देशात अन् राज्यात काँग्रेसची तब्येत बिघडली:बच्चू कडूंचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले- एवढा मोठा पक्ष, पण प्रभावी उमेदवार मिळेना

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या सध्याच्या ढासळत्या स्थितीवर थेट बोट ठेवत बच्चू कडू यांनी, महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसची राजकीय तब्येत बिघडलेली दिसते आहे. राज्यामध्ये काही जागा बिनविरोध झाल्या, पण एवढा मोठा पक्ष असूनही काँग्रेसला प्रभावी उमेदवार उभा करता आला नाही. साधा…

Read More

गणेश नाईक कद्रू मनाचे अन् अल्पसंतुष्ट, ते भाजपचे निष्ठावंत नाहीत:एक दिवस नवी मुंबईच्या राजकारणातून संपतील- शहाजीबापू पाटील

नवी मुंबईतील एका शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे शिवसेना नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर शेलक्या शब्दांत घणाघाती टीका केली आहे. गणेश नाईक हे कद्रू मनाचे आणि अल्पसंतुष्ट माणूस आहेत, असा टोला लगावतानाच त्यांनी नाईकांना त्यांच्या भूतकाळातील राजकारणाची आठवण करून दिली….

Read More

सातारा-सांगलीत महायुतीत ‘ऑपरेशन नाराजी’ची चर्चा!:भाजपचे मतदार सुरक्षितस्थळी, एकनाथ शिंदेंची भूमिका ठरणार महत्त्वाची

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण कमालीचे तापले असून सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक विशेष चर्चेत आली आहे. वरवर पाहता महायुती एकत्र असल्याचे चित्र असले, तरी पडद्यामागे सुरू असलेल्या नाराजीच्या राजकारणामुळे सत्ताधारी आघाडीची चिंता वाढली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत असल्याने या निवडणुकीत…

Read More