Headlines

शिक्षण हेच यशाचे खरे साधन:त्याआधारेच ध्येय गाठणे शक्य, नगराध्यक्ष अविनाश गायगोलेंचे प्रतिपादन‎

शिक्षण हेच यशाचे खरे साधन आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बाळगून सातत्य, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर वाटचाल केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी केले. ओतारी समाज संघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच पालकांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या…

Read More

संवादातूनच समृद्धीचा मार्ग; आधुनिक तंत्रज्ञान वापरा:अकोल्यात शेतकरी मित्र मंडळाची वार्षिक आमसभा उत्साहात; शेतकऱ्यांना करण्यात आले तज्ज्ञांकडून मार्गदर्शन‎

कास्तकारांच्या शाश्वत विकासासाठी सतत सेवारत असणाऱ्या स्थानिक ‘शेतकरी मित्र मंडळाची’ वार्षिक आमसभा नुकतीच उत्साहात पार पडली. मंडळाचे अध्यक्ष विनोद साखरकर यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विभागा . सभेच्या सुरुवातीला मंडळाचे संचालक अरविंद देशमुख यांनी स्वागत केले. त्यानंतर सुरेश मुंदडा यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या गत १६ वर्षांतील यशस्वी प्रवासाचा…

Read More

ग्रामसभा गायब, अवैध नळजोडण्यांचा आरोप:प्रशासनाच्या विरोधातच एल्गार, गटविकास अधिकारी व मजीप्राला निवेदन

येथून जवळच असलेल्या करतवाडी रेल्वे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धामणा (बु.) गावातील शेकडो ग्रामस्थांनी गावातील विविध प्रलंबित प्रश्न, कथित अनियमितता, नियमित ग्रामसभा न घेतल्याच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत प्रश . ग्रामस्थांच्या आरोपानुसार, २६ जानेवारी ते १ मे २०२६ या कालावधीत नियमानुसार होणाऱ्या महत्त्वाच्या ग्रामसभा घेण्यात आल्या नाहीत. या ग्रामसभांबाबत नागरिकांना पूर्वसूचना…

Read More

“कर्जमाफी नव्हे, ही तर कर्जवसुली योजना’, जाचक अटी रद्द कराव्यात:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन‎

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या चांदूर रेल्वे येथी . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचया पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी उशीरा दुपारी तहसीलदार पूजा माटोळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना यासंदर्भातील निवेदन सादर करण्यात…

Read More

प्रवेशोत्सव:बागलाणमध्ये 291 शाळांत पुस्तके वाटप, पुस्तके, गणवेशांचे वितरण; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य‎

बागलाण तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव नवगतांचे स्वागत औक्षण, चॉ कलेट देत, पावलांचे ठसे घेत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आले. तालुक्यातील २९१ जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके देण्यात आल्याची माहिती शिक्षण अधिकारी चित्रा देवरे यांनी दिली. मुळाणे जिल्हा परिषद शाळेत आमदार दिलीप बोरसे यांनी नवगतांचे स्वागत केले, तर ताहाराबाद येथील जिल्हा परिषद…

Read More

ठेंगोड्यामध्ये नवागतांचे गुलाबपुष्प देवून स्वागत:ग्रामस्थांकडून शाळेसाठी देणगी देण्याची घोषणा‎

ठेंगोडा जिल्हा परिषद शाळेत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण व गणवेश वाटप तसेच नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीतून गावामधून मिरवणूक काढण्यात आली. गुलाबपुष्प देऊन तसेच ‘पहिले पाऊल’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी बालगोपालांचा विशेष मेळावाही आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच भारती वाघ, उपसरपंच नारायण निकम, दौलत पगार,…

Read More

तोंडापूर परिसरात 400 ड्रममध्ये घातक रसायन:वाघूर प्रकल्पातील पाणी दुषित होण्याचा धोका‎

तोंडापूर परिसरात ४०० ड्रम आणि कित्येक ट्रक भरून घातक, विषारी रसायने नाल्यात फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे रसायन जमिनीत मुरण्यासाठी खड्डा करून त्यातही साठा ओतला आहे. हा नाला पुढे वाघूर नदीला मिळत असल्याने खडकी, ढालगाव आणि जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर प्रकल्पातील पाणी दूषित होऊन ५ लाख नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे….

Read More

सरासरीच्या 26% पाऊस:राज्यात 15 जूनपर्यंत 103 मिमी अपेक्षित, पण 27 मिमीच पाऊस, पेरणीची घाई नक, सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या पीक परिस्थितीच्या आढाव्यानुसार, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात सरासरीच्या केवळ 26 टक्के पाऊस झाला. राज्यात 1 ते 15 जूनपर्यंत 103 मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात फक्त 27.4 मिमी पाऊस झाला. यामुळे सरकारने शेतकऱ्यांना पिकांच्या पेरणीची “घाई न करण्याचा’ सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच मुंबईत जूनच्या पहिल्या दिवसात…

Read More

संभाजीनगरात टोळी गजाआड; 10 तोळे सोने, 4 दुचाकी जप्त:दुचाकी चालवता येत नसल्याने मंगळसूत्र चोराने ‘60-40’ वाट्याने नेमला रायडर

शहरात मॉर्निंग वॉक, रात्रीचा फेरफटका मारणाऱ्या किंवा मंदिरात जाणाऱ्या वृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या कुख्यात अमोल गलाटे टोळीच्या गुन्हे शाखेने अखेर मुसक्या आवळल्या. या टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल गलाटे याला दुचाकी चालवता येत नसल्याने त्याने चक्क ६०-४० टक्क्यांच्या वाटणीवर २ रायडर गुन्ह्यांसाठी सोबत ठेवले होते. चोरीच्या सवयीमुळे स्वतःच्या घरच्यांनीही घरातून हाकलून दिल्यानंतरही या…

Read More

धक्कादायक:घरगुती वाद-कलहातून दीड वर्षाच्या मुलाला फाशी देऊन आईने केली आत्महत्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोळेवाडी येथील मन सुन्न करणारी घटना

तालुक्यातील कोळेवाडी येथे एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला फाशी देऊन स्वतःही गळफास घेत जीवन संपवल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आशा सूर्यभान आंबेकर ( ३१) आणि त्यांचा दीड वर्षाचा मुलगा शिवांश अशी मृत . घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव…

Read More