‘देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न!’:ठाकरे गटातील फुटीनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप, परिसीमन आणि घटनादुरुस्तीसाठी विरोधक लक्ष्य?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटातील फूट ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून देशात विरोधी पक्ष कमकुवत करण्याच्या मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी…