Headlines

मनाचा मोठेपणाच उदात्त कार्याच्या प्रेरणा देतो:वऱ्हाडी हास्य कवी ॲड. खेळकर यांचे प्रतिपादन‎

इतरांचा सन्मान करण्यासाठी मनुष्याकडे मनाचा मोठेपणा लागतो. या मोठ्या मनानेच उदात्त कार्याच्या प्रेरणा मिळून समाजात उल्लेखनीय कार्य घडून येत असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्य कवी ॲड. अनंत खेळकर यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने आयोजित ५७ व्या विचारमंथन, मार्गदर्शन, सन्मान सोहळा तथा स्नेहमिलन मेळाव्यात ते अध्यक्षस थानावरून बोलत होते. या सोहळ्यात रिधोरा येथील सरपंच…

Read More

महसुलच्या धडक कारवाईने रस्त्याचा वाद आला संपुष्टात:मोर्शी तालुक्यातील कोपरा-अहमदपूर काम युद्धपातळीवर‎

तालुक्यातील मौजे कोपरा आणि मौजे अहमदपुरच्या सीमेवरील गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला एका क्लिष्ट पाणंद रस्त्याचा वाद संपुष्टात आला आहे. मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे व महसूल प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे यातून योग्य मार्ग निघाला. सध्या रस्त्याचे बांधकाम सुरु असून परंपरागत रस्ता मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या गतीमान कारवाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून तहसीलदार आणि…

Read More

भगवंताने केलेल्या विविध लीला प्रत्येक मनुष्याला संदेश देतात- लखन महाराज:जयभवानीनगरमधील सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता‎

सिल्लोड शहरातील जयभवानीनगर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय शिवमहापुराण कथा या कार्यक्रमाची लखन महाराज पाटील चिंचखेडेकर यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. या अखंड हरिनाम सप्ताहा दरम्यान होत असलेल्या दररोजच्या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत होती. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी लखन महाराजांनी उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दहिभात, वैकुंठी…

Read More

तीन महिन्यांमध्ये उखडला सिमेंटचा रस्ता:शिवडीतील उड्डाणपूल कामावर प्रश्नचिन्ह, रेल्वे गेट बंद केल्यानंतर तयार केलेल्या दीड किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य‎

निफाड-चांदवड मार्गावरील शिवडी येथील मध्य रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारणीच्या कामासाठी रेल्वे गेट बंद करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी म्हणून तयार करण्यात आलेला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या तीन महिन्यांतच . शिवडी येथे उड्डाणपूलाचे काम सुरू होणार असल्याने १ एप्रिलपासून रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे रेल्वे गेटच्या पूर्वेकडील पुलाखालून…

Read More

डीएमआयसीतील रासायनिक सांडपाणी नाल्यात:विहिरींच्या पाण्याचा रंग हिरवा, दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, शेतीची सुपीकता घटत आहे‎

. करमाड डीएमआयसी परिसराचा वेगाने विस्तार सुरू आहे. दुसरीकडे वाढते प्रदूषण, दूषित पाणी, रासायनिक कचरा यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. औद्योगिक सांडपाणी थेट नाल्यांत सोडले जात असल्याचा आरोप आहे. परिसरातील विहिरी, बोअरवेल, भूजल स्रोत धोक्यात आले आहेत. अनेक ठिकाणी हिरवट रंगाचे पाणी दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही उद्योगांतून रासायनिक पाणी उघडपणे नाल्यांत सोडले जाते….

Read More

दिव्य मराठी मुलाखत:दिव्य मराठी प्रश्न- रोबोटिक युद्धासाठी भारत सध्या किती तयार आहे? नुवाल- लवकरच ‘ह्युमनॉइड रोबोट' व ‘भार्गवास्त्र' तैनात होणार आहे…

आधुनिक जगातील युद्ध आता केवळ आमनेसामनेची पारंपरिक लढाई राहिलेले नाही. ते पूर्णपणे ‘रोबोटिक’ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित झाले आहे. अशा बदलत्या युद्धभूमीवर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी नागपूरची ‘सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ कंपनी संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणत आहे. गेल्या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ज्या स्वदेशी वेपनाइज्ड (सशस्त्र) ड्रोन ‘नागास्त्र’च्या मदतीने भारतीय सैन्याने पाकिस्तानचा डाव…

Read More

शिवराज मोटेगावकरने स्पेशल बॅचच्या 150 विद्यार्थ्यांना गेस पेपर दिला:ठराविक विद्यार्थ्यांना 580 पेक्षा अधिक गुण दाखवल्याची माहितीही उघडकीस

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरसीसी क्लासेसमध्ये सराव परीक्षेत ठराविक विद्यार्थ्यांना ५८० पेक्षा जास्त गुण दाखवले जायचे. त्यानंतर या विद्यार्थ्यांची एक वेगळी ‘स्पेशल बॅच’ बनवण्यात आली. या ‘एम्स टॉपर’ नावा . सीबीआयचे तपास पथक सध्या लातुरात ठाण मांडून आहे. आतापर्यंत ज्यांची चौकशी झाली, ते सर्व विद्यार्थी मोटेगावकरच्या आरसीसी…

Read More

संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर संशोधनासाठी फेलोशिप:अमरावती विद्यापीठाकडून संशोधकांना आर्थिक सहाय्य

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे श्री संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर संशोधन करणाऱ्या एका संशोधकाला फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे. दानदाते श्री वासुदेवराव देशमुख यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधीतून ही योजना राबवली जात आहे. या फेलोशिप अंतर्गत, संत गुलाबराव महाराजांचे जीवन, साहित्य, विचार, तत्वज्ञान, शिक्षण आणि कवितेवर आचार्य पदवीसाठी (पीएच.डी.) संशोधन करणाऱ्या एका संशोधकाला प्रति वर्ष ६…

Read More

आरबीएसकेमुळे ८७९ बालकांना नवसंजीवनी:अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) प्रभावीपणे राबवला जात आहे. या योजनेतून आतापर्यंत ८७९ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. याशिवाय, ४५४७ इतर विविध शस्त्रक्रिया करून हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक बालकांना यामुळे नवजीवन मिळाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. शासनाचा हा उपक्रम हजारो बालकांसाठी…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जागर:कै. नारायणराव उजळंबकर वाचनालयात जयंती उत्साहात साजरी

स्थानिक कै. नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या अजोड राष्ट्रकार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सपकाळ हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भोयरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या…

Read More