Headlines

ठाकुरांच्या 71 मतांवर नजर:ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा भाव वाढला; मतांसाठी भाजप-शिवसेनेची धावपळ

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार हालचाली सुरू असताना ठाणे विधानपरिषद मतदारसंघात वेगळंच राजकारण रंगताना दिसत आहे. ठाण्याची जागा कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये पडद्यामागे मोठी चुरस सुरू असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय समीकरणात वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडी अर्थात बविआच्या 71 मतांना मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे….

Read More

नागपुरात डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे 'एक पेड नाती के नाम' उपक्रम:10 उद्यानांमध्ये भारतीय वंशाच्या वृक्षांचे रोपण करणार, नितीन गडकरींच्या हस्ते शुभारंभ

नागपूरमध्ये डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे ‘एक पेड नाती के नाम’ या वृक्षारोपण आणि संवर्धन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, जिथे पर्यावरणप्रेमी नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षांचे वाटप करण्यात आले. नागपूर आणि विदर्भातील…

Read More

संजय राऊतांना खिमा पाव प्रिय, वडापाव नकोसा:मोदी पाणी प्या म्हणाले तर राऊतांना झिंग चढली, नवनाथ बन यांचा हल्लाबोल

संजय राऊत यांना अलिकडच्या काळात खिमा पाव जास्त प्रिय वाटायला लागला आहे. त्यांना वडापाव प्रिय वाटत नाही. मत्स पावच्या माध्यमातून कोळी बांधवांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असतील तर संजय राऊत यांना काय समस्या आहे, मत्सपावचे स्वागत त्यांनी करायला हवे. कोकणी, कोळी माणसांना विरोध करत खिमा पाव खाणाऱ्यांची साथ राऊत मिळवू पाहत आहेत, असे भाजप…

Read More

उष्माघाताने माझा बळी गेला तर फडणवीस जबाबदार:एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचा, 30 मे पासून उपोषण करणार- मनोज जरांगे

आंतरवालीमध्ये 30 मे रोजी रखरखत्या उन्हात बाजेवर बसत आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार ना काही जे होईल ते होईल. आता उष्माघाताने माझा बळी गेला तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गेला, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आता होणारे उपोषण खूप कडक होणार आहे. वेदनांचा काहीही विचार मी करणार नाही….

Read More

पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG दरांचा भडका:रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार? मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येही दरवाढ

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना आता सीएनजीच्या दरवाढीने सर्वसामान्य वाहनधारकांची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वारंवार वाढल्यानंतर आता सीएनजीचे दरही भडकले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्याने रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता निर्माण…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘थीम पार्क’ अन् ‘पर्यटन सर्किट’च्या घोषणा हवेतच, जन्मभूमीतच सावरकर पार्कची दशा

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूरमध्ये ‘सावरकर थीम पार्क व संग्रहालय’ आणि देशातील पहिले ‘सावरकर पर्यटन सर्किट’ उभारण्याची घोषणा चार वर्षांनंतरही कागदावरच राहिली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी पर्यटन महामंडळाकडून 100 कोटींच्या निधीची घोषणा होऊन पहिल्या टप्प्यातील 10 कोटी मंजूर झाले होते. या ठिकाणी वस्तू संग्रहालय, आकर्षक सजावटीसह उद्यान देखील उभे राहिले. परंतु,…

Read More

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठीच्या प्रवास प्रबोधनाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याकरिता सुरू असलेल्या प्रवास प्रबोधनाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशत माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्व सामान्यांना कळेल, अशा सोप्या भाषेत प्रबोधन करणारे जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून, वंचित घटकाला न्याय देण्याचे कार्य केले. अण्णा भाऊ साठे यांनी अनेक…

Read More

खरीप तोंडावर असतानाही जिल्ह्यात 46 टक्केच झाले पीक कर्ज वाटप:कर्जमाफीचा संभ्रम; खासगी बँकांकडून कमी पुरवठा‎

. खरीप हंगाम तोंडावर असतानाही पीक कर्ज वितरणाचे चित्र चिंतेत टाकणारे आहे. यंदा १३२० कोटींच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६११ कोटी ४० लाखांचे वितरण करण्यात आले आहे. वितरणाची टक्केवारी ४६.३२ आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे चित्र स्पष्ट झाले नसून अनेकांनी कर्ज न भरल्याने थकीत आहेत. याचा परिणाम कर्ज वितरण प्रक्रियेवर दिसून येत असल्याचे कृषी…

Read More

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केले पथसंचलन

आगामी बकरी ईदच्या (ईद ऊल जुआ) अनुषंगाने अकोला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, यासाठी अकोला पोलिसांच्या वतीने बुधवारी (दि. २७) शहरात पथसंचलन करण्यात आले. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर विभाग) सुदर्शन पाटील यांच्या नेतृत्वात सायंकाळी ४:३० वाजता हा रूट मार्च काढण्यात आला….

Read More

मुख्य चौकातील वाईन‎ शॉपी बंद करण्यात यावी:राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन

अमरावती शहरातील राहाटगाव चौक, विद्युत नगर चौक, तपोवन चौक अशा मुख्य व गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या वाईन व बिअर शॉपींमुळे परिसरात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई करावी व उपद्रवी प्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त कार्यालय…

Read More