शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये फेऱ्या वाढल्या; अद्यापही कर्जमाफीबाबत संभ्रम कायम, निकष व लाभार्थी यादी जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने अंजनगाव बारी परिसरातील शेतकरी सध्या बँकांच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत. कर्जमाफीच्या निकषांबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये दररोज चौकशीसाठी गर्दी वाढत आहे. यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने…