Headlines

तिवस्यात काँग्रेसचे इंधन दरवाढ, महागाईविरोधात आंदोलन:मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा उपरोधिक निषेध

तिवसा येथे काँग्रेस कमिटीने शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात तीव्र आंदोलन केले. केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलिंडर तसेच रासायनिक खतांच्या सतत वाढत असलेल्या दरवाढीचा यावेळी निषेध करण्यात आला. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. केंद्र सरकारने एका महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ केल्याने सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट…

Read More

श्री संत गजानन महाराज पालखीचे 1 जुलैला मराठवाड्यात आगमन:700 वारकऱ्यांचा असेल सहभाग, स्वागतासाठी आतापासूनच नियोजन

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या ५७ व्या आषाढी वारी पायदळ दिंडीचे १ जुलै रोजी मराठवाड्यात आगमन होत आहे. सुमारे ७०० वारकरी या दिंडीत अत्यंत शिस्तबद्धरीतीने सहभागी होणार आहेत. पालखी सोहळा येत्या १ जुलै २०२६ रोजी सेनगांव तालुक्यातील पानकनेरगाव येथे पोहोचेल. येथे श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत…

Read More

विनायक पाटलांसह 25000 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश!:विरोधकांनी येऊन हा महासोहळा पाहावा, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सणसणीत टोला

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट मेळाव्यात एक लक्षवेधी पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह तब्बल 25 हजार कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची राजकीय ताकद आता कैक पटींनी वाढली आहे. लातूरमध्ये…

Read More

एनडीएच्या 150 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न:डॉ. किरण बेदी यांच्या उपस्थितीत 353 कॅडेट्स उत्तीर्ण होणार

खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १५० व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी हबीबुल्लाह हॉलमध्ये अत्यंत दिमाखदार आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या विशेष सोहळ्याला पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल, निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या ऐतिहासिक १५० व्या तुकडीमधून एकूण ३५३ कॅडेट्स उद्या, ३० मे २०२६ रोजी उत्तीर्ण (पासिंग आऊट) होणार…

Read More

मराठा आरक्षणावर समाधानकारक काम:राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा; जिल्हाधिकाऱ्यांना तालुका पातळीवरील सॅम्पल केसेस शोधण्याचे निर्देश

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाधानकारक काम झाल्याचा दावा केला. मराठा आरक्षणाच्या बाबतीत मिसिंग लिंक शोधण्याच्या बाबतीत अनेक ठिकाणी समाधानकारक काम केले आहे. पण या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याला जाऊन सॅम्पल केसेसचा आढावा घेतला पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे? हे समजून घेतले पाहिजे. ग्राऊंड रिपोर्ट काय…

Read More

गडकरी, दादोजी कोंडदेव पुतळ्यांच्या पुनर्स्थापनेची मागणी:सकल ब्राह्मण समाजाने पुण्याच्या महापौरांना दिले निवेदन

श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी आणि गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाजाने केली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांना निवेदन देण्यात आले. जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानातून गडकरींचा पुतळा हटवण्यात आला होता, तर दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हलवण्यात आला होता. या निवेदनात, छत्रपती संभाजी…

Read More

'स्मार्ट मीटर' लावण्यासाठी महावितरणची नवी खेळी:मीटर स्लो किंवा नादुरुस्त ठरवून ग्राहकांवर दबाव; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा आरोप

वीज वितरण कंपनीने गत काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. या प्रकरणी अनेक ग्राहकांना त्यांच्या वीज वापरात कोणताही मोठा बदल नसताना त्यांचे मीटर तपासण्यासाठी पथके पाठवली जात आहेत. विशेषतः मीटर स्लो किंवा नादुरुस्त ठरवून या प्रकरणी ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने…

Read More

नाशिकच्या जागेवर भाजपचे गणेश गिते ठाम‎:मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी खलबते‎, दोन कट्टर समर्थक उमेदवारीवरून आमनेसामने

महायुतीमधील जागा वाटपाचा ‎नाशिक आणि जळगाव या दोन‎ जागांवरून महायुतीतील घटक‎ पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू ‎आहे. अशातच कुंभमेळा मंत्री गिरीश ‎महाजन यांचे खंदे समर्थक गणेश गिते‎ यांनी नाशिकच्या जागेवर थेट दावा‎ ठोकल्याने राजकीय हालचालींना वेग‎ आला आहे. नाशिकची जागा‎ भाजपलाच सुटणार असल्याचा ठाम‎विश्वास व्यक्त करत माध्यमांशी‎ संवाद साधताना गणेश गिते यांनी ‎निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले‎…

Read More

जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र विद्युत विभाग स्थापनेवर लवकरच निर्णय:संघटनेची सरकारसोबत 7 वर्षानंतर झाली बैठक, इतर मागण्यांवरही झाली चर्चा

राज्यातील जिल्हा परिषदेसाठी लवकरच स्वतंत्र विद्युत विभाग स्थापनेवर निर्णय घेण्याचे आश्‍वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी ता. 27 मुंबईत झालेल्या अभियंता संघटनेच्या बैैठकीत दिले आहे. विशेष म्हणजे तब्बल सात वर्षाच्या पाठपुराव्यानंतर हि बैठक झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत अभियंत्यांची प्रश्‍न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. रिक्तपदे भरणे, 2005 पुर्वी जाहिरात असलेल्या पण नियुक्ती…

Read More

अमोल कोल्हेंची 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका बंद होणार?:नव्या मालिकेच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या प्रसारित होत असलेली “मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले” ही मालिका बंद पडणार का, असा सवाल आता प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. दररोज संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेच्या वेळेत स्टार प्रवाहने नव्या मालिकेची घोषणा केल्याने सोशल मीडियासह प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर…

Read More