Headlines

अजित पवारांचा पक्ष भविष्यात टिकणार नाही:भुजबळ ते पटेल पश्चाताप करत असतील, विधान परिषदेसाठी विशिष्ट भाग सोडला तर संख्याबळ नाही- संजय राऊत

अजित पवार यांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहत नाही. आता छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, प्रफु्ल पटेल, धनंजय मुंडे हे आता पश्चताप करत असतील की का अजित पवारांना शरद पवारांपासून दूर करत भाजपसोबत आणले, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.आता हे पाहणं आमचे राजकीय काम आहे. महायुतीचे लोकं निवडून आलेले आहेत त्यामुळे…

Read More

चर्चेनंतर जरांगे पाटील उपोषणाला बसणार नाहीत:सातारा गॅजेटमध्ये अडचणी, मविआने अडीच वर्षात काही केले नाही, आम्ही आरक्षण दिले- राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार ज्या काही उणिवा दिसत आहे त्यावर आज त्यांच्याशी चर्चा करू. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर करता येतील. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पाऊल टाकलेले आहे. मला विश्वास आहे की सरकारी भूमिका समजून घेतल्यावर ते काही उपोषण करणार नाही, असा मला विश्वास आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

Read More

मुलगा अन् सावत्र आईचे अनैतिक संबंध; दाेघांनी केली आत्महत्या:दोघांना गत आठवड्यात पोलिसांनी आणले शोधून

सावत्र आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या अनैतिक प्रेमसंबंधांचा शेवट गुरुवारी (२८ मे ) अंबाजोगाई येथे झाला. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन केले. प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. केज तालुक्यातील सोनीजवळा येथील साहेबराव पवार (४०) यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला…

Read More

गवळीशिवरा येथे वीज तारा लोंबकळल्या, जीव धोक्यात:विजेच्या तारांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी‎

गवळीशिवरा (ता. गंगापूर) येथील गाजर मळ्यातील शेतवस्तीवर राहणारे शेतकरी राजेंद्र गवळी यांच्या गट नंबर २१ मधील शेतातील विद्युत खांबावरील लोंबकळत असलेल्या विजेच्या तारेमुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर धोका निर्माण झाला आहे. सध्या शेतीशिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. अशावेळी डोक्यावरून जाणाऱ्या विजेच्या तारा विद्युत खांबावर लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तत्काळ…

Read More

राज्यसभेसाठी भुजबळांचे लॉबिंग? पुतण्यासाठीही मंत्रिपदाची मागणी:इतरांच्या मुलांना संधी, भुजबळांना का नाही? राजकारण पेटलं

राज्यातील राजकारणात सध्या विधानपरिषद निवडणुका, जागावाटप आणि सत्तासमीकरणांच्या चर्चांदरम्यान आणखी एका राजकीय हालचालीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यात जबाबदारी स्वीकारण्यासाठी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी पडद्यामागून लॉबिंग सुरू केल्याची माहिती…

Read More

कॅनमध्ये डिझेल न दिल्याने पंपावर राडा, मालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण:पाचपुते बंधूंसह 15 जणांवर गुन्हा, तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण‎

तालुक्यातील काष्टी येथे भरदिवसा एका पेट्रोल पंपावर ‘कॅन’मध्ये डिझेल दिले नाही म्हणून मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत केबिन आणि काचांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे बंधू दीपक ना . बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास काष्टी येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची…

Read More

पुण्यात दापोडी ते हडपसर मृत्यूंचं थैमान:विषारी दारूने 13 बळी, हातभट्टी माफियाचा काळा धंदा उघड; पोलिसांवर दुर्लक्षाचे आरोप, आरोपी अटकेत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूंची मालिका सुरू झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. आतापर्यंत 13 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक नागरिक विविध रुग्णालयांत गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ या भागांत ही घटना घडली असून, स्पिरिटयुक्त हातभट्टीची दारू प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे….

Read More

प्रेमसंबंधाच्या संशयातून‎तरुणाची आत्महत्या‎:आरोपींवर गुन्हा दाखल‎करण्याची प्रक्रिया सुरु‎, वैराग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा‎

बार्शी तालुक्यातील पिंपरी (आर) येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून एका २१ वर्षीय तरुणाला वारंवार मारहाण व मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला असून, या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वैराग पोलिस . या प्रकरणी मृत तरुणाचा भाऊ हमराज राजुद्दीन पठाण यांनी वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार,…

Read More

गुरुकुंजात जीवन विद्यासंस्कार शिबिर‎:विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, राष्ट्रप्रेमाच्या जागृतीची गरज- गोपाल उपाध्याय

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरण्याचे आवाहन त्यांनी केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ अंतर्गत गुरुकुंज येथे आयोजित करण्यात आलेल्या जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद…

Read More

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’अभियान सुरू:पंचगव्हाण येथे विविध आजारांची तपासणी, दंत, नेत्र आणि ईसीजी तपासणीसह नागरिकांना मोफत आरोग्य कवच‎

राज्यभरात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर . काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या शिबिरामध्ये पंचगव्हाण आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे रीतसर उद्घाटन करण्यात…

Read More