Headlines

मोहोळ तालुक्यात चारा म्हणून जनावरांना आंबा:आधी वादळी वारा अन् आता कर्नाटकातील आवकेमुळे आंबा उत्पादकांना फटका‎

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आंब्याला मोहर कमी लागल्याने आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. अशा परिस्थितीतच मागील दीड महिन्यापूर्वी परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबा आणखीनच आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. परंतु अचानक आंब्याची आवक वाढल्याने मार्केटमध्ये सर्वच जातीच्या आंब्याचे दर कोसळले आहेत. चारा म्हणून आंबा जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत…

Read More

‘एनईपी’च्या अंमलबजावणीसाठी आता राज्य शासनाकडून स्वतंत्र टास्क फोर्स:माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकरांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ ची प्रभावी, सुसूत्र आणि एकसमान अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय पातळीवर येणाऱ्या विविध अडचणींचे निवारण . का भासली टास्क फोर्सची गरज ? केंद्र सरकारने २०२० मध्ये जाहीर केलेल्या या शैक्षणिक धोरणानंतर, महाराष्ट्रात डॉ. रघुनाथ माशेलकर समितीच्या शिफारशींनुसार नवीन अभ्यासक्रम…

Read More

शिवना केंद्रात 19 पैकी 5 जि.प. शाळा जीर्णावस्थेत:तीन शाळांमध्ये वीज नाही, अनेक इमारतींना तडे, पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी‎

आधुनिकतेच्या युगातही अनेक शाळा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. परिणामी ग्रामीण विद्या र्थ्यांच्या शिक्षनाचा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शिवना केंद्रातील १९ पैकी ५ शाळा जीर्णावस्थेत तर ३ शाळांत वीज नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना . सिल्लोड तालुक्यातील शिवना केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था शिक्षणव्यवस्थेतील वास्तवता दर्शविणारी आहे. केंद्रात एकूण १९ शाळांचा समावेश असून, त्यापैकी…

Read More

घोटी-त्र्यंबक मार्गावरील भूसंपादनाची प्रत्यक्ष पाहणी:मोजमापासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन‎

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गाच्या चौपदरीकरणासाठी प्रस्तावित भूसंपादन प्रक्रियेविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक झाले असताना, प्रशासनाने आता जागेच्या मोजमापासाठी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांची समिती स्थापन केली आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी विधिमंडळात शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच भूसंपादन प्रक्रियेविरोधातील मुद्दे उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. आहुर्ली ते म्हसुर्ली दरम्यानच्या वहिवाटींच्या…

Read More

पैठणला तहसीलच्या जलकुंभावर वृद्ध महिलेचे तीन तास आंदोलन:फेरफार रद्दची मागणी, पोलिसांकडून समजूत, 25 मे रोजीही केले आंदोलन‎

सातबारा फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी ढोरकीन येथील एका महिला शेतकऱ्याने पैठणच्या तहसील कार्यालयासमोरील जलकुंभावर चढून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता ‘शोले’ स्टाईल आंदोलन सुरू केले. शोभा बबन कुदळे (६५) असे आंदोलनकर्त्या महिला शेतकऱ्याचे नाव असून, यापू . फेरफारचा प्रश्न मार्गी लावला जाईल : ^ढोरकीन येथील महिला शेतकऱ्याच्या फेरफारसंदर्भात माहिती घेऊन योग्य कारवाई करण्यात येणार आहे. महिला…

Read More

मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू:भटाणा तलावातील मासेमारीच्या जाळ्यात पाय अडकल्याने घडली दुर्घटना‎

तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा मासेमारीच्या जाळ्यात पाय अडकल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील भटाणा येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. रहीम युसूफ शेख (६०, रा. भटाणा) असे मृताचे नाव आहे. रहीम शेख हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय करत होते. शुक्रवारी सकाळी ते भटाणा तलावावर…

Read More

संभाजीनगर विधान परिषद भाजप तर नाशिक शिंदेसेना लढवण्याची शक्यता:17 जागांवर महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात

विधान परिषदेतील १७ जागांसाठी १८ जूनला निवडणूक होत आहे. दोन दिवसांपूर्वी महायुतीची दिल्लीत बैठक झाली. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपतर्फे जागा वाटपात वाटाघाटींचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. सूत्रांनी सांगितले की, महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय शनिवारी दुपारी होऊ शकतो. भाजप १२, शिंदेसेना ३, राष्ट्रवादी अजित पवार गट २ जागा लढवेल. दिल्लीतील बैठकीत…

Read More

एआय क्रांतीत महाराष्ट्र "नंबर 1’; दहा हजार कोटींची गुंतवणूक:राज्यामध्ये 6 ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जागतिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला असून, मुख्यमंत्र्यांनी राज्याचा महत्त्वाकांक्षी “एआय व्हिजन’ जाहीर केला आहे. “मुंबई टेक वीक २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून देशाला ‘एआय हब’ बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. या मिशन अंतर्गत राज्य सरकार १० हजार कोटींची मोठी गुंतवणूक करणार आहे. यातून राज्यात ६ ‘सेंटर…

Read More

मेळघाटातील ब्रिटीशकालीन यंत्रांचे संग्रहालय व्हावे:इंटॅकने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

इंटॅक अमरावती चॅप्टरने मेळघाटातील १०० ते १३० वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन यंत्रांचे संग्रहालय उभारण्याची मागणी केली आहे. जागतिक संग्रहालय दिनाच्या पार्श्वभूमीवर इंटॅकच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले. मेळघाटात अनेक ठिकाणी रस्ते बांधणी, सागवान लाकूड तोडणे आणि बाहेर काढण्यासाठी ब्रिटिशांनी वापरलेली जुनी यंत्रे, लोखंडी चाके पडून आहेत. ही यंत्रे सध्या वापरात नसली तरी त्यांचा इतिहास रंजक…

Read More

उच्च शिक्षणमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित:महिनाभरात मागण्या न मान्य झाल्यास पुन्हा आंदोलन

विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचारी संघाने पुकारलेले श्रृंखलाबद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मध्यस्थीनंतर संघाने हा निर्णय घेतला, अशी घोषणा संस्थापक अध्यक्ष अजय देशमुख यांनी केली. या स्थगितीनुसार, २९ मे रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर होणारे एकदिवसीय धरणे आंदोलन, १ जून रोजीचा लाक्षणिक कामबंद आणि त्यानंतर…

Read More