Headlines

8 कुत्र्यांनी 3वर्षांच्या बालकाला शिर,पाय धडापासून वेगळे करून ठार मारले:संभाजीनगरच्या खुलताबादेतील शेतवस्तीवरील हृदयद्रावक घटना

खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथे माटेगाव चौफुली ते देवपुढी रस्त्यावरील शेतवस्तीवर 8 हिंस्र कुत्र्यांच्या टोळक्याने अवघ्या तीन वर्षांच्या एका चिमुकल्याचे लचके तोडून ठार केले. कुत्र्यांनी बालकाचे मुंडके आणि डावा पाय धडापासून वेगळा केला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची परिसीमा म्हणजे, या चिमुकल्याची आई जन्मजात मूकबधिर असल्याने मृत्यूशी झुंजताना त्याने मारलेली शेवटची आर्त हाकही तिच्यापर्यंत पोहोचूच…

Read More

अमरावती विद्यापीठातील 29 महाविद्यालयांवर प्रवेश बंदी:प्राध्यापक भरती न केल्याने विद्यापीठाचा कठोर निर्णय

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी २९ महाविद्यालयांवर प्रवेश बंदी घातली आहे. प्राध्यापकांची भरती न केल्याने विद्यापीठाने हा कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे ऐन प्रवेश प्रक्रियेच्या काळात या महाविद्यालयांना मोठा फटका बसला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. संबंधित महाविद्यालयांवर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्येही प्रवेश बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी…

Read More

दिल्ली घटनेचा निषेध, प्रहारचे कलेक्ट्रेटमध्ये लोटांगण आंदोलन:विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बच्चू कडूंच्या नेतृत्वात निदर्शन

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद अमरावतीत उमटले. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. बुधवारी झालेल्या या आंदोलनादरम्यान प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील घटनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या शेवटी, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला पाठवण्यात…

Read More

बंद कंपनीच्या गोदामातून 37 लाखांची औद्योगिक यंत्रसामग्री चोरी:नांदगाव पेठ एमआयडीसीतील श्याम इंडोफॅबमध्ये घटना उघड

नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीमधील श्याम इंडोफॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामातून ३७ लाख रुपयांची औद्योगिक यंत्रसामग्री चोरीला गेली आहे. गेल्या चार वर्षांपासून ही कंपनी बंद होती. मंगळवारी सायंकाळी गोदामाच्या पाहणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे मुख्य व्यवस्थापक जगदीशकुमार देवराव पारुळकर (वय ४९, रा. रायपूर, छत्तीसगड) यांनी…

Read More

एकरकमी अनुदानाच्या प्रतिक्षेत सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस महिलेने प्राण सोडले:उपचारासाठी वेळेत पैसे मिळाले नसल्याचा आरोप

कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस महिलेने एकरकमी अनुदानाच्या प्रतिक्षेत प्राण् सोडल्याचा प्रकार घडला आहे. उपचारासाठी पैसे न मिळाल्याने हि परिस्थिती ओढावल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागातील बाबुगिरीचा हा परिणाम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळमनुरी तालु्क्यातील तोंडापूर येथील अंगणवाडी मदतनीस रुख्माबाई भुरके (६०) ह्या सुमारे दिड…

Read More

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते देशी गोवंश प्रदर्शन उद्घाटन:शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील: कृषी मंत्री

हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात होणाऱ्या प्रतिकूल परिणामामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना या संकटकाळातून बाहेर काढणे ही राज्य शासनाची जबाबदारी असून, त्याप्रमाणे शासन काम करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय येथे ‘शुद्ध…

Read More

आरोग्य हमी योजनेचे 60 टक्के काम सरकारी रुग्णालयांमार्फतच व्हावे:आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचे निर्देश

राज्यातील आरोग्य हमी योजनेचा जास्तीत जास्त निधी शासकीय रुग्णालयांना मिळाला पाहिजे. या योजनेचे किमान 60 टक्के काम सरकारी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातूनच झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी (ता 22) दिले आहेत. मुंबई येथे मंत्रालयातील समिती कक्षात राज्य आरोग्य हमी सोसायटीची आढावा बैठक झाली. यावेळी आरोग्य…

Read More

'पोलिसांच्या लाठीचार्जला विरोधकच जबाबदार':मंत्री उदय सामंतांचा दावा, म्हणाले- आंदोलनात विरोधकांनी घुसखोरी केली

राजधानी दिल्लीत विद्यार्थी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला असताना, सत्ताधाऱ्यांकडून मात्र पोलिसांच्या कारवाईची पाठराखण केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एक वेगळाच दावा करत या घटनेचे खापर थेट विरोधकांवर फोडले आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले,…

Read More

कर्जमाफीची फक्त 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर:तांत्रिक अडचणींमुळे उशीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची पत्रकार परिषद

राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची पहिली यादी आज (22 जुलै) जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. या कर्जमाफीच्या यादीत फक्त 553 शेतकऱ्यांचेच नाव असल्याचे समोर आले आहे. बाबासाहेब पाटील म्हणाले, ही योजना…

Read More

तालुकानिहाय वीज बिल माफीची रक्कम जाहीर करा:विजय जावंधिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ४८,००० कोटी रुपयांच्या शेतकरी वीज बिल माफी योजनेची तालुकानिहाय पारदर्शक माहिती आणि आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली आहे. नागपूर येथून पाठवलेल्या या पत्रात त्यांनी ही योजना जाहीर केल्याबद्दल सरकारचे आभार मानले, परंतु शेतकऱ्यांची सद्यस्थिती अजूनही बिकट असल्याचे नमूद केले आहे. जावंधिया यांनी…

Read More