Headlines

धाराशिव-बीड-संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी:डीपीआर प्रक्रिया सुरू, लोकसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या सुमारे २४० किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या बहुप्रतीक्षित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. सर्वेक्षणानंतर राज्य शासन, नीती आयोग व अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर पुढील टप्प्यांचा निर्णय घेतला जाईल….

Read More

आषाढीच्या मुहूर्तावर शेवगाव आगाराची नवी भरारी; ताफ्यात 5 आधुनिक बस

आषाढी एकादशीपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगाराला नव्या ५ बस मिळाल्या आहेत. या बस उद्यापासून नियमित प्रवासी सेवेत दाखल होणार असून ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा लाभ मिळणार आहे. शेवगाव व पाथर्डी आगारासाठी प्रत्येकी १० नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप…

Read More

चांदूर बाजार येथे विद्यार्थी, नागरिकांचा आक्रमक मोर्चा:दिल्लीतील लाठीचार्जचा केला निषेध, तहसीलदारांना निवेदन‎

दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी झालेल्या लाठीचार्ज व अश्रुधुराच्या वापराच्या निषेधार्थ चांदूर बाजार येथे शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी चौकातून दुपारी १२ वाजता निघालेल्या मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहोचून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात जंतर-मंतर येथील घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने…

Read More

जिल्ह्यात 24 तासांत 15.7 मिमीची नोंद; एका जणाचा बळी:4 घरे पडली, दोन दिवसांपासून संततधार पाऊस, जलसाठे वाढले, शेतकरी सुखावले‎

तब्बल दहा दिवसांनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकरी सुखावले असून, पावसाच्या वार्षिक सरासरीतही चार टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे या पावसाने एक बळी घेतला असून, दोन तालुक्यातील चार घरेही जमीनदोस्त झाली. दरम्यान दर्यापूर तालुक्यातील गोळेगाव येथे वीज पडल्याने एका शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ३, अमरावतीच्या ग्रामीण भागातील…

Read More

टाळ मृदंगाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताहाचा श्रीगणेशा:आषाढी एकादशीनिमित्त हरिनामाचा जागर; 29 रोजी समारोप‎

जुने शहरातील ३२२ वर्षे पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आषाढीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा बुधवारी श्रीगणेशा झाला. अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदा ९३ वे वर्ष आहे. या सप्ताहाचा समारोप बुधवार, २९ जुलै (आषाढ शुद्ध पौर्णिमा) रोजी होणार आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू झालेल्या या सप्ताहात भक्त पंढरीनाथाचा जयघोष करत माऊलीच्या भक्तीत तल्लीन होत आहेत. विठ्ठल मंदिरात १९३३ पासून अखंड…

Read More

राज्यात पावसाचा धुमाकूळ:पालघरमध्ये शाळांना सुट्टी, पुण्यात 'रेड अलर्ट'; मराठवाडा-विदर्भात दिलासा, शनिवारनंतर उघडीप?

संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून, सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’, तर नाशिक, पालघरसह कोकणातील जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पुराच्या पाण्यामुळे १५ ते १६ गावांचा मुख्य संपर्क तुटला…

Read More

दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मंगळवेढा शहरात काँग्रेसतर्फे तीव्र निषेध:दिल्लीतील लाठीहल्ल्याचा निषेध, विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी;

दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवेढा पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना निवेदन देण्यात आले. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर काय . यावेळी काँग्रेसचे राज्य सचिव ॲड रविकरण कोळेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष ॲड राहुल घुले, राजन ठेंगील, रवींद्र शिवशरण, बापू अवघडे, तसलीम अकुंजी,…

Read More

शिक्षणामुळेच बुद्धिप्रामाण्यवादी माणूस घडतो- डॉ. गव्हाणे:कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ उत्साहात‎

शिक्षणाकडे केवळ उद्योग, व्यवसाय, नोकरी किंवा रोजगाराचे साधन या मर्यादित दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे. शिक्षणामुळे मन आणि मेंदू चिकित्सक बनतात. समाजाला नैतिक आणि विवेकवादी माणूस घडवण्याचे खरे काम शिक्षणच करते, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले. कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित पदवी प्रदान…

Read More

चांदवडला 261 पैकी 24 प्रकरणे निकाली:24 धनादेश अनादर प्रकरणांचा निपटारा; 42 लाखांची वसुली‎

नाशिक जिल्हा विधी सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली, चांदवड तालुका विधी सेवा समिती आणि चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १८) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट (एनआय अ‍ॅक्ट) कलम १३८ अंतर्गत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत धनादेश अनादराच्या २४ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला असून, एकूण ४२ लाख ४०…

Read More

सामाजिक दायित्वातून तिसगावी पाणंद रस्ता दुरूस्त:300 ते 400 शेतकऱ्यांच्या दैनंदिन वापराचा मुख्य मार्ग माेकळा, विद्यार्थ्यांची अडचण दूर‎

तालुक्यातील तिसगाव येथील महत्त्वाचा असलेला गांगुर्डे व खैरे वस्तीकडे जाणारा पाणंद रस्ता अखेर सामाजिक दायित्वातून दुरुस्त करण्यात आला आहे. हा रस्ता प्रवासासाठी मोकळा झाल्याने शेतकऱ्यांसह भाविक, शाळकरी मुले व नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुना तिसगाव-चांदवड रस्ता हा परिसरातील सुमारे ३०० ते ४०० शेतकऱ्यांच्या दैनंदिन वापराचा मुख्य मार्ग आहे. या रस्त्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा भाग…

Read More