Headlines

75 टक्के पेरण्या; दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांची धाकधूक अद्यापही कायम:रानटी डुकरांमुळे शेतकऱ्यांना तुरीच्या दुबार पेरणीचा फटका‎

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्याच्या विविध भागांत अधूनमधून पाऊस झाला असला, तरी आतापर्यंत एकदाही सर्वदूर दमदार सार्वत्रिक पावसाची नोंद झालेली नाही. झालेला पाऊस सध्या पिकांना तग धरण्यासाठी पुरेसा ठरला असला, तरी जमिनीत पाणी मुरून दीर्घकाळ ओलावा टिकावा आणि जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ व्हावी, इतका पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे…

Read More

नांदूर शिंगोटे महामार्ग, शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी:कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना माजी खासदार डॉ.सुजय विखे यांची तंबी‎

राहाता हवामानात झालेला बदल आणि कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी लोणी खुर्द व लोणी परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचा धडाकेबाज दौरा केला. प्रत्यक्ष घटनास्थळी जात त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, भर पावसात लोणी येथील एका…

Read More

खेडीलिहा शाळेची 70 वर्षांची जीर्ण इमारत बनली धोकादायक:प्रशासनाने लक्ष देण्याची पालकांची मागणी, वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय‎

. एकीकडे शासनाकडून शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि आधुनिक शाळांच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा दावा केला जातो. मात्र दुसरीकडे खेडीलिहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची १९५६ सालची जुनी व पत्र्याची इमारत आजही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत उभी आहे. सततच्या पावसामुळे या इमारतीची अवस्था जीर्ण झाली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत असल्याने पालक,…

Read More

लासलगाव कॉलेजात 100 वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाची शपथ:एनएसएस व एनसीसीचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प‎

पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व पर्यावरण शपथ . संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी ५० नारळ व ५० चिंचेची अशी एकूण १०० रोपे…

Read More

ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अजिंठा घाटामध्ये ट्रक उलटला:लसणाने भरलेला ट्रक जात होता केरळला‎

अजिंठा घाटातील वळणावर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लसणाने भरलेला एक ट्रक उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक आणि क्लीनर दोघेही बचावले असून, ट्रकचे नुकसान झाले आहे. राजस्थानहून केरळच्या दिशेने लसूण घेऊन जाणारा ट्रक (आरजे २० जीसी ४३८१) मंगळवारी सकाळी अजिंठाघाटात…

Read More

‘तू काकाला का बोललीस’ अशी विचारणा करत पत्नीवर झाडल्या 3गोळ्या:पती फरार, नांदेडच्या लोहा येथे चारित्र्याच्या संशयावरून प्रकार, पत्नी गंभीर जखमी

‘तू काकाला का बोललीस’ म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडल्या. पैकी एक गोळी कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत लागल्याने विवाहिता गंभीर जखमी झाली. लोहा शहरातील शिक्षक कॉलनीत सोमवारी मध्यरा . लोहा येथे शिक्षक कॉलनी परिसरातील विशाल जाधव व त्याची पत्नी अर्चना जाधव यांच्यात सोमवारी मध्यरात्री…

Read More

लोणावळा घाटात दरड कोसळल्याने 14 रेल्वे रद्द:मुंबई, पुण्यासह नांदेड, सोलापूर व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय

लोणावळा – कर्जत रेल्वे घाट विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान कोसळलेल्या दरडीमुळे मंगळवारीही रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून आला. मध्य रेल्वेने मंगळवारी एकूण १४ गाड्या रद्द केल्या तर एक गाडी अंशतः रद्द करुन ५ गाड्यांचे मार्ग वळवले. तीन गाड्या शॉर्ट टर्मिनेट, तीन गाड्या शॉर्ट ओरिजिनेट करण्यात आल्या असून एका गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला…

Read More

मंत्री मोहोळांकडून मनपा अधिकाऱ्यांची झाडाझडती:पाणी साचणाऱ्या ठिकाणांवरून पावसाळी तयारीचा घेतला आढावा

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या कमी करण्याबाबत आणि पावसाळ्याच्या तयारीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पुणेकरांना कोणतीही समस्या येऊ नये, असे स्पष्ट निर्देश मोहोळ यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असतानाही गेल्या तीन वर्षांत शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या किती कमी केली, असा प्रश्न…

Read More

सातारकरांना मोठा दिलासा:कास धरण सांडव्यावरून वाहू लागले, वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर

सातारा शहरासाठी जीवनदायी ठरणारे कास धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी मध्यरात्री धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे सातारा शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या दमदार पुनरागमनानंतर कास परिसरात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा थेट परिणाम…

Read More

पुणे मनपा पालखी सोहळ्यासाठी सज्ज; वारकऱ्यांसाठी व्यापक सुविधा:महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘पुणे प्रथम – सेवावारी 2026’ उपक्रम

पुणे महानगरपालिका संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. आषाढी वारीनिमित्त हजारो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ या उपक्रमांतर्गत शहरात व्यापक नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्ग, मुक्कामस्थळे आणि प्रमुख ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून…

Read More