Headlines

पूरस्थितीमुळे देहू-आळंदीत गर्दी टाळा:वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे: डॉ. नीलम गोऱ्हे

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे वारकऱ्यांनी सध्या या ठिकाणी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. शक्य असल्यास, वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी म्हटले. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पूल, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था…

Read More

लोणावळ्यात भीषण भूस्खलन:मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच लोणावळा येथील ‘नॉर्थ पॉइंट’ आणि ‘थ्री सिक्सटी रिसॉर्ट’ परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, वाढत्या पावसामुळे…

Read More

Swargate Metro Station Leaks; Pune Metro Faces Criticism After First Rain

पुण्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते आणि रेल्वे वाहतुकीपाठोपाठ थेट मेट्रो सेवेलाही बसल्याचे समोर आले आहे. पुण्यातील अत्यंत वर्दळीचे आणि नुकतेच प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेले ‘स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानक’ पहिल् . मुसळधार पावसामुळे स्वारगेट मेट्रो स्थानकाच्या छताला आणि अंतर्गत भिंतींना मोठी गळती लागली आहे. छतातून पडणारे पाणी संपूर्ण स्थानकात पसरून…

Read More

ब्रह्मपुरी वेगळा जिल्हा करण्यात यावा:सरकारकडे सकारात्मक प्रस्ताव; स्मार्ट मीटरमुळे जनता त्रस्त, सरकारने लक्ष द्यावे – विजय वडेट्टीवार

विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील विविध गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीपासून ते मुद्रांक शुल्क घोटाळा, स्मार्ट मीटर, शासकीय जमिनींची लूट, SRA आणि AMRUT योजनेतील कथित अनियमितता अशा अनेक विषयांवर सरकारला धारेवर धरले. विधानसभेत आज विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर भाषण करताना वडेट्टीवार म्हणाले की, ब्रह्मपुरीला स्वतंत्र…

Read More

कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला:विधानसभेत भावुक झाले राम कदम, कबुतरखाने नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी

मुंबईतील कबुतरांमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत अत्यंत भावनिक पद्धतीने उपस्थित केला. आपल्या आईचे निधन फुफ्फुसांच्या इंटरस्टिशियल लंग डिसीज (ILD) या गंभीर आजारामुळे झाल्याचे सांगताना ते भावुक झाले. कबुतरांच्या विष्ठेमुळे (ड्रॉपिंग्ज) हवेत पसरणाऱ्या घटकांमुळे हा आजार बळावतो, असा दावा करत त्यांनी सरकारने तज्ज्ञ समिती नेमून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी…

Read More

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 50 लाखांचा 'रेट'?:विधान परिषदेत अनिल परबांचा गंभीर आरोप; भाजप आमदारानेही दिला दुजोरा

मुंबईत नगरसेवक होण्यासाठी आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. जात पडताळणी समितीत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांचा ‘रेट’ असल्याचा दावा करत त्यांनी सभागृहात खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे, भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही अशा प्रकारचे…

Read More

राज्यात बाईक-टॅक्सी परवान्यासाठी आता महाराष्ट्राचे 'डोमिसाईल' अनिवार्य:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील हजारो बाईक-टॅक्सी चालकांवर परिणाम करणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज विधानसभेत जाहीर करण्यात आला. राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल (अधिवास प्रमाणपत्र) अनिवार्य असणार आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत वाहतूक, महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या सर्व गंभीर बाबींची दखल घेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात राज्य सरकारची…

Read More

नवी मुंबईत भीषण अपघात:तळोजामध्ये सुसाट कारने 10 जणांना दिली धडक; 2 ठार, 8 जखमी, चालक फरार

नवी मुंबईतील तळोजा परिसरात सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. तळोजा सेक्टर 10 येथे भरधाव कारने रस्त्यावर असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळीच सोडून पलायन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नियंत्रण सुटले, भरधाव कारने उडवले प्राथमिक माहितीनुसार, तळोजा सेक्टर 10 परिसरातून…

Read More

सांगली जिल्हा बँकेतील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा:नोकरभरतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाकडून रद्द; खोत-पडळकरांना दणका

राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य शासनाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती दिली होती. मात्र निवडणूक निकालानंतरही ही प्रक्रिया सुरू न झाल्याने शासनाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना, ‘सरकारने आपले म्हणणे मांडावे, परंतु त्यासाठी नोकरभरती थांबवता येणार नाही,’ असे स्पष्ट करत न्यायालयाने बँकेतील…

Read More

पुणे पोलिसांची आषाढी वारीसाठी 'हायटेक' सुरक्षा:ड्रोन, एआय, सीसीटीव्हीने लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीच्या अचूक नियोजनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘हायटेक’ सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे. डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने यंदाचा वारी सोहळा सुरक्षित व सुलभ करण्याचा संकल्प पुणे पोलीस प्रशासनाने केला आहे. पालखीचा अचूक मार्ग, प्रगती…

Read More