Headlines

Heavy Rain Cyclone Diverts to Surat-Akole; Dam Water Levels Rise in Nashik

नाशिककरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याने नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात तब्बल ३५० मिलीमीटर पावसाचा, म्हणजेच ‘ढगफुटी’चा धडकी भरवणारा इशारा दिला होता. मात्र, पालघरमध्ये हाहाकार उडवणारा पावसाचा ‘भोवरा’ ऐनवेळी नाशिकच्या वेशीवरून दुसरीक . असा टळला नाशिकवरील धोका… पालघर जिल्ह्यात तब्बल ४५० मिमी पावसाची नोंद करणारा हवामानातील तोच ‘भोवरा’ सोमवारी रात्री त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गे सरकण्याचा अंदाज…

Read More

पूरग्रस्त वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय!:पुणे महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना रविवारपर्यंत सुट्टी; राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था

आळंदी आणि देहू परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हजारो वारकरी अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने मोठा निर्णय घेत शहरातील महापालिकेच्या 101 शाळा वारकऱ्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आजपासून थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या इतर शाळा तसेच सर्व खासगी शाळा नियमित सुरू राहणार असल्याचे…

Read More

'बॉस'चा DP अन् 5.30 कोटींचा गंडा:अकाऊंटंटला मेसेज करून करोडोंची फसवणूक, सायबर पोलिसांकडून पुण्यातून आरोपीला बेड्या

राजस्थान पोलिसांच्या राज्य सायबर क्राईम शाखेने कॉर्पोरेट कंपन्यांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश करत महाराष्ट्रातील पुणे येथून एका आरोपीला अटक केली आहे. सायबर ठगांनी एका नामांकित कंपनीच्या चेअरमनच्या व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटो (डीपी) आणि नावाचा वापर करून कंपनीच्या अकाउंटंटला फसवले आणि दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 5 कोटी 30 लाख रुपये…

Read More

आषाढी एकादशीसह गुरू पौर्णिमेचे लागले वेध:आषाढी एकादशी आटोपली की, गुरू पौर्णिमा केली जाणार साजरी‎

आषाढी एकादशीला भू-वैकुंठ पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ सर्व वारकरी, भाविकांना लागली आहे. यात मध्यमवयीनांसह बहुतेक ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला भाविकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी आटोपली की, गुरू पौर्णिमा साजरी होणार आहे. यासाठी शहरात आतापासूनच नागरिकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. अगदी विठूरायाचे नामस्मरण करण्यासाठी टाळ, मृदुंग, विणा, ढोलकी, तबला दुरुस्त किंवा खरेदी…

Read More

महामार्गावरील खड्डे बुजवा; संभाजी ब्रिगेड झाले आक्रमक:अभियंत्यांना निवेदन सादर करीत आंदोलनाचा इशारा‎

राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, भेगाही पडल्याने संभाजी ब्रिगेड सोमवारी आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांना निवेदन सादर केले. रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग येथील बाळापूरकडे जाणाऱ्या जगदंबा हॉटेल समोरील टी पॉइंटपासून तुषार हॉटेल समोर ते रेल्वे फाट्यापर्यंत सार्वजनिक रोडवर खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या मध्य भागावर…

Read More

बाळापूरमध्ये अपघातांचे वाढते प्रमाण:रस्त्यांसाठी 150 कोटी द्या आ. देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 851 अपघात, 334 जणांचा मृत्यू‎

विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांसाठी १५० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत आ. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांना पत्रही दिले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे सन २०१९ ते जून २०२६ या कालावधीत तब्बल ८५१ रस्ते अपघात झाले. या दुर्घटनांमध्ये…

Read More

मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्याची गरज- काझी:‘मुस्लिम बिरादार जमात’ तर्फे गुणवंतांचा सत्कार‎

मुलींची शैक्षणिक प्रगती मुलांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगत व्यसनांपासून मुलांना दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी केले. येथील मुस्लिम बिरादार जमात संस्थेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार काझी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेंद्र राऊत,…

Read More

संताप:तक्रारीकडे दुर्लक्ष, पोलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात सोमवारी दुपारी घरासमोरील विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून प्रीती गांगुर्डे या तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धोकादायक पोलबाबत मागील वर्षीच तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप करत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

सलग 39 व्या वर्षी भद्रा मारुती पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान:गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवास‎

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती पायी दिंडीने सलग ३९व्या वर्षी भक्तिभावाने पंढरपूरकडे प्रस्थान केले. गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला. प्रस्थानापूर्वी श्री भद्रा मारुती मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व श्री हनुमानाची पूजा, आरती आणि हरिनाम कीर्तन करण्यात आले. त्यानंतर माजी…

Read More

जामनेरातील अपर तहसील कार्यालय शेंदुर्णीतच व्हावे:सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी निर्धार; नगराध्यक्ष अग्रवाल यांच्याकडून पाठपुराव्याची ग्वाही‎

जामनेर तालुक्यासाठी मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय शेंदुर्णी येथेच व्हावे, या मागणीसाठी शेंदुर्णी येथील नागरिकांनी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. यासंदर्भात आठवड्यातून दोनदा प्रथम नगरपंचायत कार्यालय व त्यानंतर माहेश्वरी मंगल कार्यालयात सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेंदुर्णी येथेच कार्यालय सुरू करण्याची मागणी लावून…

Read More