Headlines

पायी दिंडीसमोर प्रशासन झुकले:वाकला जि. प. शाळेस तीन शिक्षक तत्काळ देणार, वाकल्याच्या शिक्षक आंदोलनाला यश, जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले आश्वासन‎

वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला, वाकला येथील आठ शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (६ जुलै) अखेर यश मिळाले. शाळेला कुलूप, थाळीनाद आंदोलन आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयावर धडक देण्यासाठी निघालेली . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही : ^विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तीन शिक्षक तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, तर उर्वरित…

Read More

पंढरपूरच्या वारीत फाइव्ह-जी वॉकीटॉकी अन् ड्रोनची नजर:वारकऱ्यांची संख्या मोजण्यासाठी एआयची मदत, यात्रेत प्रत्येक हालचालीवर असेल नजर

आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले असून यंदाची वारी अधिक सुरक्षित व तंत्रस्नेही करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. यंदा आषाढी यात्रेत होणाऱ्या लाखो भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘फाइव्ह-जी व . सोहळ्यासाठी १५ लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात येतात. हाच अंदाज गृहीत धरून यंदाही पोलिसांची तयारी सुरू आहे. वारीमध्ये येणाऱ्या भाविकांची अचूक…

Read More

साताऱ्यात 'रेड अलर्ट':आपत्ती व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश, पर्यटनस्थळे आणि धबधब्यांवर जाण्यास बंदी

भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज व रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीदरम्यान करावयाच्या तात्काळ उपाययोजना व आपत्ती व्यवस्थापना बाबत व्यापक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई व सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, भूस्खलन तसेच संपर्क यंत्रणा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे…

Read More

वसई-विरारमध्ये पावसाचा हाहाकार:हजारो चाकरमानी स्थानकातच अडकले! लोकल ठप्प, वीज गुल; जनजीवन विस्कळीत

वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कामण, भेंडीपाडा आणि मोरी गाव परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून निर्माण झालेल्या पूरस्थितीत अडकलेल्या 15 नागरिकांची वसई-विरार महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरूप सुटका केली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी आणखी 50 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका वाहतूक व्यवस्थेलाही बसला असून, पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा पाण्यामुळे…

Read More

सातारा LCB तील ‘स्थायी’ कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी आंदोलन:आर्थिक व्यवहारांचे आरोप; पोलिस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन

सातारा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) मधील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत राहून मनमानी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीसह तात्काळ बदलीची मागणी भारतीय स्वाभिमानी संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुषार विजय मोतलिंग यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नाट्यमय आंदोलन छेडले. पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र…

Read More

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता:आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज, 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी 17 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि 6 राज्य आपत्ती प्रतिसाद दलची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे. मान्सुन कालावधीकरिता राष्ट्रीय…

Read More

मिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरच कोसळली:राडारोडा हटवून वाहतूक पूर्ववत; 'एमएसआरडीसी'ची माहिती

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ सोमवारी सकाळी दरड कोसळली. ही घटना पूर्णपणे नैसर्गिक असून, बोगद्याच्या कामाच्या गुणवत्तेशी किंवा तांत्रिक त्रुटीशी तिचा संबंध नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले. लोणावळा परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या विक्रमी पावसानंतर सोमवारी सकाळी मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळली. डोंगरावरून…

Read More

राज्यात अतिवृष्टीने 9 बळी:मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 5 चिमुकल्यांसह 6 जणांचा अंत; पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळत असून, याचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. या संततधार पावसामुळे सर्वसामान्य…

Read More

'साताऱ्यातील संवेदनशील भागातील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करा':पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला सतर्कतेचे आदेश

राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी सुरू असून सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे, या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहावे. ज्या संवेदनशील ठिकाणी लोकांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी कोणताही धोका न पत्करता तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करावे, स्थलांतरित केलेल्या नागरिकांना अन्न, शुद्ध पेयजल, पांघरुण, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रशासनाने दक्षता घ्यावी….

Read More

लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध; कलम 163 लागू:अतिवृष्टीमुळे धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मुंबई आणि पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. या संततधार पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत…

Read More