वरुणराजाची हुलकावणी!:महिनाभरानंतर राहुरीकरांना रिमझिम पावसाने दिलासा
राहुरी तालुक्यात तब्बल एका महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा मात्र आजही कायम आहे. मागील आठवड्यात पावसाने किरकोळ हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून रिमझिम पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाच्या ओलीवर तालुक्यातील अनेक…