Headlines

वरुणराजाची हुलकावणी!:महिनाभरानंतर राहुरीकरांना रिमझिम पावसाने दिलासा

राहुरी तालुक्यात तब्बल एका महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा मात्र आजही कायम आहे. मागील आठवड्यात पावसाने किरकोळ हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून रिमझिम पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाच्या ओलीवर तालुक्यातील अनेक…

Read More

"आयक्यू'सोबत "ईक्यू' अन् "एसक्यू' वाढवा तरच घडेल परिपूर्ण पिढी:"भारत टॅलेंट सर्च' परीक्षेतील 31 गुणवंतांचा सत्कार

आजच्या स्पर्धेच्या युगात आपण मुलांना पुस्तकी ज्ञान देत आहोत. पालक आणि शिक्षकांना आता मुलांच्या संगोपनाची पद्धत बदलावी लागेल. १९८० च्या दशकात वर्गात पहिला नंबर मिळवणे किंवा ‘आयक्यू’ (बुद्ध्यांक) असणे प्रतिष्ठेचे मानले जात होते. पण आजच्या काळात हुशार असणे पुरेसे नाही. जोपर्यंत मुलांमध्ये ‘ईक्यू’ (भावनिक बुद्ध्यांक) आणि ‘एसक्यू’ (आध्यात्मिक बुद्ध्यांक) विकसित होत नाही, तोपर्यंत परिपूर्ण पिढी…

Read More

कभी- कभी मेरे दिल मे खयाल आता है….:ब्रिजधाम आश्रमात हिंदी गाण्यांची मैफल‎

सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमात रविवारी सायंकाळी ‘सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या’ वतीने ‘सूरसंध्या’ या सांस्कृतिक गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पावसाचा हलकासा शिडकावा आणि हवेतील गारवा अशा आल्हाददायक वातावरणात ‘सत्यम शिवम् सुंदरम’ हे गाणे सुरू होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है’ यांसारख्या सदाबहार गाण्यांमुळे आश्रमातील आजी-आजोबांसह सर्वच रसिक…

Read More

पहिल्याच पावसात अर्धवट उघड्या गटारांमुळे रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य:पावसाळापूर्व कामांची गुणवत्ता चव्हाट्यावर, आरोग्य धोक्यात

शहरात शुक्रवारी मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे ४ ते ५ तास चाललेल्या या संततधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असला, तरी महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पुरती पोलखोल झाली आहे. पहिल्याच पावसाने शहराची दैना उडवली असून प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पावसाचा जोर वाढताच शहरातील अनेक भागांतील गटारांची अर्धवट उघडी…

Read More

महापालिकेच्या तहकूब सभेला मुहूर्त मिळेना:घरपट्टीचा निर्णयही रखडला

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असमान्वयमुळे तहकूब झालेली व त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दीड महिना उलटूनही अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे भाडेकरू दराने घरपट्टीचे मूल्यांकन रद्द करण्यासह व्यापारी संकुले व भुयारी गटार योजनेसाठी कर्ज, रस्त्यासाठी भूसंपादन आदी विषयांवरील निर्णयही रखडले आहेत. भाडेकरू दराने घरपट्टी, गॅस पाइपलाइन खोदाई, कर्ज प्रस्ताव व भूसंपादन…

Read More

मावळच्या पाटण गावात घरावर कोसळली दरड:संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे प्रवास पूर्णपणे ठप्प

पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आता दुर्घटनांचे सत्र सुरू झाले आहे. आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर डोंगरकड्यावरून मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब अडकल्याची प्राथमिक भीती व्यक्त केली जात असून, घटनास्थळी बचावकार्याला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. घटनेचे…

Read More

20 minutes left for the wedding and the police enter the pavilion

दारूच्या नशेत बुडालेला पिता, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि हातावरचे पोट या विवंचनेला कंटाळून आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न आत्याचा मुलगा असलेल्या २४ वर्षांच्या तरुणाशी लावून देण्याचा घाट घातला. साखरपुड्याच्या निमित्ताने २५० वऱ्हाडी गोळा झाले . दिघी गावातील अल्पवयीन मुलीने दहावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवले आहेत. तिला पुढे शिकण्याची इच्छा आहे, मात्र तिचे वडील…

Read More

बागलाणमध्ये 3 लाख मतदारांची होणार पडताळणी:288 बीएलओ व 288 सहाय्यक नियुक्त; 7 ऑक्टोबरपर्यंत राबवणार उपक्रम‎

राज्यात ३० जूनपासून सुरू झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला बागलाण तालुक्यात प्रारंभ झाला असून, तालुक्यातील तब्बल ३,००,१७९ मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. यासाठी २८८ बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) व २८८ बीएलओ सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात कामाला सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून रोजी सटाणा येथील डिव्हाईन विद्यालयात…

Read More

हेमंत भावसार यांनी दुचाकीवर गाठले लडाख:6,434 किमीचा प्रवास; उमलिंग-ला मार्ग गाठत साकारले अनेक वर्षांचे स्वप्न‎

येथील दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा भावसार ऑप्टिशियनचे संचालक हेमंत रविंद्र भावसार यांनी दुचाकीवर प्रवास करून लडाखची ‘सोलो’ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. तब्बल ६,४३४ किलोमीटरचा खडतर प्रवास करत त्यांनी जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्त्यांपैकी एक असलेल्या उमलिंग-ला मार्गावरून प्रवास करून अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले. भावसार यांना मोटारसायकल भटकंतीची विशेष आवड आहे. १५ जून…

Read More

आज हिंगोलीत रिंगण:नर्सीतून संत नामदेव महाराज पालखीचे‎प्रस्थान; 19 दिवसांनी पंढरीत पोहोचणार‎

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या‎नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या‎पायी पालखी सोहळयाचे रविवारी पंढरपूरकडे‎प्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो भाविक‎पालखी सोहळ्यात सहभागी झाले. आज‎हिंगोलीत रिंगण सोहळा रंगणार आहे,‎पालखीचे हे ३१ वे वर्ष आहे. ३५० किमी अंतर‎पायी कापून २४ जुलैला पालखी पंढरपूरला‎पोहोचणार आहे.‎ नर्सी नामदेव येथून दुपारी ‘जय जय रामकृष्ण‎हरी’च्या गजरात पालखी निघाली. यावेळी‎संस्थानच्या परिसरात पालखीचे पूजन…

Read More