Headlines

अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरासाठी 25 मिनिटांचा मोठा वळसा:पूर्वनियोजन नसल्याने वाहनचालकांना गल्लीबोळातून मार्ग शोधताना आली भुलभुलैय्याची अनुभूती‎

अहिल्यानगर शहरात दहीहंडीनिमित्त नेप्ती चौक, गंगा उद्यान, दिल्लीगेट परिसरात दहीहंडीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु ऐनवेळी प्रमुख मार्ग बंद करून वाहतूक वळवली गेली, परिणामी वाहनचालकांना गल्लीबोळातून मार्ग शोधताना भुलभुलय्याची अनुभूती आली. दहीहंडीच्या कार्यक्रमांमुळे सायंकाळपासूनच चौकांमध्ये तुफान गर्दी जमा झाली होती. प्रशासनाच्या पूर्वनियोजनाचा अभाव असल्याने ऐनवेळी कोतवाली, तोफखाना व वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून मार्ग बदलावे…

Read More

लसीकरणाच्या दिवशीच उपकेंद्र उघडे:ग्रामस्थांना उपचारासाठी धरावी लागते बाहेरची वाट‎

सिल्लोड तालुक्यातील सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव पेठ येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्र गेल्या सहा महिन्यांपासून केवळ कागदावरच सुरू असून, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी होणाऱ्या लसीकरणाच्या दिवशीच याचे कुलूप उघडले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या वातावरणातील बदलांमुळे गावात सर्दी, खोकला, थंडी-ताप आणि व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, गावात प्राथमिक आरोग्य सुविधाच…

Read More

आंदोलन:जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा,‎मनमाडला एक तास चक्काजाम‎, सकल मराठा समाजातर्फे एकात्मता चौकात साखळी उपाेषण‎

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे शनिवारी (दि.५) दुपारी शहरातून जाणाऱ्या मनमाड- शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर १ तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या राष्ट्रीय महामार्गावरची दुतर्फा वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत सकल मराठा समाज मनमाडसह…

Read More

मराठा आरक्षण:गंगापूरला 45 मिनिटे, गोलटगाव फाट्यावर एक तास रास्ता रोको, वैजापूर, मुंबई, नाशिककडे जाणारी वाहतूक खोळंबली‎

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस असून, त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने जरांगे पाटलांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी शनिवारी जिल्ह्यातील गोलटगाव फाटा आणि गंगापूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा…

Read More

मुलांच्या धर्मांतरासाठी शिक्षकावर दबाव:वीरगावला 5 जणांवर गुन्हा, नोकरीसाठी आधी पती-पत्नीचे 5 लाखांत धर्मांतर केले

स्थायी शिक्षकाची नोकरी देण्याच्या आमिषाने पती-पत्नीचे धर्मांतर करून घेत त्यांच्याकडून पाच लाख रुपयेही उकळले. नंतर या दांपत्यावर त्यांच्या दोन्ही मुलांच्या धर्मांतरासाठी दबाव आणला गेला. पण दांपत्याने यास नकार देत पैसे परत करून नोकरी नाकारली. बोरसर येथील शांती सदन प्राथमिक शाळेशी संबंधित या प्रकरणात वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिसांनी शनिवारी पाच जणांसह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे….

Read More

62.7% संभाजीनगरवासीयांना डीजे नको:छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता समितीच्या बैठकीत आज डीजे बंदीवर होणार शिक्कामोर्तब

गणेशोत्सवात डीजेला परवानगी नको, असा कौल छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांनी दिला. ‘दिव्य मराठी’ने गेल्या दोन दिवसांत केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात ६२.७ टक्के नागरिकांनी डीजेला परवानगी देण्यास विरोध दर्शवला आहे. रविवारी (६ सप्टेंबर) होणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीतही डीजे बंदीवर शिक्कामोर्तब होणार आहे. डीजेवर बंदी घालण्याचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधात घेतलेल्या भूमिकेला सर्वसामान्यांकडून…

Read More

नोकरभरती परीक्षा सुधारणा समिती अध्यक्षपदी व्ही. राधा:पेपरफुटीमुळे निर्णय, 7 सदस्यीय समितीत डीजीपी, आयटी तज्ज्ञ

राज्यातील शासकीय नोकरभरती परीक्षांतील गैरव्यवहार, पेपरफुटीचे रॅकेट मोडून काढणे तसेच परीक्षा प्रणालीत सुधारणेसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या (सेवा) अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. समितीत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला….

Read More

16 लाऊडस्पीकर लावून ध्वनिप्रदूषण; पुण्यामध्ये दहीहंडी मंडळावर गुन्हा:शक्तिशाली ध्वनिवर्धक यंत्रणेमुळे नागरिकांना मोठा त्रास

दहीहंडी उत्सवादरम्यान मोठ्या क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा लावून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी पुण्यातील एका दहीहंडी मंडळाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मंडळाने कार्यक्रमाच्या ठिकाणी तब्बल आठ बेस आणि आठ टॉप असे एकूण १६ लाऊडस्पीकर लावल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. दहीहंडी उत्सवात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमादरम्यान लावण्यात आलेल्या शक्तिशाली ध्वनिवर्धक यंत्रणेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण झाला….

Read More

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती:रमेश चेन्नीथला यांच्या जागी निवड; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हायकमांडचा मोठा निर्णय

महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच अनेक घडामोडी घडत असतात. सध्या राज्यात महायुतीची सत्ता असली, तरी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली असून, तरुणाई आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी नुकताच पुण्यात राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम पार पडला. याच रणनीतीचा एक भाग म्हणून आता…

Read More

मी एकनाथ शिंदे यांना खूप मानते:त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आपली मराठी संस्कृती जपते- गौतमी पाटील

मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव आणि दहीहंडीसारखे सण अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. दहीहंडी उत्सवात अनेक बडे सेलिब्रिटी आणि सिनेतारका उपस्थित राहून आपल्या नृत्याविष्काराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या उत्सवांमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिनेही मुंबईकरांवर विशेष मोहिनी घातली असून, मुंबई आणि परिसरातील दहीहंडीत तिच्या कार्यक्रमांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदाही…

Read More