Headlines

विठ्ठलनामाचा गजर:7 जुलै रोजी पंढरपूरकडे पालखीचे होणार प्रस्थान‎, पैठण येथील पालखी ओट्याची स्वच्छता

संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या ४७१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, येथील पालखी ओटा परिसराची रविवारी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांच्या पुढाकाराने संपूर्ण पालखी स्वच्छ करण्यात आला. ही मानाची पालखी मंगळवारी (७ जुलै) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संत एकनाथ महाराजांची पालखी हा पैठणच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा…

Read More

प्रगतिशील शेतकरी:अवघ्या 20 गुंठ्यात वांग्यातून 9 महिन्यांत साडेचार लाख उत्पन्न‎

बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीचे गणित‎दिवसेंदिवस कठीण होत असताना लातूर‎‎जिल्ह्यातील जेवळी येथील‎‎प्रगतिशील शेतकरी अमृत‎‎गंपले यांनी अवघ्या २०‎‎गुंठ्यांत ९०० वांग्याच्या‎‎रोपांची लागवड करून‎‎केवळ नऊ महिन्यांत सुमारे‎‎६ लाख रुपयांचे उत्पादन‎‎मिळवले. यात दीड‎लाखांचा खर्च वगळला तर साडेचार लाखांचे‎निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. गंपले‎यांच्याकडे एकूण दोन एकर शेती आहे. यापूर्वी‎ते ऊस, हरभरा आणि सोयाबीन ही पारंपरिक‎पिके घेत होते. मात्र वाढता उत्पादन खर्च,‎अनियमित…

Read More

विवाहित असल्याचे माहीत असूनही संबंध ठेवले तर तो बलात्कार कसा?:ठाणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, आरोपीची निर्दोष मुक्तता

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका ३० वर्षीय तरुणाची ठाणे न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. जानेवारी २०२२ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेची आणि या तरुणाची मैत्री झाली होती. एप्रिल २०२२ मध्ये लग्नाचे आश्वासन देऊन त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा महिलेचा आरोप होता. काही काळानंतर तरुणाने आपण आधीच विवाहित…

Read More

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन:मान्यवरांची व्याख्याने, वृक्षारोपण; गुणवंत कामगारांचा सत्कारही झाला

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७३ वा वर्धापन दिन स्थानिक कार्यालयातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, मान्यवरांच्या व्याख्यानांचे आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम कामगार कल्याण मंडळाच्या रामनगर येथील ललित कला भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्याला युवा स्वाभिमान पक्षाचे सुनीलभाऊ राणा, अमरावती महानगरपालिकेच्या…

Read More

माजी पंतप्रधान चंद्रशेखर जन्मशताब्दीनिमित्त परिसंवादास चांगला प्रतिसाद:अरुण श्रीवास्तव: समाजवादी विचार पुढे नेण्याची आज गरज

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात ‘चंद्रशेखर: विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ समाजवादी नेते अरुणकुमार श्रीवास्तव यांनी समाजवादी विचार पुढे नेण्याची आज कधी नव्हे इतकी गरज असल्याचे मत व्यक्त केले. एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ, पुणे येथे रविवारी हा परिसंवाद पार पडला. कार्यक्रमाच्या…

Read More

गारपीटग्रस्त कांदा, केळी उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत:2 महिन्यांनंतरही नुकसानभरपाई मिळाली नाही

अंजनगाव बारी परिसरातील कांदा आणि केळी उत्पादक शेतकरी मे महिन्यात झालेल्या वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनामे पूर्ण होऊन दोन महिने उलटले असले तरी, अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी निखिल श्रीकृष्ण भोपळे यांच्या दोन एकरांतील सुमारे…

Read More

तळेगावात रस्त्यावर पाणी, रस्ता खचला:पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक चाचणीदरम्यान घडली घटना

तळेगाव दाभाडे येथील संभाजीनगर परिसरात मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी येऊन रस्ता खचल्याच्या घटनेनंतर तळेगाव नगर परिषदेने खुलासा केला आहे. ही घटना पाणीपुरवठा योजनेच्या नियोजित तांत्रिक चाचणीदरम्यान घडली, असे नगर परिषदेने स्पष्ट केले. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात पाण्याच्या टाक्या, मुख्य दाबनलिका आणि वितरण नलिका टाकण्याची कामे झाली आहेत. या योजनेतील संभाजीनगर येथील नव्याने बांधलेल्या पाण्याच्या…

Read More

मोर्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न:जिद्द, चिकाटीने यश मिळते – ठाणेदार आठवले

मोर्शी येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ठाणेदार राहुल आठवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिद्द, चिकाटी, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास कायम ठेवल्यास यशाचे शिखर सहज गाठता येते, असे प्रतिपादन त्यांनी केले. नवनीत डायनामिक आणि आकाश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बारावी आणि एमएच-सीईटी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात…

Read More

धर्मांधता राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हान – सुनील देवधर:'माय होम इंडिया' संस्थापकांचे पुरस्कार वितरणप्रसंगी मत

धर्मांधता हे राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षेपुढील मोठे आव्हान आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित कार्यकर्ते आणि ‘माय होम इंडिया’ संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांनी व्यक्त केले. शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. देवधर म्हणाले की, भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. भारताची मूळ संस्कृती नाकारून अनेकांनी त्यांचे धर्म,…

Read More

तरुणाईमध्ये भारतीयत्व नाही; डॉ. पटवर्धन यांची खंत:गुरुकुल प्रतिष्ठान पुरस्कार सोहळ्यात शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला प्रश्न

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन यांनी आजच्या तरुणाईमध्ये भारतीयत्व कोठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित आदर्श माता-पिता आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. पटवर्धन यांनी युवा पिढीच्या विचार, आचार, विहार आणि आहारात भारतीयत्व आढळत नसल्याची खंत व्यक्त केली. या पिढीचा पाया नेमक्या…

Read More