Headlines

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:पुण्यात संशयित आरोपी सियाच्या घराबाहेर गुलाबो गँगचे 'जोडे मारो' आंदोलन, निष्पक्ष तपासाची मागणी

पुण्यात केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आणि निष्पक्ष तपासाच्या मागणीसाठी सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’, ‘गुलाबो गँग’ आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी संशयित आरोपी सिया गोयल हिच्या मार्केट यार्ड येथील लीलाकुंज निवासस्थानाबाहेर ‘जोडे मारो’ आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी आरोपी सिया गोयल आणि तिच्या कुटुंबीयांच्या कथित वर्तनावर तीव्र संताप…

Read More

पावसाळी पर्यटनात जीव धोक्यात घालू नका!:राजगड–सिंहगड परिसरासाठी वन विभागाचा महत्त्वाचा इशारा

पुणे वन विभागाने पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. राजगड, सिंहगड, लोणावळा परिसरासह अनेक पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी काही धोके निर्माण झाले आहेत. यामध्ये दरड कोसळणे, दगड घसरणे, झाडांच्या फांद्या तुटणे, तसेच धबधबे, ओढे आणि नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढणे यांसारख्या घटनांचा…

Read More

आषाढी वारीवर पावसाचे संकट:आळंदीत येऊ नका, वारकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन; पुणे-मुंबई एसटी सेवा बंद, धरणांत वाढू लागला पाणीसाठा

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून कोकण, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि घाटमाथा भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापुराचे रूप धारण केले आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे आळंदीचा संपर्क तुटला असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे कडक…

Read More

मुंबईसह राज्यातील पावसाच्या दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करा:दोषींवर कठोर कारवाईची विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची मागणी

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक भागांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित केला. या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी सरकारकडे केली. मुंबईतील दुर्घटनांवर सरकारला धारेवर विधानसभेचे…

Read More

पहिल्याच पावसात 'मिसिंग लिंक'ची पोलखोल?:स्लॅब कोसळताच रोहित पवारांसह विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी नव्या मार्गावर खड्डे पडल्याची चर्चा सुरू असतानाच, सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅबचा काही भाग कोसळला. डोंगरावरील माती आणि पाण्याचा मोठा लोंढा रस्त्यावर आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका…

Read More

मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ पत्त्यासारखी कोसळली:5 चिमुकल्यांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आणखी एक भीषण दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमधील जनता नगर परिसरात रविवारी रात्री तीन मजली कच्च्या चाळीचा भाग अचानक कोसळल्याने पाच निष्पाप लहान मुले आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला आहे. ही चाळ धोकादायक असल्याने रहिवासी घरातील सामान बाहेर काढत असतानाच अचानक संपूर्ण बांधकाम…

Read More

विकासाचा गाजावाजा करणाऱ्यांनी पडलेला विकास पाहावा:मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला, शिंदेंवरही साधला निशाणा

मुंबई-पुणे प्रवासातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानंतर आता या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री म्हणतात मिसिंग लिंकवर…

Read More

वरुणराजाची हुलकावणी!:महिनाभरानंतर राहुरीकरांना रिमझिम पावसाने दिलासा

राहुरी तालुक्यात तब्बल एका महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा मात्र आजही कायम आहे. मागील आठवड्यात पावसाने किरकोळ हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून रिमझिम पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाच्या ओलीवर तालुक्यातील अनेक…

Read More

"आयक्यू'सोबत "ईक्यू' अन् "एसक्यू' वाढवा तरच घडेल परिपूर्ण पिढी:"भारत टॅलेंट सर्च' परीक्षेतील 31 गुणवंतांचा सत्कार

आजच्या स्पर्धेच्या युगात आपण मुलांना पुस्तकी ज्ञान देत आहोत. पालक आणि शिक्षकांना आता मुलांच्या संगोपनाची पद्धत बदलावी लागेल. १९८० च्या दशकात वर्गात पहिला नंबर मिळवणे किंवा ‘आयक्यू’ (बुद्ध्यांक) असणे प्रतिष्ठेचे मानले जात होते. पण आजच्या काळात हुशार असणे पुरेसे नाही. जोपर्यंत मुलांमध्ये ‘ईक्यू’ (भावनिक बुद्ध्यांक) आणि ‘एसक्यू’ (आध्यात्मिक बुद्ध्यांक) विकसित होत नाही, तोपर्यंत परिपूर्ण पिढी…

Read More

कभी- कभी मेरे दिल मे खयाल आता है….:ब्रिजधाम आश्रमात हिंदी गाण्यांची मैफल‎

सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमात रविवारी सायंकाळी ‘सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या’ वतीने ‘सूरसंध्या’ या सांस्कृतिक गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पावसाचा हलकासा शिडकावा आणि हवेतील गारवा अशा आल्हाददायक वातावरणात ‘सत्यम शिवम् सुंदरम’ हे गाणे सुरू होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है’ यांसारख्या सदाबहार गाण्यांमुळे आश्रमातील आजी-आजोबांसह सर्वच रसिक…

Read More