Headlines

सेवानिवृत्त सैनिकाची मिरवणूक:विविध चौकांमध्ये केला सत्कार

सिल्लोड -भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत सेवानिवृत्त झालेले तळणी गावचे सुपुत्र दिलीप चंदन यांचा सत्कार करुन, सजवलेल्या जीपमधून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील तळणी गावातील दिलीप पुंजाराम चंदन हे २००४ मधे केंद्रीय रिझर्व राखील दलात भरती झाले होते. त्यांनी जम्मु कश्मीर, छत्तीसगड, झारखंड, गडचिरोली ( महाराष्ट्र ), नागालँड आदी ठिकाणी २२ वर्ष देशसेवा केली….

Read More

कळवणला 17 ग्रामपंचायतींची जालना जिल्ह्यातील परतूरच्या टीमकडून पाहणी:मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विकासकामांचे स्कॅनिंग‎

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कळवण तालुक्यातील एकूण १७ गावांची परतूर, जि. जालना टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत बिलवाडी येथे तपासणी व पाहणी कामासाठी आलेल्या मान्यवर टीमचे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले . यावेळी उपस्थित जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची पाहणी करून मार्गदर्शन केले….

Read More

वातावरणात बदल:10 दिवसांत पारा 6 अंशांनी घसरला, निफाड @ 37 अंश, एप्रिल महिन्यात 43 अंशापर्यंत गेले हाेते तापमान

एरव्ही थंड तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कडाक्याचे ऊन पडत असल्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेच्या झळा सोसाव्या लागल्या. एप्रिल महिन्यात ४३ अंशांपर्यंत गेलेल्या तपमानाला कुठेतरी आता ब्रेक लागला असून, दहा दिवसानंतर निफाडचे तापमान ३७ अंशांवर येऊन पोहोचले आहे. सहा अंशांनी पारा घसरल्याने नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी तापमानाची नोंद…

Read More

पावसाळा तोंडावर; ‘जलतारा’चे आदेश नाहीत:सिल्लोडमध्ये 3600 शोषखड्ड्यांचे प्रस्ताव रखडले, शेतकऱ्यांत नाराजी‎

तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ उपक्रमाची कामे अद्याप सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३ हजार ६०० जलतारा खड्डे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आले नसल्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यास अवघा महिनाभराचा…

Read More

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गल्लेबोरगावला आत्महत्या:मावशीच्या घरी एकटी असताना छताला घेतला गळफास‎

गंगापूर तालुक्यातील वसुसायगाव येथील रहिवासी व शिक्षणासाठी गल्लेबोरगाव येथे मावशीकडे वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. निकिता नवनाथ नरोडे (२१, रा. वसुसायगाव, ता. गंगापूर, ह. मु. गल्लेबोरगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. निकिता कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील एका महाविद्यालयात बी.एस्सी. द्वितीय वर्षात शिक्षण घेत…

Read More

व्हिएतनामचा विन ग्रुप महाराष्ट्रामध्ये 6.5 अब्ज डाॅलर्स गुंतवणूक करणार:संबंध दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध- देवेंद्र फडणवीस

व्हिएतनामचा विन ग्रुप महाराष्ट्रात लवकरच ६.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम गुरुवारी मुंबई दौऱ्यावर होते. त्यानिमित्ताने आयोजित इंडिया – व्हिएतनाथ बिझनेस फोरम कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक,…

Read More

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकाॅप्टरचे वादळामुळे जुहूत इमर्जन्सी लँडिंग:हवेत 20 मिनिटे हेलकाव्यानंतर वैमानिकाचे प्रसंगावधान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर सोमवारी कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक आलेल्या धुळीच्या वादळात सापडले. ते महालक्ष्मी रेसकोर्सवरून मुरबाडकडे ते ओएसडींसह एका विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. मात्र, खराब हवामान व ‘झीरो व्हिजिबिलिटी’मुळे त्यांचे हेलिकॉप्टर तब्बल २० मिनिटे हवेत हेलकावे होते. अखेर वैमानिकाने प्रसंगावधान राखून ‘एटीसी’ शी संपर्क साधला आणि तातडीने मार्ग बदलून हेलिकॉप्टर जुहू विमानतळावर सुरक्षित उतरवले….

Read More

लॉकडाऊनमध्ये गमावला रोजगार:कुटुंबासाठी केली शेतमजूरी, आज 35 प्रकारच्या लोणच्यांचा ब्रँड; चित्रा बोरुडे यांची यशोगाथा

महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला उद्योजकांनी आपल्या भागातील पारंपरिक चवी मुंबईकरांसमोर मांडल्या आहेत. हस्तकला, ग्रामीण उत्पादने आणि खाद्यसंस्कृती यांचा सुंदर संगम या मेळ्यात पाहायला मिळत आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मेंडकी गावच्या चित्रा विशाल बोरुडे यांनी सादर केलेल्या तब्बल ३५ प्रकारच्या लोणच्यांनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात चित्रा बोरुडे यांच्या…

Read More

दहावीचा निकाल उद्या!:दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार, बोर्डाची अधिकृत घोषणा; कुठे पाहता येणार रिझल्ट?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. निकालापूर्वी सकाळी 11 वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत घोषणा केली जाईल, ज्यानंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

Read More

महालक्ष्मी सरस 2026:अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्रामीण संस्कृतीचा जागतिक दर्जाचा संगम; फुले दांपत्याच्या विचारांची थीम

महालक्ष्मी सरस 2026 यंदा आपल्या भव्य थीम पॅव्हेलियन, आकर्षक सजावट आणि जागतिक दर्जाच्या संकल्पनेमुळे विशेष चर्चेत आले आहे. महाराष्ट्राची संस्कृती, ग्रामीण जीवन, महिला सक्षमीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम यंदाच्या पॅव्हेलियनमध्ये पाहायला मिळत आहे. यंदाची मुख्य थीम महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाला समर्पित करण्यात आली आहे. स्त्रीशिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि…

Read More