Headlines

उपळाईमध्ये बोगस डॉक्टर गजाआड; चुकीच्या उपचारामुळे रुग्ण दगावला:प्रिन्स क्लिनिकवर पोलिसांची धाड; मृताच्या नातेवाइकांकडून कठोर शिक्षेची मागणी‎

वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारी कोणतीही पदवी नसताना आणि ॲलोपॅथी उपचारांचा अधिकार नसताना मागील २० वर्षांपासून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश झाला आहे. बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथे ५ मे रोजी सकाळी १० वाजता ही कारवाई करण्यात आली. शंकर मनोहर पाठक ऊर्फ डॉ. एस. एम. पाठक (बी.ए.एम.एस. बोर्ड लावलेला) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव…

Read More

जुने इन्फ्रास्ट्रक्चर अपुरे; पाच नव्या उपकेंद्रांची शहरात तातडीने गरज:जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू; मुख्य अभियंता अशोक साळुंखे यांची माहिती‎

अमरावती12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरावती शहरात सध्या १४ उपकेंद्र अस्तित्वात आहे मात्र शहरातील नागरी वस्तींचा झपाट्याने विस्तार होत असताना महावितरणकडील वीज यंत्रणेचे इन्फ्रास्ट्रक्चर मात्र अपुरे पडत आहे. वाढती घरांची संख्या आणि विद्युत उपकरणांच्या संख्येत झालेली मोठी वाढ यामुळे विजेच Source link

Read More

कडक उन्हातही खैरावचा बंधारा फुल्ल, 5 गावातील शेतीला मिळाले जीवदान:मोडकळीस आलेल्या बंधाऱ्याची दुरुस्ती, जि.प. सदस्य पृथ्वीराज सावंतांची पाहणी‎

कडक उन्हाच्या झळा बसत असतानाच खैराव येथील बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्याने परिसरातील ४ ते ५ गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी मोडकळीस आलेल्या या बंधाऱ्याने आता कात टाकली असून, उन्हाळ्याच्या तोंडावर उपलब्ध झालेला हा साठा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘जीवदान’ ठरत आहे. जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी या कामासाठी विशेष पुढाकार घेतला…

Read More

खरिपातही सोयाबीनच किंग, रेणापुरात 41 हजार हेक्टरवर पेरा होण्याचा अंदाज:तालुक्यात खरीपपूर्व मशागतीला वेग; 45 हजार 900 हेक्टरचे नियोजन‎

एप्रिल महिना संपताच रेणापूर तालुक्यातील शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. तालुक्यात यंदा ४५ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित आहे. यामध्ये नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचा पेरा सर्वाधिक, म्हणजेच तब्बल ४१ हजार १ . सध्या शिवारात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, ट्रॅक्टरचे भाडे प्रतिएकर ३ ते…

Read More

डोंगरगाव येथे आयोजित मृद आरोग्य कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद:शेतातील मातीचे परीक्षण करून घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन‎

सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता निर्देशांक या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर तालुका स्तरीय कार्यशाळा डोंगरगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यशाळेत मंडळ कृषी अधिकारी परीक्षित पाटील यांनी शेतकऱ्यांना सखोल व प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी माती व पाण्याचे नमुने वैज्ञानिक पद्धतीने कसे घ्यावेत, नमुना घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी,…

Read More

107 कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण स्थगित:घाेटी टाेलनाक्यावर नवीन कंत्राटदार नेमेपर्यंत नोकरी कायम ठेवण्याचे आश्वासन‎

मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावरील कार्यरत असणाऱ्या १०७ स्थानिक कामगारांना कमी केल्यानंतर या कामगारांनी सुरू केलेले साखळी उपोषण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इगतपुरी नगरपरिषदेचे गटनेते फिरोज पठाण यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. घोटी टोलनाक्यावर नवीन कंत्राटदार येईपर्यंत सध्याचेच कामगार कायम ठेवण्याचे आश्वासन मिळाल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोटी येथील टोलनाका इगतपुरी एक्स्प्रेस…

Read More

शिऊर येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात;‎गावातून प्रतिमेची भव्य मिरवणूक‎:रात्री भीम-बुद्धगीतांची मैफल, नागरिकांची मोठी उपस्थिती

शिऊर17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शिऊर वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा जयंती उत्सव भंते डॉ. आनंद कौसल्यायन बुद्ध विहार ट्रस्टच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरा Source link

Read More

नरसिंगपूरच्या आम्रवृक्षांची 13.25 लाख बोली:जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका 152 एकरांवर विस्तारलेली, आंब्यांच्या झाडांना मोठी फळधारणा‎

राजानंद सुरडकर | कन्नड नरसिंगपूर (ता. कन्नड) येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेतील १७० रायवळ आम्रवृक्षांचा लिलाव पार पडला. या त १३ लाख २५ हजारांची ऐतिहासिक बोली लागली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव व कृषी अधिकारी शांताराम वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही रोपवाटिका जिल्ह्यातील सर्वाधिक १५२ एकर क्षेत्रावर विस्तारलेली आहे. यात २५…

Read More

मनपा, जिल्हा परिषदेत उद्धवसेनेला अपयश तरी संभाजीनगरला उमेदवारी:अंबादास दानवे यांच्याकडे दोन्ही निवडणुकांची होती जबाबदारी

शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर आणि विधानसभा निवडणुकीतील आव्हानात्मक परिस्थितीनंतरही उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला. संभाजीनगरातून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार फुटलेले असताना, मराठवाड्यात पक्षाची विस्कटलेली घडी पुन्ह . सातत्याने आंदोलनांच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न लावून धरल्याने दानवे यांची दावेदारी प्रबळ ठरली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी विखुरलेल्या…

Read More

बनावट नोटांचा वाद; पडेगावच्या एकाचे अपहरण; येवल्यात भक्त निवासात डांबले:15 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटांचे दाखवले आमिष

पडेगाव येथून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला येवला येथे डांबून ठेवल्याच्या प्रकरणात बनावट नोटांच्या रॅकेटचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी २ आरोपींना अटक करत पीडिताची सुटका केली. या घटनेमुळे शहरात बनावट नोटांचे व्यवहार करणारे संघटित जाळे सक्रिय असल्याचे उघड झाले असून, यातील मुख्य मध्यस्थ फरार झाला आहे. पोलिस निरीक्षक गजानन…

Read More