Headlines

'ऑपरेशन टायगर' नव्हे, 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस':सचिन अहिरांच्या जाण्यानंतर आदित्य ठाकरेंचा थेट आरोप, 'अजून किती ओरबडणार?'

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्जही भरला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना सगळे दिले तेच स्वार्थासाठी सोडून जात असल्याची टीका…

Read More

BJP Slams Sanjay Raut on Woman Safety & Hindutva; Calls Him Maharashtra Drohi

फडणवीस हे संविधानानुसार आणि “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून काम करणारे नेते असून त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. काँग्रेससोबत युती करून हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड करणारे संजय राऊतच महाराष्ट्रद्रोही आहेत.पाकिस्तान आणि औरंगजेबाबाबत मवाळ . नवनाथ बन म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात भाजपच्या 105 आमदारांना विकासकामांसाठी एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा…

Read More

सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश:पक्षातून आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिलेत- बावनकुळे, असे अनेक धक्के पचवले, सचिन अहिर काही 'मास लीडर' नाहीत- राऊत

विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटाचे वरळीतील आमदार सचिन अहिर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या धक्कादायक घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरांच्या अहंकारामुळेच पक्ष संपत चालला असून, आता पक्षातून केवळ आदित्य…

Read More

सिंहासनाच्या मोहापायी रामाला पुन्हा वनवासात ढकललं!:अयोध्या राम मंदिरातील दानचोरीवरून राज ठाकरेंची मोदी-शहांवर टीका

अयोध्येतील भव्य राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या दानामध्ये (देणगी आणि दागिने) झालेल्या कोट्यवधींच्या अपहारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. “प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन सत्तेवर बसलेल्यांना या अपहाराविषयी काहीच कसे वाटत नाही?” असा थेट सवाल करत, राज ठाकरे यांनी एका…

Read More

मुंबई-पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवर पुन्हा अपघात:बोगद्यातून चालत्या कारवर दोन ते तीन दगड पडले; काही दिवसांपूर्वीच झाला होता अपघात

मुंबई-पुणे महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकवर (मिसिंग लिंक) पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. या पूर्वी काही दिवसांपूर्वीच या मार्गावर तीन गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला होता. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. आता देखील मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका कारवर कनेक्टिंग लिंकच्या बोगदा क्रमांक दोनमध्ये दोन ते तीन दगड पडले. त्यामुळे कारची पुढची काच फुटली असून, सुदैवाने जीवितहानी…

Read More

शेतकऱ्यांचे कापूस, धान आणि हरभऱ्याचे पैसे व्याजासहित परत करा!:बच्चू कडू आक्रमक, राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आज (30 जून) मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि प्रशासकीय व्यवस्थेवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे अद्याप न मिळाल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळ, प्रशासकीय अधिकाऱ्यांची मग्रुरी आणि राजकीय घडामोडींवरही त्यांनी रोखठोक भाष्य केले. शेतकऱ्यांचे पैसे व्याजासहित परत करा! बच्चू कडू यांनी…

Read More

फडणवीसांचे वागणे 'घटनाद्रोही' अन् 'रामद्रोही; म्हणूनच 'ऑपरेशन देवेंद्र' सुरू झालं:शिंदे गटामुळे फडणवीस महाराष्ट्रात पदावर राहतील की नाही, अशी परिस्थिती– संजय राऊत

ओमराजे निंबाळकर हा माणूस सोंगाड्या आहे. त्यांनी खरे बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस विरोधात असताना ज्या खासदारांना भेटी देत नाहीत, निधी देत नाहीत पण पक्षांतर करताच त्यांचे कामे मंजूर करतात हा घटनेशी द्रोह आहे हे फडणवीस यांनी लक्षात ठेवावे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे वागणार असतील तर ते घटना द्रोही आणि रामद्रोही आहेत. यामुळेच ऑपरेशन देवेंद्र…

Read More

आढावा बैठक:इतके निष्क्रिय अधिकारी प्रथमच पाहतोय, काम शासनासाठी करता की ठेकेदारांसाठी

अकोले तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई आणि रखडलेल्या विकासकामांवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी प्रशासनाचे वाभाडे काढले. “इतके निष्क्रिय अधिकारी मी पहिल्यांदाच पाहत आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तरी प्रशासनाला फरक पडत नाही. अधिकारी सरकारसाठी काम करतात की ठेकेदारांसाठी?” अशा शब्दांत विखे पाटलांनी आपला संताप व्यक्त केला. येथील विठ्ठल लॉन्सवर आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते…

Read More

मासेमारी बंदी 15 ऑगस्टपर्यंत वाढली:मच्छिमारांना 50 हजारांच्या मदतीचा राज्य सरकारचा विचार, नितेश राणेंची विधानसभेत मोठी घोषणा

राज्यातील मच्छिमारांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पावसाळा उशिराने सुरू झाल्याने आणि समुद्री परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे आर्थिक फटका बसणाऱ्या मच्छिमारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत…

Read More

जालन्यात पोलिसांचा 'अँटी-ड्रग्ज' पॅटर्न:3 हजार नशेच्या गोळ्या जप्त, महाविद्यालयीन तरुणांना गुन्हेगार न करता पालकांना केले सतर्क!

जालना शहरात नशेच्या बटण गोळ्या ‎विक्री व बाळगणाऱ्यांवर कारवाया ‎केल्या जात आहे. वर्षभरात 3 हजार ‎‎नशेच्या गोळ्या जप्त करून 16 ‎आरोपी निष्पन्न केले.‎दहशतवादविरोधी पथकाने दोन ‎‎दिवसांपूर्वीच 1 हजार 80 गोळ्यांचा‎ साठा जप्त केला. या नशेच्या गोळ्या ‎‎गुन्हेगारच नव्हे, महाविद्यालयीन ‎तरुणही घेत असल्याचे पुढे आले‎ आहे. आरोपींच्या संपर्कात काही ‎‎महाविद्यालयीन तरुण असल्याचेही ‎पुढे आले आहे. पोलिसांनी…

Read More