Headlines

बुधवार पेठेतील ४ कुंटणखाने सील:अनैतिक व्यापार प्रकरणी ३ बांगलादेशी महिलांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई

पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी व्यापारासाठी वापरले जाणारे चार कुंटणखाने एक वर्षासाठी सील केले आहेत. या कारवाईत भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांनाही अटक करण्यात आली आहे. फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‘न्यू वेलकम’, ‘बेगम बिल्डिंग’ आणि ‘दाणे आळी’ येथील जुन्या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुंटणखाने चालवले…

Read More

पेडगाव शिवारात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ:हातातील कड्यावरून ओळख पटविण्याचे बासंबा पोलिसांचे प्रयत्न

हिंगोली तालुक्यातील पेडगाव शिवारात लहान्या पुलाखाली मानवी सांगाडा सोमवारी ता. २७ सापडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सांगाड्याच्या हातामध्ये असलेल्या कड्यावरून आता त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न बासंबा पोलिसांनी सुरु केला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सिरमस ते पेडगाव शिवारात माळरानाचा भाग आहे. या ठिकाणी असलेल्या एका लहान्या पुला खाली मानवी सांगाडा असल्याचे…

Read More

शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा:शिवप्रेमी मोठ्या मनाचे असतात, माफ करतील- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी…

Read More

ॲड. असीम सरोदे यांचा आमदार गायकवाडांना कायदेशीर इशारा:प्रशांत आंबींना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास उच्च न्यायालयात दाद

आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत ‘जीभ कापून टाकू’ अशी धमकी दिल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी कोल्हापूर पोलिसांकडे धाव घेत, गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही सरोदे यांनी दिला आहे….

Read More

प्रशासनिक हलगर्जीमुळे वीज ट्रिपिंग:तातडीने ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

राज्यात वाढत्या वीज ट्रिपिंगच्या समस्येमागे प्रशासनिक अनियमितता आणि तांत्रिक त्रुटी कारणीभूत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात वीज उपलब्ध असूनही वितरण व्यवस्थेतील कमतरतेमुळे वारंवार ट्रिपिंग होत आहे. ऊर्जा विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि अंतर्गत समन्वयावर यामुळे प्रश्नचिन्ह…

Read More

लिफ्टच्या मोकळ्या जागेत डोकावणे बेतले जिवावर:नाशिक मेडिकल कॉलेजमधील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; थरार सीसीटीव्हीत कैद

नाशिक येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये आज सकाळी एका महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात ज्योती अहिरे नावाच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या ज्योती यांच्यावर मेडिकल कॉलेजमध्येच तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या संपूर्ण थरारक घटनेचा…

Read More

मेळघाटात जलसंकट गहिरे:8 गावांना 19 टँकरने पाणीपुरवठा सुरू

तापमानात वाढ झाल्याने मेळघाटातील जलसंकट अधिक गंभीर झाले आहे. चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये सध्या १९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांमध्ये भूगर्भात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे टँकरशिवाय पाणीपुरवठा करण्याचा दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नोंदीनुसार, या आठही गावांमध्ये रहिवाशांसाठी दररोज पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवले जात…

Read More

कांदा उत्पादकांना कवडीमोल भाव; शेतकरी संकटात:कुऱ्हा परिसरात लागवडीचा खर्चही निघेना, शासनाच्या हस्तक्षेपाची मागणी

तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसर कांदा उत्पादनाचे आगर म्हणून ओळखला जातो. या भागातील मारडा आणि इतर गावांतील कांदा सर्वदूर प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुढे आली आहे. कांदा लागवडीचा खर्च आणि त्यातून मिळणारे…

Read More

पुण्याच्या बुधवार पेठेत मोठी कारवाई:पोलिसांकडून बांगलादेशी रॅकेटचा पर्दाफाश, 4 कुंटणखाने सीलबंद; 3 महिलांना बेड्या

पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील न्यू वेलकम, बेगम आणि दाणे आळी येथील इमारतींमधील एकूण 4 फ्लॅट फरासखाना पोलिसांनी एका वर्षासाठी सीलबंद केले आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, कुंटणखान्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या जागांवर ही कडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी महिलांनाही अटक…

Read More

धक्कादायक!:कळमनुरी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सौरभ साकळे यांची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या

कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सौरभ साकळे (२७) यांनी त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता. २७ घडली आहे. त्यांच्यावर सायंकाळी कळमनुरी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कळमनुरी येथील एका दैनिकाचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या सौरभ यांनी मागील सात वर्षात शहरासह तालुक्यातील प्रश्‍नांना वाचा फोडली आहे. बातम्यांच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्‍न…

Read More