Headlines

माकडं पकडा, 600 रुपये मिळवा!:मानव-वानर संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; वन विभागाचा नवा जीआर

राज्यात वाढत असलेला मानव-वानर संघर्ष रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या 22 एप्रिल 2026 च्या शासन निर्णयाद्वारे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लोकप्रतिनिधींनी वारंवार केलेल्या मागण्यांची दखल घेत, आता त्रासदायक माकडे आणि वानरांना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी प्रति माकड 600 रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. या नव्या निर्णयामुळे जुन्या आर्थिक मापदंडांमध्ये सुधारणा करण्यात…

Read More

Hussain Dalwai Hindu Terrorism Statement Sparks Controversy; Minister Lodha Retorts

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानांवरून सुरू असलेला वाद शांत होत असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी ‘हिंदू दहशतवादा’बाबत केलेल्या एका विधानामुळे नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. “दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, इतर धर् . देशातील सद्यस्थिती आणि धार्मिक ध्रुवीकरणावर भाष्य करताना हुसेन दलवाई म्हणाले की, “भारत हा महात्मा गांधींच्या विचारांवर चालणारा धर्मनिरपेक्ष देश…

Read More

शिक्षण क्षेत्रामधील प्रसारित भ्रामक जाहिरातीवर आळा घालण्याची मागणी:तहसीलदार यांच्यामार्फत शिक्षण उपसंचालकांना ग्राहक पंचायतचे निवेदन‎

प्रतिनिधी | तिवसा शिक्षण क्षेत्रात वाढत्या भ्रामक जाहिरातीमुळे विद्यार्थी व पालकांची अक्षरशः दिशाभूल करून आर्थिक लूट होत असल्याने प्रकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने २४ एप्रिल रोजी तिवसा तहसीलदार यांच्यामार्फत शिक्षण उपसंचालक यांच्याकडे एका निवेदनातून करण्यात आली. शासनाने २५ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकांच्या अनुषंगाने भ्रामक जाहिराती व दिशाभूल करणाऱ्या…

Read More

हिंगोलीत हार्डवेअरचे दुकान फोडून चोरट्यांनी ५.२३ लाखांचा मुद्देमाल पळविला:हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील महेश चौक भागातील हार्डवेअरच्या दुकानावरील लाकडी दरवाजाचे पट काढून चोरट्यांनी ५.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रविवारी ता. २६ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील व्यापारी नितीन निलावार यांचे महेश चौक भागात हार्डवेअरचे दुकान आहे. या दुकानामध्ये बांधकाम व नळ फिटींगचे…

Read More

एमएमसी निवडणुकीत अमरावतीत कमी प्रतिसाद:केवळ 18.9 टक्के मतदान, 2 हजार 565 पैकी 464 डॉक्टरांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील डॉक्टरांनी अत्यंत कमी प्रतिसाद दिला. एकूण २,५६५ मतदारांपैकी केवळ ४६४ डॉक्टरांनीच मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३२२ पुरुष आणि १४२ महिला डॉक्टरांचा समावेश आहे, ज्यामुळे मतदानाची टक्केवारी केवळ १८.९ टक्के राहिली. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, अमरावतीतील वाढलेले तापमान (४६.८ अंश सेल्सिअस)…

Read More

यावली शहीद येथे राष्ट्रसंत जन्मोत्सव सुरू:23 एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन, 30 ला जन्मावतरण सोहळा

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-नरसिंगपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव २३ एप्रिलपासून सुरू झाला आहे. वंदनीय राष्ट्रसंत जन्मोत्सव समिती आणि परिसरातील ग्रामस्थांच्या सहभागातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थानी असलेल्या स्मृती मंदिरात हा जन्मोत्सव साजरा होत आहे. यामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read More

अमरावतीतील प्रवासी निवारे दुर्लक्षित:बसण्यासाठीचे बेंच गायब, कचऱ्याचे ढिगारे; प्रवाशांना उन्हाळ्यात नाहक त्रास

अमरावती शहरातील प्रवासी निवारे संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे बेदखल झाले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना या निवाऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु अनेक निवारे त्यांच्या मूळ उद्दिष्टांपासून कोसो दूर गेले आहेत. काही प्रवासी निवाऱ्यांमधील बेंचेस गायब झाले असून, त्या ठिकाणी इमारतीच्या बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. तर काही निवाऱ्यांसमोर कचऱ्याचे ढिगारे लागले असून आसन व्यवस्था पूर्णपणे…

Read More

वर्ध्यात रविवारी तापमान 46.6 पार:दुपारच्या वेळी रस्ते ओस, जनजीवन विस्कळीत; उद्योगांमधील प्रदूषण तापमानावाढीला कारणीभूत

वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून तापमानाने ४६.६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसच मे महिन्याची चाहूल लागल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील दोन तीन कंपन्यांमुळे व त्यांच्या वाढत्या प्रदूषणाने तापमानात वाढ होत असून, कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्ते…

Read More

धीरेंद्र शास्त्री स्वत:च्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती:छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत संभाजी छत्रपती यांची टीका

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी कडक शब्दांत समाचार घेतला असून, छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत, “स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती” असे संबोधले आहे. तसेच “अशा भोंदू…

Read More

महाराष्ट्रावर सूर्य कोपला!:परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू, अकोल्यात पारा 46 वर जाण्याचा इशारा; अनेक शहरांत रस्ते सामसूम

महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. विदर्भ व मराठवाड्यासह अनेक शहरांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दुपारपूर्वीच रस्ते सामसूम झाल्याचे दिसून येत आहे. परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा बळी गेला आहे. तर अकोल्यात पारा तब्बल 46 अंशांवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वाढत्या तापमानामुळे काही ठिकाणी…

Read More