Headlines

सिल्लोडमध्ये मिरची 1500 हेक्टरपर्यंत वाढणार‎:गतवर्षी 5800 हेक्टर झाली होती लागवड, गेल्या वर्षी होता चांगला भाव‎

सिल्लोड तालुक्यात उन्हाळी मिरची लागवड जोमाने सुरू झाली असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के मिरची लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी सांगितले. तालुक्यातील आमठाणा अन्वी, केळगाव, मुर्डेश्वर, पानवडोद, शिवना, उंडणगाव, पालोद, मांडणा, हट्टी, पांगरी, अंभई, भराडी, लिहाखेडी, सारोळा, आसडी, गोळेगाव, रहिमाबाद, पिंपळदरी, बाळापूर, खुल्लोड, हळदा, डकला, बोदवड, सराटी, खंडाळा,…

Read More

गंगापूर येथे धीरेंद्र शास्त्री, आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन:दोघांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची शिवप्रेमी नागरिकांची मागणी‎

गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवप्रेमी तालुक्यातील नागरिकांतर्फे २७ एप्रिल रोजी भरउन्हात धीरेंद्र शास्त्री व आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात घोषणाबाजी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये वक्त्यांनी भोंदू धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने नागपूर येथील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असत्य, विकृत व भडकाऊ भाषण करून…

Read More

बिडकीनमध्ये दोन भीषण अपघातांत दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी:छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावर बिडकीन परिसरात घडले अपघात‎

उन्हाचा कडाका आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे बिडकीन परिसरात रविवारी अक्षरशः ‘काळा दिवस’ ठरला. दिवसभरात दोन ठिकाणी अपघात घडले. त्यापैकी दोन भीषण अपघातांत दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पहिली दुर्घटना पैठण-बिडकीन मार्गावरील हॉटेल पार्वतीसमोर सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान घडली. एका भरधाव रिक्षाने समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात…

Read More

पुण्यात मशरूम कंपनीत टाकीतील विषारी वायूमुळे 3 कामगारांचा मृत्यू:सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी उतरले होते, मृत उत्तर प्रदेशचे

जेजुरीजवळील बेलसर गावातील एका मशरूम उत्पादक कंपनीत तीन कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. कंपनीच्या आवारातील सांडपाण्याची भूमिगत टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगारांना टाकीत साचलेल्या विषारी वायूचा फटका बसला आणि काही क्षणांतच ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून औद्योगिक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या दुर्घटनेत पिंटू राजेश…

Read More

पुणे पोलिसांची ड्रग्ज तस्करांवर मोठी कारवाई:१९ जण अटकेत, ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत १९ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५८ लाख १८ हजार २५० रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, १ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत परिमंडळ ७ अंतर्गत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. परिमंडळ ७ मधील वाघोली, लोणीकंद,…

Read More

Mumbai Family Death: Biryani & Watermelon Tragedy

मुंबईच्या गजबजलेल्या पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर झालेल्या भीषण विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये १३ आणि १६ वर्षांच्या दोन मुलींचा समावेश असून, या . पायधुनीतील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाने शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसोबत जेवण केले. मिळालेल्या…

Read More

भोंदू बागेश्वर महामानवांपेक्षा मोठा वाटतो का?:रोहित पवारांचा सवाल; म्हणाले – सत्तेतील मोठा पक्ष धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाचा स्पॉन्सर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या नागपुरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. सत्तेतला एक मोठा पक्ष सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राने भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा निषेध केला आहे. त्यानंतरही नागपुरात या भोंदूबाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे हे लाजिरवाणे नाही का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे….

Read More

मंत्री प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया:भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा आरोप; कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल केली तक्रार

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सरनाईकांवर भाईंदर पाडा येथील एक महत्त्वाचा भूखंड लाटल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी एका फेसबुक पोस्टद्वारे मंत्री…

Read More

'केईएम'च्या नामांतरावरून राजकीय रणकंदन:मंत्री लोढांचा 'एकलव्य'चा प्रस्ताव; ठाकरेंच्या आमदारांचा विरोध, आंदोलनाचा इशारा

मुंबईतील ऐतिहासिक ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) रुग्णालयाचे नाव बदलून ते ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्याच्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रस्तावामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समितीने प्राथमिक मंजुरी दिल्याचे समजताच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याविरोधात रस्त्यावरच्या लढाईची हाक दिली आहे. या नामांतरामुळे मुंबईची अस्मिता आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत…

Read More

नीतेश राणेंना कोर्टाचा दिलासा अन् शिक्षाही:'चिखलफेक' प्रकरणात निर्दोष सुटका, पण एका कलमांतर्गत 1 महिन्याचा कारावास अन् 1 लाखाचा दंड

सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याच्या प्रकरणात भाजप नेते तथा पालकमंत्री नीतेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका केली आहे. यामुळे राणे यांना मोठा दिलासा दिला आहे. पण याच प्रकरणाशी संबंधित एका खटल्यात कोर्टाने त्यांना 1 महिन्याचा कारावास व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे त्यांची अडचण झाली…

Read More