'मटण नीट शिजले नाही' म्हणून पतीला आला राग:मित्रासमोरच वाट्टेल ते सुनावले; अपमान सहन न झाल्याने पत्नीने टोकाचे पाऊल उचलले
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका गृहिणीने किरकोळ कारणावरून आलेल्या रागातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘मटण नीट शिजले नाही’ या शुल्लक कारणावरून पतीशी झालेल्या वादाने चेतना मनोज जाधव या महिलेने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. एका हसत्याखेळत्या संसाराची या घटनेमुळे राखरांगोळी झाली असून, संतापाच्या भरात घेतलेल्या एका निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त…